अ‍ॅपशहर

ठाण्यात आंबा महोत्सव

म टा...

Maharashtra Times 24 Apr 2018, 5:00 am

म. टा. वृत्तसेवा, ठाणे

महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषी पणन मंडळ पुरस्कृत संस्कार व कोकण विकास प्रतिष्ठानच्या वतीने आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. १ मे रोजी सायंकाळी ४.३० वाजता या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. हा महोत्सव गावदेवी मैदान येथे १० मेपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शेतकऱ्यांना भाव मिळावा आणि ग्राहकांना चांगल्या प्रतीचा आंबा चाखायला मिळावा म्हणून गेल्या १३ वर्षांपासून चळवळीच्या माध्यमातून या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती केळकर यांनी दिली. यंदाच्या महोत्सवात ५५ प्रकारचे स्टॉल असून सेंद्रीय पद्धतीने पिकविलेल्या हापूस आंब्याला मागणी अधिक आहे. या महोत्सवाला अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि निर्मिती सावंत भेट देणार आहेत. या महोत्सवाचा ठाणेकरांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज