केडीएमसी शाळा, कॉलेजमध्ये कचरा जमा करणार
म. टा. प्रतिनिधी, कल्याण
कल्याण-डोंबिवलीची बकाल, अस्वच्छ ही प्रतिमा पालटून ही शहरे स्वच्छ करण्याच्या उद्देशाने जोरदार प्रयत्न पालिकेने सुरू केले आहेत. शहर स्वच्छतेसोबतच पर्यावरणाला अत्यंत घातक ठरणारा ई वेस्ट जमा करून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासही आता केडीएमसीने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी १४ ऑगस्ट रोजी महापालिका हद्दीतील प्रत्येक शाळा व कॉलेजांमधून पालिकेचे कर्मचारी ई वेस्ट व प्लास्टिक जमा करणार आहेत.
कल्याण-डोंबिवलीच्या मध्यवर्ती स्वच्छता समितीची महत्त्वाची बैठक सोमवारी बिर्ला कॉलेजच्या सभागृहात पार पडली. या बैठकीला महापौर राजेंद्र देवळेकर, उपमहापौर मोरेश्वर भोईर, बिर्ला कॉलेजचे प्राचार्य डॉ. नरेशचंद्र, डॉ. उल्हास कोल्हटकर यांच्यासह पालिकेचे अधिकारी व स्थानिक पर्यावरणवादी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
अलीकडच्या काळात कम्प्युटर, टीव्ही, इन्व्हर्टर, मोबाइल, डीजिटल कॅमेरा आदी इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर कमालीचा वाढला आहे. काही कालावधीनंतर या वस्तू नादुरुस्त झाल्यावर त्या टाकून दिल्या जातात. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्ड, नवी दिल्लीमार्फत २००५मध्ये करण्यात आलेल्या देशव्यापी सर्वेक्षणात भारतामध्ये त्यावर्षी दीड लाख मेट्रिक टन ई वेस्ट जमा झाले होते. सन २०१२मध्ये हे प्रमाण पाच पटीने वाढून तब्बल ८ लाख टनांवर गेल्याचे या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले. सध्या हे प्रमाण आणखी किमान दुपटीने वाढले असण्याचा अंदाज आहे.
ई वेस्टची विल्हेवाट लावणे अत्यंत जिकरीचे काम आहे. घरगुती वस्तू भंगारात विकणे किंवा त्या जाळणे इतकाच पर्याय सर्वसामान्यांसमोर राहतो. तशीच परिस्थिती प्लास्टिकबाबतही असते. परंतु ई वेस्ट तसेच प्लास्टिक जाळल्यास पर्यावरणावर त्याचे अतिशय घातक परिणाम दीर्घकाळासाठी होतात. त्यामुळे शहर स्वच्छतेमध्ये ई वेस्ट व प्लास्टिक यांची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेने पुढाकार घ्यावा, अशी सूचना मध्यवर्ती स्वच्छता समितीच्या बैठकीत सोमवारी पुढे आली. त्यानुसार याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे.
स्वच्छतेची प्रतिज्ञा
८ ऑगस्ट रोजी पालिका क्षेत्रातील सर्व शाळा व कॉलेजांमध्ये विद्यार्थ्यांना स्वच्छतेची प्रतिज्ञा दिली जाणार असल्याची माहिती उपायुक्त धनाजी तोरस्कर यांनी दिली. त्यानंतरच्या आठवडाभरात व्यापक जनजागृती करून प्रत्येक शाळा व कॉलेजांमध्ये ई वेस्ट व प्लास्टिक पालिकेचे कर्मचारी जमा करणार आहेत. ज्या शाळा किंवा कॉलेजमधून सर्वाधिक कचरा जमा होईल, त्यांच्यासाठी आकर्षक बक्षिसे पालिकेकडून दिली जातील. सर्व सहभागी शाळांचा प्रशस्तिपत्राने गौरव केला जाणार आहे.
म. टा. प्रतिनिधी, कल्याण
कल्याण-डोंबिवलीची बकाल, अस्वच्छ ही प्रतिमा पालटून ही शहरे स्वच्छ करण्याच्या उद्देशाने जोरदार प्रयत्न पालिकेने सुरू केले आहेत. शहर स्वच्छतेसोबतच पर्यावरणाला अत्यंत घातक ठरणारा ई वेस्ट जमा करून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासही आता केडीएमसीने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी १४ ऑगस्ट रोजी महापालिका हद्दीतील प्रत्येक शाळा व कॉलेजांमधून पालिकेचे कर्मचारी ई वेस्ट व प्लास्टिक जमा करणार आहेत.
कल्याण-डोंबिवलीच्या मध्यवर्ती स्वच्छता समितीची महत्त्वाची बैठक सोमवारी बिर्ला कॉलेजच्या सभागृहात पार पडली. या बैठकीला महापौर राजेंद्र देवळेकर, उपमहापौर मोरेश्वर भोईर, बिर्ला कॉलेजचे प्राचार्य डॉ. नरेशचंद्र, डॉ. उल्हास कोल्हटकर यांच्यासह पालिकेचे अधिकारी व स्थानिक पर्यावरणवादी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
अलीकडच्या काळात कम्प्युटर, टीव्ही, इन्व्हर्टर, मोबाइल, डीजिटल कॅमेरा आदी इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर कमालीचा वाढला आहे. काही कालावधीनंतर या वस्तू नादुरुस्त झाल्यावर त्या टाकून दिल्या जातात. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्ड, नवी दिल्लीमार्फत २००५मध्ये करण्यात आलेल्या देशव्यापी सर्वेक्षणात भारतामध्ये त्यावर्षी दीड लाख मेट्रिक टन ई वेस्ट जमा झाले होते. सन २०१२मध्ये हे प्रमाण पाच पटीने वाढून तब्बल ८ लाख टनांवर गेल्याचे या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले. सध्या हे प्रमाण आणखी किमान दुपटीने वाढले असण्याचा अंदाज आहे.
ई वेस्टची विल्हेवाट लावणे अत्यंत जिकरीचे काम आहे. घरगुती वस्तू भंगारात विकणे किंवा त्या जाळणे इतकाच पर्याय सर्वसामान्यांसमोर राहतो. तशीच परिस्थिती प्लास्टिकबाबतही असते. परंतु ई वेस्ट तसेच प्लास्टिक जाळल्यास पर्यावरणावर त्याचे अतिशय घातक परिणाम दीर्घकाळासाठी होतात. त्यामुळे शहर स्वच्छतेमध्ये ई वेस्ट व प्लास्टिक यांची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेने पुढाकार घ्यावा, अशी सूचना मध्यवर्ती स्वच्छता समितीच्या बैठकीत सोमवारी पुढे आली. त्यानुसार याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे.
स्वच्छतेची प्रतिज्ञा
८ ऑगस्ट रोजी पालिका क्षेत्रातील सर्व शाळा व कॉलेजांमध्ये विद्यार्थ्यांना स्वच्छतेची प्रतिज्ञा दिली जाणार असल्याची माहिती उपायुक्त धनाजी तोरस्कर यांनी दिली. त्यानंतरच्या आठवडाभरात व्यापक जनजागृती करून प्रत्येक शाळा व कॉलेजांमध्ये ई वेस्ट व प्लास्टिक पालिकेचे कर्मचारी जमा करणार आहेत. ज्या शाळा किंवा कॉलेजमधून सर्वाधिक कचरा जमा होईल, त्यांच्यासाठी आकर्षक बक्षिसे पालिकेकडून दिली जातील. सर्व सहभागी शाळांचा प्रशस्तिपत्राने गौरव केला जाणार आहे.