म. टा. वृत्तसेवा, कल्याण
कल्याण-डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसरात अनेक वर्षांपासून पडलेला फेरीवाल्यांचा विळखा सोडवण्यासाठी कल्याण पश्चिमेकडील सर्वोदय मॉल आणि खडकपाडा येथील मोकळ्या भूखंडावर त्यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. पुढील आठ दिवसांत कल्याण स्थानकातील फेरीवाल्यांना या ठिकाणी स्थलांतरित केले जाणार असल्यामुळे स्टेशन परिसराची फेरीवाल्यांच्या विळख्यातून सुटका होऊ शकेल, असा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
कल्याण-डोंबिवलीसह आजुबाजूच्या स्टेशन परिसरात आणि स्कायवॉकवर फेरीवाल्यांनी बस्तान बसविले असून फूटपाथवरून आणि स्कायवॉकवरून चालणाऱ्या नागरिकांना फेरीवाल्यांची दादागिरी सहन करावी लागत आहे. या फेरीवाल्यांमुळे स्टेशन परिसरात वाहतूककोंडी होण्यासह स्टेशन परिसराला बकाल अवस्था प्राप्त झाली आहे. या फेरीवाल्यांची मुजोरी वाढल्यामुळे सोमवारी डोंबिवलीत शिवसेना पदाधिकारी आणि नगरसेवकांनी रस्त्यावर उतरत फेरीवाल्यांविरोधात एल्गार पुकारला होता. फेरीवाल्यांचे सामान रस्त्यावर फेकत फेरीवाल्यांना स्टेशन परिसरातून हटविण्याची आग्रही मागणी केली.
यानंतर फेरीवाल्यांना मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हेही दाखल करण्यात आले. मात्र मंगळवारी सकाळी पुन्हा फेरीवाल्यांनी स्टेशन परिसरात ठाण मांडल्यामुळे संतापलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दोन दिवसांत फेरीवाल्यांना न हटविल्यास शिवसेना स्टाइलने आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनाची जबाबदारी पालिका प्रशासनाची राहील, असा इशारा शिवसेना डोंबिवली शहर प्रमुख भाऊसाहेब चौधरी आणि महिला आघाडी प्रमुख कविता गावंड यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांना हे निवेदन देण्यात आल्यानंतर स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांना हटवण्यात आले. मात्र पुन्हा फेरीवाले स्टेशन परिसरात आक्रमण करत असून यासाठी पालिकेने दोन शहरांत दोन उपायुक्त आणि टीम नियुक्ती करण्यात आली आहे.
मात्र या फेरीवाल्यांना हटविण्यासाठी पालिका प्रशासन, पोलिस आणि सामाजिक संस्था यांनी एकत्रित येत कारवाईत सातत्य राखणे आवश्यक आहे. शिवसेनेचे यासाठी सहकार्य घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. या फेरीवाल्यांचे पुनर्वसन केल्याखेरीज स्टेशन परिसर
मोकळा होणे शक्य नसल्यामुळे पालिकेकडून सर्वेक्षण झालेल्या फेरीवाल्याचे स्टेशन परिसरातील सर्वोदय मॉल येथील मोकळ्या जागेत, खडकपाडा येथील भूखंडावर कायमचे पुनर्वसन करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला.
डोंबिवलीत भूखंड शोधणार
पुढील आठ दिवसांत सर्वोदय मॉलजवळील भूखंडाच्या सपाटीकरणाचे काम पूर्ण होणार आहे. यामुळे स्टेशन परिसर रिकामा होण्याचा दावा घरत यांनी केला आहे. तर, डोंबिवली स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांसाठीदेखील असा भूखंड शोधून या ठिकाणी या फेरीवाल्याचे स्थलांतर केले जाईल, असे आश्वासन घरत यांनी शिष्टमंडळाला दिले.
कल्याण-डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसरात अनेक वर्षांपासून पडलेला फेरीवाल्यांचा विळखा सोडवण्यासाठी कल्याण पश्चिमेकडील सर्वोदय मॉल आणि खडकपाडा येथील मोकळ्या भूखंडावर त्यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. पुढील आठ दिवसांत कल्याण स्थानकातील फेरीवाल्यांना या ठिकाणी स्थलांतरित केले जाणार असल्यामुळे स्टेशन परिसराची फेरीवाल्यांच्या विळख्यातून सुटका होऊ शकेल, असा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
कल्याण-डोंबिवलीसह आजुबाजूच्या स्टेशन परिसरात आणि स्कायवॉकवर फेरीवाल्यांनी बस्तान बसविले असून फूटपाथवरून आणि स्कायवॉकवरून चालणाऱ्या नागरिकांना फेरीवाल्यांची दादागिरी सहन करावी लागत आहे. या फेरीवाल्यांमुळे स्टेशन परिसरात वाहतूककोंडी होण्यासह स्टेशन परिसराला बकाल अवस्था प्राप्त झाली आहे. या फेरीवाल्यांची मुजोरी वाढल्यामुळे सोमवारी डोंबिवलीत शिवसेना पदाधिकारी आणि नगरसेवकांनी रस्त्यावर उतरत फेरीवाल्यांविरोधात एल्गार पुकारला होता. फेरीवाल्यांचे सामान रस्त्यावर फेकत फेरीवाल्यांना स्टेशन परिसरातून हटविण्याची आग्रही मागणी केली.
यानंतर फेरीवाल्यांना मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हेही दाखल करण्यात आले. मात्र मंगळवारी सकाळी पुन्हा फेरीवाल्यांनी स्टेशन परिसरात ठाण मांडल्यामुळे संतापलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दोन दिवसांत फेरीवाल्यांना न हटविल्यास शिवसेना स्टाइलने आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनाची जबाबदारी पालिका प्रशासनाची राहील, असा इशारा शिवसेना डोंबिवली शहर प्रमुख भाऊसाहेब चौधरी आणि महिला आघाडी प्रमुख कविता गावंड यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांना हे निवेदन देण्यात आल्यानंतर स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांना हटवण्यात आले. मात्र पुन्हा फेरीवाले स्टेशन परिसरात आक्रमण करत असून यासाठी पालिकेने दोन शहरांत दोन उपायुक्त आणि टीम नियुक्ती करण्यात आली आहे.
मात्र या फेरीवाल्यांना हटविण्यासाठी पालिका प्रशासन, पोलिस आणि सामाजिक संस्था यांनी एकत्रित येत कारवाईत सातत्य राखणे आवश्यक आहे. शिवसेनेचे यासाठी सहकार्य घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. या फेरीवाल्यांचे पुनर्वसन केल्याखेरीज स्टेशन परिसर
मोकळा होणे शक्य नसल्यामुळे पालिकेकडून सर्वेक्षण झालेल्या फेरीवाल्याचे स्टेशन परिसरातील सर्वोदय मॉल येथील मोकळ्या जागेत, खडकपाडा येथील भूखंडावर कायमचे पुनर्वसन करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला.
डोंबिवलीत भूखंड शोधणार
पुढील आठ दिवसांत सर्वोदय मॉलजवळील भूखंडाच्या सपाटीकरणाचे काम पूर्ण होणार आहे. यामुळे स्टेशन परिसर रिकामा होण्याचा दावा घरत यांनी केला आहे. तर, डोंबिवली स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांसाठीदेखील असा भूखंड शोधून या ठिकाणी या फेरीवाल्याचे स्थलांतर केले जाईल, असे आश्वासन घरत यांनी शिष्टमंडळाला दिले.