म. टा. वृत्तसेवा, नायगाव
नायगावकरांनी महापालिकेच्या आपल्या हक्काच्या पिण्याच्या पाण्यासाठी आमरण उपोषण व आंदोलन करण्याचे ठरवले आहे. १५ एप्रिलला पाण्यासाठीचा हा लढा सुरू होणार आहे.
महापालिका बनल्यापासून आतापर्यंत अनेक राजकीय नेते, स्थानिक नगरसेवक व मंत्र्यांकडून प्रत्येक निवडणुकीत देण्यात येणारी आश्वासने, वारंवार कागदोपत्री पाठपुरावा करूनही त्याकडे होत असलेले पालिकेचे दुर्लक्ष या पार्श्वभूमीवर नायगावकरांनी कोणत्याही राजकीय पक्षाचा पाठिंबा न घेता ‘मी नायगावकर’ संकल्पनेअंतर्गत स्वबळावर हक्काच्या पाण्यासाठी शनिवारी सायंकाळी ४.०० वाजता रखा दादा मंदिर, बाळासाहेब मार्ग, परेरानगर , नायगाव (पूर्व) येथे आमरण उपोषण व निषेध करण्याचा निर्णय घेतला आहे.
कित्येक वर्षे उलटूनही नायगावकरांना महापालिकेचे हक्काचे पाणी मिळत नाही. पूर्वेला दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे. सध्या नायगावची लोकसंख्या अडीच लाखांच्या आसपास आहे. यात एकूण ४५० इमारतींत ३०,०००च्या आसपास सदनिका व चाळींतील १०,००० सदनिका आहेत. नायगावमधील लोकसंख्येच्या पाच टक्के नागरिकांना पालिकेचे पाणी मिळत आहे, तर ९५ टक्के आजही टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत.
स्थानिकांचे पगारातील निम्मे पैसे बाहेरून पाणी विकत घेण्यासाठी खर्ची होतात. हक्काच्या पाण्याच्या लढ्यासाठी व टँकरवाल्यांकढून होणारी अवाच्यासव्वा लूटमार थांबण्यासाठी व होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवून निषेध करण्यासाठी नायगावकर रस्त्यावर उतरणार आहेत.
नायगावकरांनी महापालिकेच्या आपल्या हक्काच्या पिण्याच्या पाण्यासाठी आमरण उपोषण व आंदोलन करण्याचे ठरवले आहे. १५ एप्रिलला पाण्यासाठीचा हा लढा सुरू होणार आहे.
महापालिका बनल्यापासून आतापर्यंत अनेक राजकीय नेते, स्थानिक नगरसेवक व मंत्र्यांकडून प्रत्येक निवडणुकीत देण्यात येणारी आश्वासने, वारंवार कागदोपत्री पाठपुरावा करूनही त्याकडे होत असलेले पालिकेचे दुर्लक्ष या पार्श्वभूमीवर नायगावकरांनी कोणत्याही राजकीय पक्षाचा पाठिंबा न घेता ‘मी नायगावकर’ संकल्पनेअंतर्गत स्वबळावर हक्काच्या पाण्यासाठी शनिवारी सायंकाळी ४.०० वाजता रखा दादा मंदिर, बाळासाहेब मार्ग, परेरानगर , नायगाव (पूर्व) येथे आमरण उपोषण व निषेध करण्याचा निर्णय घेतला आहे.
कित्येक वर्षे उलटूनही नायगावकरांना महापालिकेचे हक्काचे पाणी मिळत नाही. पूर्वेला दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे. सध्या नायगावची लोकसंख्या अडीच लाखांच्या आसपास आहे. यात एकूण ४५० इमारतींत ३०,०००च्या आसपास सदनिका व चाळींतील १०,००० सदनिका आहेत. नायगावमधील लोकसंख्येच्या पाच टक्के नागरिकांना पालिकेचे पाणी मिळत आहे, तर ९५ टक्के आजही टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत.
स्थानिकांचे पगारातील निम्मे पैसे बाहेरून पाणी विकत घेण्यासाठी खर्ची होतात. हक्काच्या पाण्याच्या लढ्यासाठी व टँकरवाल्यांकढून होणारी अवाच्यासव्वा लूटमार थांबण्यासाठी व होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवून निषेध करण्यासाठी नायगावकर रस्त्यावर उतरणार आहेत.