अ‍ॅपशहर

दारूचा ग्लास पडल्याने हत्या

दारूचा ग्लास धक्का लागून खाली पडल्याने झालेल्या वादातून पाच जणांच्या टोळीने एका बांधकाम व्यावसायिकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याण पूर्वेला घडली.

Maharashtra Times 17 Sep 2017, 3:00 am
म. टा. वृत्तसेवा, कल्याण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम murder of builder in kalyan
दारूचा ग्लास पडल्याने हत्या


दारूचा ग्लास धक्का लागून खाली पडल्याने झालेल्या वादातून पाच जणांच्या टोळीने एका बांधकाम व्यावसायिकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याण पूर्वेला घडली. प्रेमचंद गजरे असे मृत बांधकाम व्यावसायिकाचे नाव असून या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करत दोघांना ताब्यात घेतले आहे.

कल्याण पूर्वेकडील विठ्ठलवाडी परिसरातील सत्यम बारमध्ये प्रेमचंद गजरे हे बांधकाम व्यावसायिक बसले होते. रात्री १०च्या सुमारास बारमधून बाहेर पडत असताना त्यांचा एका टेबलला धक्का लागल्याने त्या टेबलवरील ग्लास खाली पडला. या टेबलवर पाचजण बसले होते. ग्लास पडल्याने त्यांनी गजरे यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर हे पाचही जण बारच्या बाहेर निघून गेले. मात्र ते बाहेर गजरे यांची वाट पाहत होते. गजरे बाहेर पडताच या पाच जणांनी त्यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच, त्यांच्यावर चाकूने हल्ला चढवला. या हल्ल्यात गजरे जबर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी जयेश पाटील, भावेश पाटील, अक्षय तिरोडकर, विशाल जेडे आणि त्यांच्या एका साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करत दोन जणांना ताब्यात घेतले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज