अ‍ॅपशहर

दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा बळी, वाद सोडवणाऱ्या मध्यस्थाचा मारहाणीत मृत्यू

मलंगगड भागातील आंभे गावातील अभिमन्यू भाग्यवंत आणि गंगाराम भाग्यवंत यांची शुक्रवारी भांडणं झाली होती. गावात झालेलं भांडण पाहून काथोड भाग्यवंत हे भांडण सोडवण्यासाठी गेले होते. हा प्रयत्नच त्यांना भोवला, कारण अभिमन्यूने काथोड यांना जबर मारहाण केली,

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 May 2022, 2:58 pm
कल्याण : दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ ही म्हण सर्वश्रुत आहे. मात्र दोघांच्या भांडणात तिसऱ्याला जीवास मुकावे लागल्याचा प्रकार समोर आला आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याणजवळ ही घटना घडली आहे. दोघांमधील भांडण सोडवायला आलेल्या तिसऱ्या व्यक्तीलाच प्राण गमवावे लागले. लाकडी दांडक्याने जबर मारहाण झाल्यामुळे जखमी तरुणाने उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. उल्हासनगरच्या हिललाईन पोलिसांनी आरोपींच्या विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. चांगुलपणा दाखवत भांडण सोडवायला जाण्याचा प्रयत्न तरुणाच्या जीवावर बेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Kalyan Fight mediate
भांडणात मध्यस्थी करणाऱ्या तरुणाचा मारहाणीत मृत्यू


नेमकं काय घडलं?

मलंगगड भागातील आंभे गावातील अभिमन्यू भाग्यवंत आणि गंगाराम भाग्यवंत यांची शुक्रवारी भांडणं झाली होती. गावात झालेलं भांडण पाहून काथोड भाग्यवंत हे भांडण सोडवण्यासाठी गेले होते. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या काथोड यांना जबर मारहाण करण्यात आली होती. काथोडवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते, मात्र उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने हिललाईन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विवाहितेचे अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, एक्स-बॉयफ्रेण्डवर गुन्हा
मलंगगड भागात सध्या जमिनीचे वाद चांगलेच उफाळून आले असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागात जमिनीच्या वादांमधून सततच हाणामारीच्या घटना घडत असल्याचे दिसून येत आहेत. ही भांडण सोडवायला पोलिसांना देखील मोठी दमछाक करावी लागत आहे.

शुक्रवारी देखील अभिमन्यू भाग्यवंत आणि गंगाराम भाग्यवंत यांची भांडणं सुरु होती. सुरु असलेले भांडण पाहून काथोड भाग्यवंत यांनी या भांडणात मध्यस्थी करत भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडणं काथोड यांच्या जीवावर बेतलं आहे.
वडिलांना कुणी पैसे देऊ नका, बकरा विक्रीवरुन वाद, बापाने मुलाला कुऱ्हाडीने संपवलं
आरोपी अभिमन्यू महादू भाग्यवंत यांनी काथोडच्या डोक्यावर, पाठीवर, हातावर आणि दंडावर लाकडी दांडक्याने गंभीर स्वरूपाची दुखापत केली होती. त्यामुळे काथोड यांना उपचारासाठी विविध रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान काथोड भाग्यवंत याला आपला जीव गमवावा लागला आहे. उल्हासनगरच्या हिललाईन पोलिसांनी आरोपींच्या विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून सध्या पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज