अ‍ॅपशहर

जिल्ह्यातील ४४ गावांना जलसंजीवनी

मार्च-एप्रिल महिना उजाडला की राज्यात पाणीटंचाईचे संकट भेडसावू लागते. या पाणीबाणीपासून ठाणे जिल्हाही सुटलेला नाही. पाण्याच्या या दुष्काळापासून नागरिकांची कायमची सुटका व्हावी आणि पाऊस पडेपर्यंत गावकऱ्यांना मुबलक पाणी मिळावे, यासाठी राज्य सरकारच्या ‘जलयुक्त शिवार योजने’च्या माध्यमातून यंदाच्या वर्षी ठाणे जिल्ह्यातील ४४ गावे निवडण्यात आली असून या गावांना जलसंजीवनी मिळणार आहे.

Maharashtra Times 24 Jul 2017, 3:04 am
‘जलयुक्त शिवार योजने’तून होणार कामे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jalyukta shivar scheme thane district 44 villages will benefit
जिल्ह्यातील ४४ गावांना जलसंजीवनी


पंकज चव्हाण, ठाणे

मार्च-एप्रिल महिना उजाडला की राज्यात पाणीटंचाईचे संकट भेडसावू लागते. या पाणीबाणीपासून ठाणे जिल्हाही सुटलेला नाही. पाण्याच्या या दुष्काळापासून नागरिकांची कायमची सुटका व्हावी आणि पाऊस पडेपर्यंत गावकऱ्यांना मुबलक पाणी मिळावे, यासाठी राज्य सरकारच्या ‘जलयुक्त शिवार योजने’च्या माध्यमातून यंदाच्या वर्षी ठाणे जिल्ह्यातील ४४ गावे निवडण्यात आली असून या गावांना जलसंजीवनी मिळणार आहे.

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागांना दरवर्षी दुष्काळाचा सामना करावा लागतो. अनेक गावे या दुष्काळाने होरपळतात. यामध्ये शहापूर, मुरबाड, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ आदी तालुक्यांतील गावांमध्ये उन्हाळी पाण्याची गंभीर समस्या निर्माण होते. २०१५मध्ये या योजनेअंतर्गत २६ गावे निवडण्यात आली होती. तर, २०१६-१७मध्ये १८ गावांना या योजनेचा लाभ मिळाला होता. सन २०१५मध्ये शंभर टक्के गावांमध्ये ही योजना राबवून सुमारे ९०० हेक्टरपेक्षा अधिक जमीन सिंचित करण्यात आली होती. तर, २०१६मध्ये निवडण्यात आलेल्या गावांपैकी १४ गावांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. उर्वरित गावांची कामे ८० टक्के पूर्ण झाली आहेत. यामध्ये २१ कोटी ४३ लाख रुपये प्रशासनाने खर्च केले आहेत. यंदा २०१७-१८ या वर्षासाठी जिल्ह्यातील ४४ गावांची निवड करण्यात आली असल्यामुळे या गावांचीही पाणीटंचाई लवकरच दूर होईल.

यंदाही लोकसहभाग आणि जिल्ह्यातील विविध कंपन्यांच्या सीएसआर फंडातून चालू हंगामात कामे करण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, कृषी अधिकारी महावीर जंगाटे आणि जिल्हा प्रशासनाची यंत्रणा या कामाकडे लक्ष ठेवून आहे. त्यामुळे आतापर्यंत ६६ गावांतील एकूण ८० गावतलाव, बंधाऱ्यातील गाळ काढण्याची कामे पूर्ण करण्यात आली असून १ लाख ७८ हजार ६९२ घ. मी गाळ उपसण्यात आला आहे. यासाठी सुमारे २५५.५३ लाख खर्च करण्यात आला आहे. ०००

चौकट

निवडण्यात आलेली गावे ( तालुकानिहाय )

शहापूर - १६

मुरबाड - १४

भिवंडी - ९

कल्याण - ३

अंबरनाथ - २

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज