म. टा. प्रतिनिधी, ठाणे
लॉकडाउनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या भिवंडीकरांना दिलासा देण्यासाठी लॉकडाउन काळातील तीन महिन्यांचा मालमत्ता कर आणि पाणीपट्टी माफ करण्याची घोषणा बुधवारी महापौर प्रतिभा पाटील यांनी केली. मात्र राज्य सरकारने महापालिकेला अनुदान दिल्यास करमाफी देता येईल, अशी पुस्ती प्रशासनाने जोडल्यामुळे हा दिलासा प्रत्यक्षात येण्यास अवकाश दिसतो.
भिवंडी महापालिकेमध्ये बुधवारी झूम अॅपद्वारे महासभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी सभागृहात केवळ महापौर यांच्यासह उपमहापौर इम्रान वली मोहमद खान, पालिका आयुक्त डॉ. पंकज आशिया, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, स्थायी समिती सभापती हलीम अन्सारी, विरोधी पक्षनेते यशवंत टावरे, सभागृह नेता विलास पाटील यांच्यासह इतरही सदस्य उपस्थित होते. दुपारी सभा सुरू झाल्यानंतर लॉकडाउन काळातील तीन महिन्यांचा मालमत्ता कर आणि पाणीपट्टी माफ करण्याच्या विषयावर चर्चा झाली. या चर्चेत झूम अॅपद्वारे इतरही सदस्य सहभागी झाले होते. लॉकडाउनमुळे गोरगरीब नागरिकांसह व्यापाऱ्यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून येणारे नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांना आर्थिक दिलासा देणे हे महापालिकेचे प्रमुख काम आहे, असे सांगत तीन महिन्यांचा मालमत्ता कर आणि पाणीपट्टी माफ करण्याची घोषणा महापौर प्रतिभा पाटील यांनी केली. याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश महापौरांनी प्रशासनाला दिले. तसे पत्रकही नंतर महापालिकेने जारी केले.
मालमत्ता कर हा उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. त्यामुळे सरकारी अनुदानाशिवाय करमाफी शक्य नाही, अशी माहिती पालिका सचिव अनिल प्रधान यांनी दिली.
लॉकडाउनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या भिवंडीकरांना दिलासा देण्यासाठी लॉकडाउन काळातील तीन महिन्यांचा मालमत्ता कर आणि पाणीपट्टी माफ करण्याची घोषणा बुधवारी महापौर प्रतिभा पाटील यांनी केली. मात्र राज्य सरकारने महापालिकेला अनुदान दिल्यास करमाफी देता येईल, अशी पुस्ती प्रशासनाने जोडल्यामुळे हा दिलासा प्रत्यक्षात येण्यास अवकाश दिसतो.
भिवंडी महापालिकेमध्ये बुधवारी झूम अॅपद्वारे महासभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी सभागृहात केवळ महापौर यांच्यासह उपमहापौर इम्रान वली मोहमद खान, पालिका आयुक्त डॉ. पंकज आशिया, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, स्थायी समिती सभापती हलीम अन्सारी, विरोधी पक्षनेते यशवंत टावरे, सभागृह नेता विलास पाटील यांच्यासह इतरही सदस्य उपस्थित होते. दुपारी सभा सुरू झाल्यानंतर लॉकडाउन काळातील तीन महिन्यांचा मालमत्ता कर आणि पाणीपट्टी माफ करण्याच्या विषयावर चर्चा झाली. या चर्चेत झूम अॅपद्वारे इतरही सदस्य सहभागी झाले होते. लॉकडाउनमुळे गोरगरीब नागरिकांसह व्यापाऱ्यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून येणारे नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांना आर्थिक दिलासा देणे हे महापालिकेचे प्रमुख काम आहे, असे सांगत तीन महिन्यांचा मालमत्ता कर आणि पाणीपट्टी माफ करण्याची घोषणा महापौर प्रतिभा पाटील यांनी केली. याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश महापौरांनी प्रशासनाला दिले. तसे पत्रकही नंतर महापालिकेने जारी केले.
मालमत्ता कर हा उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. त्यामुळे सरकारी अनुदानाशिवाय करमाफी शक्य नाही, अशी माहिती पालिका सचिव अनिल प्रधान यांनी दिली.