अ‍ॅपशहर

'नेवाळीतील जमीन संरक्षण खात्याचीच'

'कल्याण-नेवाळी येथील 'ती' जमीन संरक्षण खात्याच्या मालकीची आहे. सरकार दरबारीही तशी नोंद असून त्या जमिनीचा सातबाराही संरक्षण खात्याच्या मालमत्ता विभागाकडं आहे,' असं संरक्षण मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.

Maharashtra Times 22 Jun 2017, 3:23 pm
मटा ऑनलाइन वृत्त । कल्याण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kalyan land in nevali is owned by ministry of defence
'नेवाळीतील जमीन संरक्षण खात्याचीच'


'कल्याण-नेवाळी येथील 'ती' जमीन संरक्षण खात्याच्या मालकीची आहे. सरकार दरबारीही तशी नोंद असून त्या जमिनीचा सातबाराही संरक्षण खात्याच्या मालमत्ता विभागाकडं आहे,' असं संरक्षण मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात संरक्षण खात्यानं संपादित केलेल्या नेवाळी येथील १६०० एकर जमिनीवरून सध्या वाद सुरू आहे. नेवाळी येथील शेतकऱ्यांनी जमीन परत मिळवण्यासाठी हिंसक आंदोलन सुरू केलं असून पोलिसांनाही लक्ष्य केलं आहे. त्यामुळं या जमिनीची मालकी नेमकी कोणाची, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. संरक्षण खात्याच्या जनसंपर्क कार्यालयानं या प्रकरणी पत्रक प्रसिद्धीस देऊन खुलासा केला आहे. 'नेवाळीतील जमीन संरक्षण खात्यानं संपादित केली आहे. या जागेवर अतिक्रमण होऊ नये म्हणून भारतीय नौदलाकडून या जागेभोवती संरक्षक भिंत बांधण्याचं काम सुरू आहे. महाराष्ट्र सरकारलाही याची पूर्ण कल्पना असून त्यांनी त्यासाठी पोलीस संरक्षणही दिलं आहे,' असं संरक्षण खात्याचे मुंबई विभागीय जनसंपर्क अधिकारी कमांडर राहुल सिन्हा यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज