ठाणे : कोपर्डी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी राज्यभरात मराठा समाजाचे लाखोंचे मोर्चे निघत असताना, ही लाट आता मुंबईच्या सीमेवर धडकत आहे. ठाण्यात १६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता मराठा क्रांती मोर्चा निघणार असल्याचे रविवारी गडकरी रंगायतनमधील आयोजीत मेळाव्यात जाहीर करण्यात आले आहे.
मोर्चाच्या ठाण्यातील समन्वय समितीने एक मेळावा रविवारी सकाळी ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये बोलावला होता. या मेळाव्याला जवळपास तीन ते साडेतीन हजार जण उपस्थित होते. मोर्चा यशस्वी करण्यासाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या. तसेच, १६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता ठाण्यातील तीन हात नाका चौकातून निघणारा हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. लाखो लोकांमुळे वाहतूक व्यवस्था कोलमडून पडण्याची शक्यता असून त्यासाठी पोलिसांनी नियोजन करावे आणि टोलनाके त्यादिवशी बंद ठेवावेत, अशी मागणीसुद्धा यावेळी करण्यात आली. वर्सोवा पुलाच्या दुरुस्तीमुळे ठाणे परिसरात होत असलेल्या वाहतूककोंडीचा परिणाम १६ ऑक्टोबरच्या भव्य मराठा मूक मोर्चावर होऊ नये, यासाठी मराठा समाजातील नेते, लोकप्रतिनिधी आणि विविध संघटनांनी प्रयत्न सुरू असल्याचेही सांगण्यात आले.
मोर्चाच्या ठाण्यातील समन्वय समितीने एक मेळावा रविवारी सकाळी ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये बोलावला होता. या मेळाव्याला जवळपास तीन ते साडेतीन हजार जण उपस्थित होते. मोर्चा यशस्वी करण्यासाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या. तसेच, १६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता ठाण्यातील तीन हात नाका चौकातून निघणारा हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. लाखो लोकांमुळे वाहतूक व्यवस्था कोलमडून पडण्याची शक्यता असून त्यासाठी पोलिसांनी नियोजन करावे आणि टोलनाके त्यादिवशी बंद ठेवावेत, अशी मागणीसुद्धा यावेळी करण्यात आली. वर्सोवा पुलाच्या दुरुस्तीमुळे ठाणे परिसरात होत असलेल्या वाहतूककोंडीचा परिणाम १६ ऑक्टोबरच्या भव्य मराठा मूक मोर्चावर होऊ नये, यासाठी मराठा समाजातील नेते, लोकप्रतिनिधी आणि विविध संघटनांनी प्रयत्न सुरू असल्याचेही सांगण्यात आले.