अ‍ॅपशहर

गतिमंद जुळ्यांची हत्या करून आईची आत्महत्या

जुळी मुले गतिमंद असल्याने तणावाखाली असलेल्या एका महिलेने या दोन्ही मुलांची गळा आवळून हत्या करीत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शनिवारी सायंकाळी ठाणे येथील कळवा पूर्व भागात घडली. पती संदीप कामावर गेल्यानंतर अर्चना कदम हे कृत्य केले.

Maharashtra Times 9 Sep 2017, 11:34 pm
मटा ऑनलाइन वृत्त । ठाणे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mother kills children commits suicide in thane
गतिमंद जुळ्यांची हत्या करून आईची आत्महत्या


जुळी मुले गतिमंद असल्याने तणावाखाली असलेल्या एका महिलेने या दोन्ही मुलांची गळा आवळून हत्या करीत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शनिवारी सायंकाळी ठाणे येथील कळवा पूर्व भागात घडली. पती संदीप कामावर गेल्यानंतर अर्चना कदम हे कृत्य केले.

संदीप कदम हे एका खासगी कंपनीत व्यवपस्थापक म्हणून काम करतात. शनिवारी सकाळी नऊ वाजता ते कार्यालयात गेले होते. घरी मुलांसोबत असलेल्या अर्चनाने दोन्ही गतिमंद मुलांची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. सायंकाळी सहा वाजता संदीप हे कामावरून आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला, अशी माहिती कळवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक एम. एम. बागवान यांनी दिली.

या दोन्ही मुलांवर उपचार सुरू होते. मात्र मुले गतिमंद असल्याने अर्चना तणावाखाली होती. दिवस भरले नसताना साडेसहा महिन्यांतच अर्चना बाळंत झाली होती. या मुलांच्या अंगावर कोणत्याही खुणा नसून शवविच्छेदन अहवालानंतर मुलांचा मृत्यू कशाने झाला हे समजू शकेल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज