अ‍ॅपशहर

तेरा रस्त्यांच्या डांबरीकरणाचे भूम‌पिूजन

विक्रमगडमध्ये तेरा रस्त्यांच्या खडीकरण व डांबरीकरणाच्या कामाचे भुमिपूजन आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते करण्यात आले.

Maharashtra Times 24 Mar 2017, 4:00 am
म. टा. वृत्तसेवा, पालघर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम new roads work starts
तेरा रस्त्यांच्या डांबरीकरणाचे भूम‌पिूजन

विक्रमगडमध्ये तेरा रस्त्यांच्या खडीकरण व डांबरीकरणाच्या कामाचे भुमिपूजन आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते करण्यात आले. या तेरा रस्त्यांसाठी आदिवासी विभागातून साडेपाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
‘गाव तेथे रस्ता व रस्ता तेथे एसटी’ हे धोरण प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सरकार ग्रामीण, आदिवासी भागांतील रस्त्यांना अधिक प्राधान्य देत असल्याचे सवरा यांनी यावेळी बोलताना सांगितले.
ग्रामीण भागाचा सर्वांगिण विकास झाल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही. म्हणूनच आदिवासी, ग्रामीण भागांकडे सरकार अधिक गांभीर्याने लक्ष देत आहे. येथील प्रत्येक गाव शहराला जोडण्याचे प्रयत्न असून येत्या दोन वर्षांत प्रत्येक गाव मुख्य रस्त्याला जोडले जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
यावेळी सवरा यांच्या हस्ते माले ते कशिवली, जाधव पाडा ते यशवंतनगर, विक्रमगड ते ब्राम्हणपाडा, विक्रमगड ते आंबेघर, पडवळ पाडा ते आंबेघर, आलोंडा ये कोकणी पाडा, गडदे ते बालापूर आदी रस्त्यांचे भुमिपूजन करण्यात आले.
या भुमीपूजन समारंभासाठी भाजपाचे प्रदेश सदस्य बाबाजी काठोले, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सुरेखा थेतले, तालुकाध्यक्ष संदीप पावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज