म. टा. वृत्तसेवा, कल्याण
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गात बाधित शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला सरकारकडून ठरविण्यात आला असून आतापर्यंत ३० हेक्टर जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांना दिलेले दर मान्य नाहीत त्या शेतकऱ्यांना जमिनी देण्यासाठी दबाव टाकला जाणार नसून शेतकऱ्यांना मोबदला मान्य झाल्यानंतरच त्यांनी त्यांच्या जमिनी हस्तांतरित कराव्यात, असे प्रांताधिकारी प्रसाद उकिर्डे यांनी स्पष्ट केले. समृद्धी महामार्गात बाधित होत असलेल्या कल्याण तालुक्यातील १० गावांमधील शेतकऱ्यांच्या बाधित भूखंडासाठी सरकारकडून ठरविण्यात आलेल्या दरात मोठी तफावत असून यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. म्हणूनच या गावासाठी समान दर दिले जावेत, या मागणीसाठी १० गावांतील शेतकऱ्यांनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण छेडले आहे. या उपोषणकर्त्यांची प्रांताधिकाऱ्यांनी भेट घेत त्यांच्या मागण्या सरकारकडे पाठविण्याचे आश्वासन दिले.
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गात बाधित शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला सरकारकडून ठरविण्यात आला असून आतापर्यंत ३० हेक्टर जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांना दिलेले दर मान्य नाहीत त्या शेतकऱ्यांना जमिनी देण्यासाठी दबाव टाकला जाणार नसून शेतकऱ्यांना मोबदला मान्य झाल्यानंतरच त्यांनी त्यांच्या जमिनी हस्तांतरित कराव्यात, असे प्रांताधिकारी प्रसाद उकिर्डे यांनी स्पष्ट केले. समृद्धी महामार्गात बाधित होत असलेल्या कल्याण तालुक्यातील १० गावांमधील शेतकऱ्यांच्या बाधित भूखंडासाठी सरकारकडून ठरविण्यात आलेल्या दरात मोठी तफावत असून यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. म्हणूनच या गावासाठी समान दर दिले जावेत, या मागणीसाठी १० गावांतील शेतकऱ्यांनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण छेडले आहे. या उपोषणकर्त्यांची प्रांताधिकाऱ्यांनी भेट घेत त्यांच्या मागण्या सरकारकडे पाठविण्याचे आश्वासन दिले.