वसई :
गणेशोत्सव हा भारतीय संस्कृतीचा व स्वातंत्र्यलढ्याचा साक्षीदार असलेला उत्सव आहे. फक्त भारतातच नव्हे तर जगभरात गणेशोत्सव उत्साहाने साजरा केला जातो. त्यामुळे या निमित्ताने पालघर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना गेणेशोत्सवांदरम्यान किमान पाच दिवस सुट्टी मिळावी, अशी मागणी 'आमची वसई' या संस्थेतर्फे करण्यात आली आहे.
वसईतील बौद्ध, ख्रिस्ती व मुस्लिम बांधव तसेच अनेक ख्रिस्ती बांधव हे गणेशोत्सवात बाप्पाच्या दर्शनासाठी व आशीर्वाद घेण्यासाठी आवर्जून मित्रपरिवाराकडे जातात. १२६ वर्षांचा समृद्ध सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहास असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवात सर्व समाज एकत्र येतो. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना सार्वजनिक गणेशोत्सव कार्यक्रमात प्रोत्साहन मिळते. तसेच सार्वजनिक तसेच घरगुती गणेशोत्सवात नातेवाईकांच्या भेटीगाठी होतात. तसेच विभक्त कुटुंब पद्धतीत नाती दुरावली आहेत. मित्र नातेवाईकांच्या भेटी होत नाहीत. परंतु गणेशोत्सवाच्या निमित्ताने कुटुंबच नव्हे तर समाजसुद्धा एकत्र येतो. ज्या शाळांमध्ये गणेशोत्सवाची सुट्टी नाही, तिथले विद्यार्थी या आनंदाला मुकत आहेत. त्यामुळे त्यांना हा आनंद घेता यावा यासाठी गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही जिल्हा प्रशासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात यावी, अशी मागणी संस्थेने केली आहे.
गणेशोत्सव हा भारतीय संस्कृतीचा व स्वातंत्र्यलढ्याचा साक्षीदार असलेला उत्सव आहे. फक्त भारतातच नव्हे तर जगभरात गणेशोत्सव उत्साहाने साजरा केला जातो. त्यामुळे या निमित्ताने पालघर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना गेणेशोत्सवांदरम्यान किमान पाच दिवस सुट्टी मिळावी, अशी मागणी 'आमची वसई' या संस्थेतर्फे करण्यात आली आहे.
वसईतील बौद्ध, ख्रिस्ती व मुस्लिम बांधव तसेच अनेक ख्रिस्ती बांधव हे गणेशोत्सवात बाप्पाच्या दर्शनासाठी व आशीर्वाद घेण्यासाठी आवर्जून मित्रपरिवाराकडे जातात. १२६ वर्षांचा समृद्ध सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहास असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवात सर्व समाज एकत्र येतो. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना सार्वजनिक गणेशोत्सव कार्यक्रमात प्रोत्साहन मिळते. तसेच सार्वजनिक तसेच घरगुती गणेशोत्सवात नातेवाईकांच्या भेटीगाठी होतात. तसेच विभक्त कुटुंब पद्धतीत नाती दुरावली आहेत. मित्र नातेवाईकांच्या भेटी होत नाहीत. परंतु गणेशोत्सवाच्या निमित्ताने कुटुंबच नव्हे तर समाजसुद्धा एकत्र येतो. ज्या शाळांमध्ये गणेशोत्सवाची सुट्टी नाही, तिथले विद्यार्थी या आनंदाला मुकत आहेत. त्यामुळे त्यांना हा आनंद घेता यावा यासाठी गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही जिल्हा प्रशासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात यावी, अशी मागणी संस्थेने केली आहे.