डोंबिवली : कल्याणच्या तहसीलदार कार्यालयातील सेतू विभागात प्रचंड अनागोंदी कारभार सुरू असून पैसे देणाऱ्याला प्राधान्य मिळत असल्याचा आरोप कल्याण - डोंबिवलीचे सभागृह नेते राजेश मोरे यांनी केला आहे. तहसीलदारांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी आणि कारभार सुरळीत करावा, अशी मागणीही केली आहे.
याची दखल घेतल्यास आंदोलन करावे लागेल आणि त्याची जबाबदारी आंदोलनकर्त्यांची नसेल, असा इशाराही मोरे यांनी दिला. दाखले काढायचे असोत की डोमेसाईल सर्टीफिकेट सर्वसामान्यांना अनेक समस्या भेडसावतात. त्यामागे केवळ पैसे काढणे हा एकच उद्देश असल्याचा आरोप त्यांनी केला. जे पैसे देऊ शकतात, देतात त्यांची कामे जलद गतीने होतात. पण जे नागरिक पैसे देऊ शकत नाहीत किंवा देत नाहीत त्यांची मात्र अडचण होते. विद्यार्थी, ज्येष्ठांसह अनेकांना त्याचा त्रास होत आहे, असा आरोप त्यांनी केला.
याची दखल घेतल्यास आंदोलन करावे लागेल आणि त्याची जबाबदारी आंदोलनकर्त्यांची नसेल, असा इशाराही मोरे यांनी दिला. दाखले काढायचे असोत की डोमेसाईल सर्टीफिकेट सर्वसामान्यांना अनेक समस्या भेडसावतात. त्यामागे केवळ पैसे काढणे हा एकच उद्देश असल्याचा आरोप त्यांनी केला. जे पैसे देऊ शकतात, देतात त्यांची कामे जलद गतीने होतात. पण जे नागरिक पैसे देऊ शकत नाहीत किंवा देत नाहीत त्यांची मात्र अडचण होते. विद्यार्थी, ज्येष्ठांसह अनेकांना त्याचा त्रास होत आहे, असा आरोप त्यांनी केला.