म. टा. वृत्तसेवा, उल्हासनगर
महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना युती आणि आघाडीची सर्व गणिते अडली आहेत. मात्र टीम ओमी कलानी भाजपमध्ये जाणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाल्याने रविवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये आघाडीसाठी एक सकारात्मक बैठक पार पडली.
उल्हासनगर महापालिकेची निवडणूक यंदा चांगलीच गाजणार असल्याचे चित्र सध्या शहरात दिसत आहे. टीम ओमी कलानीच्या गणितावर शहरातील युती आणि आघाडीचे भवितव्य ठरणार आहे. तसेच टीम ओमी कलानी भाजपमध्ये गेल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यासाठी माजी पालकमंत्री गणेश नाईक, प्रदेश सरचिटणीस प्रमोद हिंदुराव हे नेते टीम ओमीला थांबवण्याचा आणि शहरात राष्ट्रवादीचे अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्याचसोबत ओमी कलानी भाजपमध्ये गेल्यास पर्याय म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस सावध भूमिका घेत, शहरातील काँग्रेससोबत आघाडीची चाचपणीही करत आहे. रविवारी शहरातील एका हॉटेलमध्ये काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि उल्हासनगर निरीक्षक सुभाष कानडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. जयराम लुल्ला आणि राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांच्यात आघाडीबाबत एक बैठक पार पडली.
काँग्रेस पालिका निवडणुकीतील उमेदवारांच्या आपल्या जागांचा प्रस्ताव राष्ट्रवादीकडे देणार असून प्रदेश स्तरावरील नेत्यांकडे हा प्रस्ताव पाठवत त्याबाबत बोलणी करणार असल्याचे प्रमोद हिंदुराव यांनी सांगितले. तसेच शहरातील परिस्थिती पाहता काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीचा फायदा निवडणुकीत नक्की होईल, असा विश्वास सुभाष कानडे यांनी व्यक्त केला. येत्या दोन दिवसांत आघाडीचे चित्र स्पष्ट करणार असल्याचे दोन्ही पक्षांतील नेत्यांनी सांगितले. त्यामुळे शहरात युती तुटल्यास शिवसेना, भाजप स्वबळावर लढण्याच्या तयारीत असली, तरी आघाडीसाठी परिस्थिती सकारात्मक असल्याचे चित्र आहे. आघाडी झाल्यास त्याचा आघाडीला किती लाभ होतो, हे येत्या निवडणुकीत कळणार आहे.
महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना युती आणि आघाडीची सर्व गणिते अडली आहेत. मात्र टीम ओमी कलानी भाजपमध्ये जाणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाल्याने रविवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये आघाडीसाठी एक सकारात्मक बैठक पार पडली.
उल्हासनगर महापालिकेची निवडणूक यंदा चांगलीच गाजणार असल्याचे चित्र सध्या शहरात दिसत आहे. टीम ओमी कलानीच्या गणितावर शहरातील युती आणि आघाडीचे भवितव्य ठरणार आहे. तसेच टीम ओमी कलानी भाजपमध्ये गेल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यासाठी माजी पालकमंत्री गणेश नाईक, प्रदेश सरचिटणीस प्रमोद हिंदुराव हे नेते टीम ओमीला थांबवण्याचा आणि शहरात राष्ट्रवादीचे अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्याचसोबत ओमी कलानी भाजपमध्ये गेल्यास पर्याय म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस सावध भूमिका घेत, शहरातील काँग्रेससोबत आघाडीची चाचपणीही करत आहे. रविवारी शहरातील एका हॉटेलमध्ये काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि उल्हासनगर निरीक्षक सुभाष कानडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. जयराम लुल्ला आणि राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांच्यात आघाडीबाबत एक बैठक पार पडली.
काँग्रेस पालिका निवडणुकीतील उमेदवारांच्या आपल्या जागांचा प्रस्ताव राष्ट्रवादीकडे देणार असून प्रदेश स्तरावरील नेत्यांकडे हा प्रस्ताव पाठवत त्याबाबत बोलणी करणार असल्याचे प्रमोद हिंदुराव यांनी सांगितले. तसेच शहरातील परिस्थिती पाहता काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीचा फायदा निवडणुकीत नक्की होईल, असा विश्वास सुभाष कानडे यांनी व्यक्त केला. येत्या दोन दिवसांत आघाडीचे चित्र स्पष्ट करणार असल्याचे दोन्ही पक्षांतील नेत्यांनी सांगितले. त्यामुळे शहरात युती तुटल्यास शिवसेना, भाजप स्वबळावर लढण्याच्या तयारीत असली, तरी आघाडीसाठी परिस्थिती सकारात्मक असल्याचे चित्र आहे. आघाडी झाल्यास त्याचा आघाडीला किती लाभ होतो, हे येत्या निवडणुकीत कळणार आहे.