म. टा. वृत्तसेवा, ठाणे
अल्पवयीन मुलींबाबत पालकांची चिंता दिवसागणिक वाढत असल्याचे वास्तव आहे. लहान मुली सर्वाधिक वासनांधतेच्या शिकार होत असल्याचे आढळून आले आहे. मागील दोन वर्षांत १८ वर्षांखालील मुलींवर झालेल्या बलात्काराप्रकरणी ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत २८१ गुन्हे दाखल झाले असून १८ वर्षांवरील महिला आणि मुलींवरील बलात्काराच्या गुन्ह्यांची संख्या १९४ आहे.
खाऊ किंवा पैशाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केले जात आहेत. काही वेळेला आई-वडील दोघेही कामानिमित्त बाहेर जातात. घरी एकट्याच असलेल्या निरागस मुलींवर विखारी नजर पडते. काही वेळेला आरोपी क्रूरतेची परिसीमा गाठतात. अशा प्रकारच्या घटना ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत यापूर्वी घडलेल्या आहेत. आरोपी अल्पवयीन मुलींना धमकी देत असल्याने मुली आपल्यावर ओढवलेला प्रसंगाबाबत तात्काळ वाच्यता करत नाही. गंभीर बाब म्हणजे जवळचे व्यक्तींकडून होणाऱ्या अत्याचारांनाही मुलींना सामोरे जावे लागत आहे. मैत्रीच्या नात्याला काळीमा फासत मित्रांकडून मैत्रीणीवर लैंगिक अत्याचारही होत आहेत. २०१५ मध्ये कोपरीत वाढीदिवसाच्या पार्टीच्या नावाखाली १५ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले होते. आपल्यावरील अन्यायाबाबत पीडित मुलीने सामाजिक संस्थेच्या मदतीने पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. अनेकदा अत्याचार होऊनही याबाबतची तक्रार केली जात नसल्याने आरोपी मोकाटच असतात. परिणामी अशा आरोपींकडून गैरप्रकार सुरूच असतात.
अत्याचार झालेल्यामध्ये अल्पवयीन मुलींची संख्या अधिक असल्याचे दिसत आहे. कारण १८ वर्षांखालील मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी २०१५ मध्ये १४९ गुन्हे दाखल असून त्यापैकी १४५ गुन्ह्यांची उकल झाली आहे. तर त्याच वर्षी १८ वर्षांवरील मुलींवर झालेल्या अत्याचाराचे १०२ गुन्हे दाखल असून ९३ गुन्ह्यांची उकल होऊ शकली आहे. तर, २०१६ मध्ये १८ वर्षांखालील मुलींवर झालेल्या अत्याचाराप्रकरणी १३२ गुन्हे दाखल असून १२३ गुन्ह्यांची उकल झाली आहे. १८ वर्षांवरील मुलींवर झालेल्या अत्याचाराप्रकरणी गुन्ह्यांची संख्या ९२ इतकी आहे.
८० टक्के प्रकरणात ओळखीच्या लोकांकडूनच अत्याचार होत असल्याचे दिसत आहे. तसेच अनेकदा बदनामीच्या भीतीने तक्रारी दिल्या जात नाहीत. तसेच मुलींवर दबाव आणण्याचाही प्रयत्न होतो. तसेच पालक देखील मुलांकडे लक्ष देत नाहीत. आजघडीला मुला-मुलींना समुदपदेशाची आवश्यकता आहे.
-मीनल ठाकूर, अध्यक्ष बालकल्याण समिती
विनयभंगाचीही चिंता
१८ वर्षांवरील मुली आणि महिलांच्या बाबतीत घडलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यांची संख्या २०१६ मध्ये ३१७ तर १८ वर्षांखालील अल्पवयीन मुलींचे झालेल्या विनयभंगप्रकरणी १४१ गुन्हे दाखल आहेत. २०१५ मध्ये अनुक्रमे ३८९ आणि १७५ इतके गुन्हे होते.
