अ‍ॅपशहर

उपोषणाला वाढता पाठिंबा

पालघर सूर्या पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने गेले दोन दिवस पालघर हुतात्मा चौक येथे बेमुदत उपोषण सुरू आहे...

Maharashtra Times 21 Mar 2018, 2:11 am
म. टा. वृत्तसेवा, पालघर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम increasing support for hunger stike
उपोषणाला वाढता पाठिंबा


सूर्या पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने गेले दोन दिवस पालघर हुतात्मा चौक येथे बेमुदत उपोषण सुरू आहे. या उपोषणाला जिल्ह्यातील नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असून सरकार मात्र या उपोषणाकडे जाणीवपणे दुर्लक्ष करीत आहे.

सूर्या सिंचन प्रकल्पाचे ८० टक्के पाणी वसई, विरार व मीरा-भाईंदरला वळविल्यामुळे डहाणू, पालघर तालुक्यातील १४ हजार ६९६ हेक्टर क्षेत्रांपैकी आठ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनातून वगळले जाणार आहे. तसेच, वाडा व जव्हार तालुक्यासाठीचा पिंजाळ सिंचन प्रकल्प गुंडाळून या प्रकल्पाचे सर्व पाणी मुंबईला नेण्यात येणार आहे. यामुळे पालघर ग्रामीण जिल्ह्यातील शेतकरी, आदिवासी उद्ध्वस्त होणार आहे. ग्रामीण जिल्ह्याला पिण्याच्या पाण्यापासूनही वंचित राहावे लागणार आहे.

शेतकरी व ग्रामस्थांच्या हक्काचे पाणी पळविण्याविरोधी हे बेमुदत उपोषण आंदोलन आहे. पालघर हुतात्मा चौक येथे हे आंदोलन सुरू आहे. जिल्ह्यातील नागरिकांकडून या आंदोलनाला भरपूर पाठिंबा मिळावा, अशी अपेक्षा आहे. पालघरात पाणी बचाव आंदोलनात सुरू असलेल्या या उपोषणास ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमाकांत पाटील, जितेंद्र राऊळ, ब्रायन लोबो, प्रकाश हाडळ, शिवराम काकड, बाळू डोकफोडे, महेंद्र चौधरी, तसेच अरविंद पाटील हे बेमुदत उपोषणास बसले आहेत.

या उपोषणास पाठिंबा व्यक्त करण्यासाठी राज्याचे माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व माजी आमदार नवनीतभाई शहा आदींनी प्रत्यक्ष भेट घेऊन पाठिंबा दिला. तसेच काँग्रेस, शिवसेना, जनता दल, आरपीआय, कष्टकरी संघटना, कुणबी सेना, आदींनी देखील प्रत्यक्ष सहभागी होऊन पाठिंब्याचे लेखी पत्र दिले. उपोषण करत्याची प्रक्रुती हळूहळू ढासळत चालली असून आंदोलन चिघळण्याआधी सरकारने याबाबत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी काँग्रेस नेते व माजी मंत्री राजेंद्र गावित यांनी केली आहे. हे उपोषण करणाऱ्यांबद्दल आस्था असणाऱ्यांनी उपोषणस्थळी येऊन एक पूर्ण दिवस उपोषण करून आंदोलनाला पाठिंबा द्यावा, तसेच आंदोलनास पाठिंबा असल्यास https://goo.gl/forms/Maw3I3pIWQowo2742 या लिंकवर 'लाइक' करावे, असे आवाहन सूर्या पाणी बचाव संघर्ष समितीतर्फे करण्यात आले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज