म. टा. वृत्तसेवा, कल्याण
दारिद्र्याने गांजलेल्या गोळीवली येथील उमेश शर्मा यांच्या एक दिवसाच्या तान्हुलीला उपचार मिळत नव्हते. डोंबिवलीतील काही तरुणांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी या मुलीला मदतीचा हात देत मुंबईतील रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत उशीर झाला. वेळत उपचार न मिळाल्याने या चिमुकलीचा मृत्यू झाला.
अठराविश्वे दारिद्र्य पाचवीला पुजलेल्या गोळीवली येथील उमेश शर्मा यांना पहिली मुलगी झाली. बाबा झाल्याचा आनंद साजरा करण्यापूर्वीच त्यांच्यासमोर आव्हाने येत गेली. या मुलीचे वजन कमी असल्यामुळे तिला इनक्युबेटरमध्ये ठेवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. मात्र मुलीच्या उपचाराचा खर्च परवडणारा नसल्यामुळे त्याने या नवजात अर्भकाला रिक्षानेच कळवा रुग्णालयात नेले. तिथेही तिच्यावर उपचार करता येणार नसल्याचे त्याला सांगण्यात आले. त्याने हताशपणे आपल्या चिमुकलीला घेऊन घर गाठले. कळवा ते डोंबिवलीच्या प्रवासात रडतच आपल्या एक दिवसाच्या मुलीचे मुके घेणाऱ्या बापाचे अश्रू पाहून हेलावलेल्या रिक्षावाल्याने या घटनेची माहिती डोंबिवलीतील मित्र संदीप नाईक यांना दिली. यानंतर डोंबिवलीकर तरुणांनी तातडीने या घटनेची माहिती देत या मुलीच्या उपचारासाठी प्रयत्न करण्याची तयारी दाखवत उमेश शर्माचे घर गाठले. नाईक आणि त्यांच्या मित्रांनी तातडीने वाडिया रुग्णालयात दाखल केले. या मुलीचे जन्मतःच अन्ननलिका आणि श्वसननलिका एकमेकांत गुंतलेल्या असल्याचे समोर आले. यावरे ऑपरेशनसुद्धा केले गेले. मात्र नवव्या दिवशी तिने अखेरचा निरोप घेतला.
दारिद्र्याने गांजलेल्या गोळीवली येथील उमेश शर्मा यांच्या एक दिवसाच्या तान्हुलीला उपचार मिळत नव्हते. डोंबिवलीतील काही तरुणांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी या मुलीला मदतीचा हात देत मुंबईतील रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत उशीर झाला. वेळत उपचार न मिळाल्याने या चिमुकलीचा मृत्यू झाला.
अठराविश्वे दारिद्र्य पाचवीला पुजलेल्या गोळीवली येथील उमेश शर्मा यांना पहिली मुलगी झाली. बाबा झाल्याचा आनंद साजरा करण्यापूर्वीच त्यांच्यासमोर आव्हाने येत गेली. या मुलीचे वजन कमी असल्यामुळे तिला इनक्युबेटरमध्ये ठेवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. मात्र मुलीच्या उपचाराचा खर्च परवडणारा नसल्यामुळे त्याने या नवजात अर्भकाला रिक्षानेच कळवा रुग्णालयात नेले. तिथेही तिच्यावर उपचार करता येणार नसल्याचे त्याला सांगण्यात आले. त्याने हताशपणे आपल्या चिमुकलीला घेऊन घर गाठले. कळवा ते डोंबिवलीच्या प्रवासात रडतच आपल्या एक दिवसाच्या मुलीचे मुके घेणाऱ्या बापाचे अश्रू पाहून हेलावलेल्या रिक्षावाल्याने या घटनेची माहिती डोंबिवलीतील मित्र संदीप नाईक यांना दिली. यानंतर डोंबिवलीकर तरुणांनी तातडीने या घटनेची माहिती देत या मुलीच्या उपचारासाठी प्रयत्न करण्याची तयारी दाखवत उमेश शर्माचे घर गाठले. नाईक आणि त्यांच्या मित्रांनी तातडीने वाडिया रुग्णालयात दाखल केले. या मुलीचे जन्मतःच अन्ननलिका आणि श्वसननलिका एकमेकांत गुंतलेल्या असल्याचे समोर आले. यावरे ऑपरेशनसुद्धा केले गेले. मात्र नवव्या दिवशी तिने अखेरचा निरोप घेतला.