अत्याचारांचा चिंतादायक आलेख
२०१५ २०१६
परिमंडळ १ (ठाणे) २६ (१७) २५ (१५)
परिमंडळ २ (भिवंडी) १९ (९) २६ (१)
परिमंडळ ३ (कल्याण) ४५ (३३) ३४ (२५)
परिमंडळ ४ (उल्हासनगर) ३९ (२४) २३ (३४)
परिमंडळ ५ (वागळे इस्टेट) २६ (१७) २५ (१५)
(कंसात १८ वर्षांवरील बलात्करांचे गुन्हे)
अल्पवयीन मुलींबाबत पालकांची चिंता दिवसागणिक वाढत असल्याचे वास्तव आहे. लहान मुली सर्वाधिक वासनांधतेच्या शिकार होत असल्याचे आढळून आले आहे. मागील दोन वर्षांत १८ वर्षांखालील मुलींवर झालेल्या बलात्काराप्रकरणी ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत २८१ गुन्हे दाखल झाले असून १८ वर्षांवरील महिला आणि मुलींवरील बलात्काराच्या गुन्ह्यांची संख्या १९४ आहे.
खाऊ किंवा पैशाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केले जात आहेत. काही वेळेला आई-वडील दोघेही कामानिमित्त बाहेर जातात. घरी एकट्याच असलेल्या निरागस मुलींवर विखारी नजर पडते. काही वेळेला आरोपी क्रूरतेची परिसीमा गाठतात. अशा प्रकारच्या घटना ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत यापूर्वी घडलेल्या आहेत. आरोपी अल्पवयीन मुलींना धमकी देत असल्याने मुली आपल्यावर ओढवलेला प्रसंगाबाबत तात्काळ वाच्यता करत नाही. गंभीर बाब म्हणजे जवळचे व्यक्तींकडून होणाऱ्या अत्याचारांनाही मुलींना सामोरे जावे लागत आहे. मैत्रीच्या नात्याला काळीमा फासत मित्रांकडून मैत्रीणीवर लैंगिक अत्याचारही होत आहेत. २०१५ मध्ये कोपरीत वाढीदिवसाच्या पार्टीच्या नावाखाली १५ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले होते. आपल्यावरील अन्यायाबाबत पीडित मुलीने सामाजिक संस्थेच्या मदतीने पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. अनेकदा अत्याचार होऊनही याबाबतची तक्रार केली जात नसल्याने आरोपी मोकाटच असतात. परिणामी अशा आरोपींकडून गैरप्रकार सुरूच असतात.
अत्याचार झालेल्यामध्ये अल्पवयीन मुलींची संख्या अधिक असल्याचे दिसत आहे. कारण १८ वर्षांखालील मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी २०१५ मध्ये १४९ गुन्हे दाखल असून त्यापैकी १४५ गुन्ह्यांची उकल झाली आहे. तर त्याच वर्षी १८ वर्षांवरील मुलींवर झालेल्या अत्याचाराचे १०२ गुन्हे दाखल असून ९३ गुन्ह्यांची उकल होऊ शकली आहे. तर, २०१६ मध्ये १८ वर्षांखालील मुलींवर झालेल्या अत्याचाराप्रकरणी १३२ गुन्हे दाखल असून १२३ गुन्ह्यांची उकल झाली आहे. १८ वर्षांवरील मुलींवर झालेल्या अत्याचाराप्रकरणी गुन्ह्यांची संख्या ९२ इतकी आहे.
८० टक्के प्रकरणात ओळखीच्या लोकांकडूनच अत्याचार होत असल्याचे दिसत आहे. तसेच अनेकदा बदनामीच्या भीतीने तक्रारी दिल्या जात नाहीत. तसेच मुलींवर दबाव आणण्याचाही प्रयत्न होतो. तसेच पालक देखील मुलांकडे लक्ष देत नाहीत. आजघडीला मुला-मुलींना समुदपदेशाची आवश्यकता आहे.
-मीनल ठाकूर, अध्यक्ष बालकल्याण समिती
विनयभंगाचीही चिंता
१८ वर्षांवरील मुली आणि महिलांच्या बाबतीत घडलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यांची संख्या २०१६ मध्ये ३१७ तर १८ वर्षांखालील अल्पवयीन मुलींचे झालेल्या विनयभंगप्रकरणी १४१ गुन्हे दाखल आहेत. २०१५ मध्ये अनुक्रमे ३८९ आणि १७५ इतके गुन्हे होते.
अत्याचारांचा चिंतादायक आलेख
२०१५ २०१६
परिमंडळ १ (ठाणे) २६ (१७) २५ (१५)
परिमंडळ २ (भिवंडी) १९ (९) २६ (१)
परिमंडळ ३ (कल्याण) ४५ (३३) ३४ (२५)
परिमंडळ ४ (उल्हासनगर) ३९ (२४) २३ (३४)
परिमंडळ ५ (वागळे इस्टेट) २६ (१७) २५ (१५)
(कंसात १८ वर्षांवरील बलात्करांचे गुन्हे)