म. टा. वृत्तसेवा, ठाणे
जातीपातीच्या बंधाला छेद देत गेल्या चार वर्षांत ठाण्यातील ८७० जोडप्यांनी आंतरजातीय विवाह करत जातीभेदातील दरी कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने आंतरजातीय विवाह करणाऱ्या प्रत्येक दाम्पत्याला ५० हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते. या विभागाने दिलेली आकडेवारी नक्कीच सुखावह आहे. विशेष म्हणजे अनुदान न घेतलेल्या परंतु जातीची बंधने तोडून विवाह केलेल्या जोडप्यांची संख्याही मोठी आहे.
विवाह ठरविताना आजही जात-पोटजात पाहून रूढी-परंपरेने विवाह ठरविणारा मोठा वर्ग समाजात आहे. जातीअंतर्गतच विवाहास समाजमान्यता असल्याचा समज करून घेत आंतरजातीय विवाह करण्याची मानसिकता वधू, वर किंवा पालकांची होत नाही. आंतरजातीय विवाहास मान्यता दिल्यास कुटुंबातील नातेसंबंध बिघडून समाजातही 'प्रतिष्ठा' कमी होत असल्याने अनेक कुटुंबीयांमध्ये पालक आंतरजातीय विवाहास आजही मान्यता देत नाहीत. मात्र समाज, कुटुंबाला न भिता गेल्या चार वर्षांत ठाणे जिल्ह्यातील ८७० जोड्यांनी आंतरजातीय विवाह केल्याची नोंद समाज कल्याण विभागात करण्यात आली आहे.
आंतरजातीय विवाह केल्यानंतर समाज कल्याण विभागाच्या वतीने या दाम्पत्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपयांचे अनुदान देते. यासाठी विवाहित दाम्पत्यापैकी एक व्यक्ती मागासवर्गीय व एक सवर्ण असणे आवश्यक आहे. त्यासाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्र, फोटोसह प्रस्ताव अर्ज जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडे देणे बंधनकारक आहे. सन २०१०पासून या अनुदानामध्ये वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी अनुदान मिळण्यासाठी एक वर्ष प्रतीक्षा करावी लागत होती. मात्र ठाणे जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने जसे अर्ज येतील तसे ते मंजुरीसाठी पाठवून देण्यात येतात. त्यामुळे अवघ्या दोन ते तीन महिन्यांत या योजनेतील अनुदानाची रक्कम दाम्पत्यांना मिळते.
सन २०१४-१५ व २०१७-१८ मध्ये दोनशे हून अधिक दाम्पत्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. मात्र चालू वर्षी केवळ ५५ लाभार्थी असले तरी अनेक प्रस्ताव प्रलंबित असल्यामुळे वर्षअखेर २००हून अधिक लाभार्थी याचा लाभ घेतील, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. …………
साल एकूण दाम्पत्य
२०१४ -१५ २६१
२०१५-१६ १९०
२०१६-१७ १५३
२०१७-१८ २११
२०१८-१९ ५५
……………एकूण ८७०
………………
आंतरजातीय विवाह करणाऱ्या ठाणे जिल्ह्यात जोडप्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. गेल्या दोन वर्षांत लाभार्थी वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात असून चार वर्षांत ८७० जणांनी लाभ घेतला आहे. पूर्वी अनुदानासाठी दाम्पत्यांना वर्षभर प्रतीक्षा करावी लागत होती. मात्र गेल्या दोन वर्षांपासून जसे अर्ज येतील तसे मंजूर करून दोन ते तीन महिन्यांत अनुदान दिले जाते.
योगेश पाटील, जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद
जातीपातीच्या बंधाला छेद देत गेल्या चार वर्षांत ठाण्यातील ८७० जोडप्यांनी आंतरजातीय विवाह करत जातीभेदातील दरी कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने आंतरजातीय विवाह करणाऱ्या प्रत्येक दाम्पत्याला ५० हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते. या विभागाने दिलेली आकडेवारी नक्कीच सुखावह आहे. विशेष म्हणजे अनुदान न घेतलेल्या परंतु जातीची बंधने तोडून विवाह केलेल्या जोडप्यांची संख्याही मोठी आहे.
विवाह ठरविताना आजही जात-पोटजात पाहून रूढी-परंपरेने विवाह ठरविणारा मोठा वर्ग समाजात आहे. जातीअंतर्गतच विवाहास समाजमान्यता असल्याचा समज करून घेत आंतरजातीय विवाह करण्याची मानसिकता वधू, वर किंवा पालकांची होत नाही. आंतरजातीय विवाहास मान्यता दिल्यास कुटुंबातील नातेसंबंध बिघडून समाजातही 'प्रतिष्ठा' कमी होत असल्याने अनेक कुटुंबीयांमध्ये पालक आंतरजातीय विवाहास आजही मान्यता देत नाहीत. मात्र समाज, कुटुंबाला न भिता गेल्या चार वर्षांत ठाणे जिल्ह्यातील ८७० जोड्यांनी आंतरजातीय विवाह केल्याची नोंद समाज कल्याण विभागात करण्यात आली आहे.
आंतरजातीय विवाह केल्यानंतर समाज कल्याण विभागाच्या वतीने या दाम्पत्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपयांचे अनुदान देते. यासाठी विवाहित दाम्पत्यापैकी एक व्यक्ती मागासवर्गीय व एक सवर्ण असणे आवश्यक आहे. त्यासाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्र, फोटोसह प्रस्ताव अर्ज जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडे देणे बंधनकारक आहे. सन २०१०पासून या अनुदानामध्ये वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी अनुदान मिळण्यासाठी एक वर्ष प्रतीक्षा करावी लागत होती. मात्र ठाणे जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने जसे अर्ज येतील तसे ते मंजुरीसाठी पाठवून देण्यात येतात. त्यामुळे अवघ्या दोन ते तीन महिन्यांत या योजनेतील अनुदानाची रक्कम दाम्पत्यांना मिळते.
सन २०१४-१५ व २०१७-१८ मध्ये दोनशे हून अधिक दाम्पत्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. मात्र चालू वर्षी केवळ ५५ लाभार्थी असले तरी अनेक प्रस्ताव प्रलंबित असल्यामुळे वर्षअखेर २००हून अधिक लाभार्थी याचा लाभ घेतील, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. …………
साल एकूण दाम्पत्य
२०१४ -१५ २६१
२०१५-१६ १९०
२०१६-१७ १५३
२०१७-१८ २११
२०१८-१९ ५५
……………एकूण ८७०
………………
आंतरजातीय विवाह करणाऱ्या ठाणे जिल्ह्यात जोडप्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. गेल्या दोन वर्षांत लाभार्थी वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात असून चार वर्षांत ८७० जणांनी लाभ घेतला आहे. पूर्वी अनुदानासाठी दाम्पत्यांना वर्षभर प्रतीक्षा करावी लागत होती. मात्र गेल्या दोन वर्षांपासून जसे अर्ज येतील तसे मंजूर करून दोन ते तीन महिन्यांत अनुदान दिले जाते.
योगेश पाटील, जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद