अ‍ॅपशहर

कल्याण सेतूमध्ये अनागोंदी?

कल्याणच्या तहसीलदार कार्यालयातील सेतू विभागात प्रचंड अनागोंदी कारभार सुरू असून पैसे देणाऱ्याला प्राधान्य मिळत असल्याचा आरोप कल्याण - डोंबिवलीचे सभागृह नेते राजेश मोरे यांनी केला आहे. तहसीलदारांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी आणि कारभार सुरळीत करावा, अशी मागणीही केली आहे.

Maharashtra Times 23 Jun 2017, 3:00 am
डोंबिवली : कल्याणच्या तहसीलदार कार्यालयातील सेतू विभागात प्रचंड अनागोंदी कारभार सुरू असून पैसे देणाऱ्याला प्राधान्य मिळत असल्याचा आरोप कल्याण - डोंबिवलीचे सभागृह नेते राजेश मोरे यांनी केला आहे. तहसीलदारांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी आणि कारभार सुरळीत करावा, अशी मागणीही केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kalyan setu have irregularities accused rajesh more
कल्याण सेतूमध्ये अनागोंदी?


याची दखल घेतल्यास आंदोलन करावे लागेल आणि त्याची जबाबदारी आंदोलनकर्त्यांची नसेल, असा इशाराही मोरे यांनी दिला. दाखले काढायचे असोत की डोमेसाईल सर्टीफिकेट सर्वसामान्यांना अनेक समस्या भेडसावतात. त्यामागे केवळ पैसे काढणे हा एकच उद्देश असल्याचा आरोप त्यांनी केला. जे पैसे देऊ शकतात, देतात त्यांची कामे जलद गतीने होतात. पण जे नागरिक पैसे देऊ शकत नाहीत किंवा देत नाहीत त्यांची मात्र अडचण होते. विद्यार्थी, ज्येष्ठांसह अनेकांना त्याचा त्रास होत आहे, असा आरोप त्यांनी केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज