अ‍ॅपशहर

खाद्यपदार्थांची ‘उघड’ विक्री चालूच

पावसाळ्यात दूषित पाणी आणि उघड्यावरील अन्नपदार्थांच्या सेवनाने होणाऱ्या आजारांवर आळा घालण्यासाठी पालिका प्रशासनाने दोन दिवसांत कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र दोन आठवडे उलटूनही कारवाई न झाल्याने पालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. गेल्या महिनाभरात अशा आजारांच्या रुग्णांची संख्या अधिक वाढली असून पालिका रुग्णालयात सायंकाळी उशिरापर्यंत रुग्णांची रांग पाहायला मिळते.

Maharashtra Times 28 Jul 2016, 3:00 am
म. टा. वृत्तसेवा, बदलापूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम no action on open space food
खाद्यपदार्थांची ‘उघड’ विक्री चालूच


पावसाळ्यात दूषित पाणी आणि उघड्यावरील अन्नपदार्थांच्या सेवनाने होणाऱ्या आजारांवर आळा घालण्यासाठी पालिका प्रशासनाने दोन दिवसांत कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र दोन आठवडे उलटूनही कारवाई न झाल्याने पालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. गेल्या महिनाभरात अशा आजारांच्या रुग्णांची संख्या अधिक वाढली असून पालिका रुग्णालयात सायंकाळी उशिरापर्यंत रुग्णांची रांग पाहायला मिळते.

पावसाळ्यात उघड्यावरील अन्नपदार्थ आणि दूषित पाण्यामुळे नागरिकांना उलटी, जुलाब, कॉलरा, टायफॉइड, कावीळ आदी साथीच्या आजारांची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे पालिकेकडून स्टेशन परिसरात पावसाळ्यात उघड्यावर अन्नपदार्थ विक्रीवर प्रतिबंध घालण्यात येतो. त्यासाठी पावसाळ्यात उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री बंद

करण्यासाठी पालिकेने या विक्रेत्यांना नोटिस बजावली. त्यानंतरही शहरात अनेक ठिकाणी उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री सुरू असून पालिकेद्वारे त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. आतापर्यंत बदलापूर नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने सुमारे ४५० विक्रेत्यांना नोटिस बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे पालिकेचे आदेश धाब्यावर बसवत उघड्यावर खाद्यपदार्थांची विक्री सुरूच आहे. नगरपरिषदेच्या दुबे रुग्णालयात येणाऱ्या एकूण रुग्णांपैकी ७० टक्के रुग्ण साथीच्या आजारांचे असल्याचे समोर आले. मात्र या आजारांना कारणीभूत ठरणाऱ्या उघड्यावरील अन्नपदार्थ विक्रीला प्रतिबंध कारवाई न करता फक्त नोटिसा बजावण्यात पालिका धन्यता मानत आहे. अनेक ठिकाणी अशा प्रकारे अन्नपदार्थ विक्री बंद करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी विक्री सुरू आहे, त्यांच्यावर लवकरच कारवाई करण्यात येईल, अशी माहिती आरोग्य विभागाचे प्रमुख विजय कदम यांनी दिली.
एकाच डॉक्टरवर भार
साथीच्या आजारांमुळे पालिका रुग्णालयातील रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. बारा वर्षांपासून पालिका रुग्णालयाची धुरा एकच डॉक्टर सांभाळत असल्याने त्यांच्यावर अशावेळी मोठा ताण पडतो. त्यामुळे रुग्णालयात रुग्णांच्या मोठ्या रांगा पाहायला मिळत आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज