म. टा. वृत्तसेवा, ठाणे
स्मार्ट होण्याचा प्रयत्न करणाऱ्या शहरांत अत्याधुनिक सुविधांची सरशी असली तरी कौटुंबिक वादाच्या मानसिकतेत बदल झालेला नसल्याचे निरीक्षण ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयाच्या आत्महत्या प्रतिबंधक केंद्रातर्फे नोंदविण्यात आलेे. रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या आत्महत्या प्रतिबंधक समुपदेशन केंद्रात येणाऱ्या रुग्णांमध्ये महिलांची संख्या अधिक असून बहुतांश रुग्णांकडून कौटुंबिक वादाच्या समस्या मांडल्या जात आहेत.
स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या शहरांमध्ये घरांपासून मॉल्सपर्यंत अनेक सुविधा असल्या तरी मानसिकता मात्र बदललेली नाही. शहरांचा विकास होत असला तरी तेथे नागरिकांच्या घराघरात अद्याप कौटुंबिक वादाचे प्रमाण कायम असल्याचे दिसून येते. सासरच्या मंडळींकडून होणारा त्रास, पतीकडून घेतला जाणारा संशय अशा कारणांमुळे भांडणांची संख्या वाढत आहे. या वादाच्या अतिरेकामुळे आत्महत्येचे पाऊल उचलणाऱ्यांचे प्रमाणही अधिक आहे. आत्महत्येच्या वाटेवर चालणाऱ्या रुग्णांचे समुपदेशन करून त्यांना अशी कृती करण्यापासून परावृत्त करण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलने सुरू केलेल्या केंद्रात उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये महिलांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. सर्वाधिक रुग्णांमध्ये कौटुंबिक वाद हे एकमेव कारण असल्याचे केंद्रातील डॉक्टरांकडून सांगण्यात येते. यामध्ये सासरच्या मंडळींकडून दिला जाणारा मानसिक ताण, काही घरांमध्ये होणारी मारहाण, शिक्षणासाठी केली जाणारी बंदी, पतीकडून घेतला जाणारा संशय अशा कारणांमुळे महिला आत्महत्येसारख्या टोकाच्या निर्णयास पोहोचल्या असल्याचे या केंद्राकडून सांगण्यात येते.
सप्टेंबर महिन्यात आत्महत्येच्या निर्णयांपर्यंत आलेल्या रुग्णांमध्ये चार पुरुष असून महिलांची संख्या १० आहे तर ऑक्टोबर महिन्यात तीन पुरुष असून सात महिलांनी उपचार घेतले आहेत. नोव्हेंबरमध्ये दोन पुरुष रुग्ण असून महिलांची संख्या सात आहे. तिन्ही महिन्यांमध्ये स्त्रियांची संख्या अधिक असून कौटुंबिक कलह हेच कारण असल्याचे वारंवार दिसून येत आहे. या केंद्रात मानसोपचार तज्ज्ञ डॉ. खुशबू चव्हाण, डॉ. क्षमा राठोड हे रुग्णांवर उपचार करत असून मनोविकृती सामाजिक कार्यकर्ते श्रीरंग सिद हे काम करत आहेत.
स्मार्ट होण्याचा प्रयत्न करणाऱ्या शहरांत अत्याधुनिक सुविधांची सरशी असली तरी कौटुंबिक वादाच्या मानसिकतेत बदल झालेला नसल्याचे निरीक्षण ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयाच्या आत्महत्या प्रतिबंधक केंद्रातर्फे नोंदविण्यात आलेे. रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या आत्महत्या प्रतिबंधक समुपदेशन केंद्रात येणाऱ्या रुग्णांमध्ये महिलांची संख्या अधिक असून बहुतांश रुग्णांकडून कौटुंबिक वादाच्या समस्या मांडल्या जात आहेत.
स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या शहरांमध्ये घरांपासून मॉल्सपर्यंत अनेक सुविधा असल्या तरी मानसिकता मात्र बदललेली नाही. शहरांचा विकास होत असला तरी तेथे नागरिकांच्या घराघरात अद्याप कौटुंबिक वादाचे प्रमाण कायम असल्याचे दिसून येते. सासरच्या मंडळींकडून होणारा त्रास, पतीकडून घेतला जाणारा संशय अशा कारणांमुळे भांडणांची संख्या वाढत आहे. या वादाच्या अतिरेकामुळे आत्महत्येचे पाऊल उचलणाऱ्यांचे प्रमाणही अधिक आहे. आत्महत्येच्या वाटेवर चालणाऱ्या रुग्णांचे समुपदेशन करून त्यांना अशी कृती करण्यापासून परावृत्त करण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलने सुरू केलेल्या केंद्रात उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये महिलांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. सर्वाधिक रुग्णांमध्ये कौटुंबिक वाद हे एकमेव कारण असल्याचे केंद्रातील डॉक्टरांकडून सांगण्यात येते. यामध्ये सासरच्या मंडळींकडून दिला जाणारा मानसिक ताण, काही घरांमध्ये होणारी मारहाण, शिक्षणासाठी केली जाणारी बंदी, पतीकडून घेतला जाणारा संशय अशा कारणांमुळे महिला आत्महत्येसारख्या टोकाच्या निर्णयास पोहोचल्या असल्याचे या केंद्राकडून सांगण्यात येते.
सप्टेंबर महिन्यात आत्महत्येच्या निर्णयांपर्यंत आलेल्या रुग्णांमध्ये चार पुरुष असून महिलांची संख्या १० आहे तर ऑक्टोबर महिन्यात तीन पुरुष असून सात महिलांनी उपचार घेतले आहेत. नोव्हेंबरमध्ये दोन पुरुष रुग्ण असून महिलांची संख्या सात आहे. तिन्ही महिन्यांमध्ये स्त्रियांची संख्या अधिक असून कौटुंबिक कलह हेच कारण असल्याचे वारंवार दिसून येत आहे. या केंद्रात मानसोपचार तज्ज्ञ डॉ. खुशबू चव्हाण, डॉ. क्षमा राठोड हे रुग्णांवर उपचार करत असून मनोविकृती सामाजिक कार्यकर्ते श्रीरंग सिद हे काम करत आहेत.