म. टा. वृत्तसेवा, ठाणे
कचराळी तलाव परिसरात तोडफोड करत पालिकेच्या मालमत्तेचे नुकसान करूनही अद्याप नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नाही. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघा युवकांवर केवळ प्रतिबंधक कारवाई करून समज देत त्यांना सोडून देण्यात आले आहे.
रविवारी पहाटेच्या सुमारास चार युवकांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह उद्यानातील अन्य साहित्यांची तोडफोड केली होती. हे युवक उच्चशिक्षण घेत असल्याचे समजते. तर, काही इंजिनीअरिंगचे विद्यार्थी असल्याचे समजते. मात्र ठाणे पालिकेनेदेखील सौम्य भूमिका घेतल्याने आरोपींवर कडक कारवाई होऊ शकली नसल्याची चर्चा सुरू आहे. नेमके किती नुकसान झाले, हेही समजू शकले नाही.
कचराळी तलाव परिसरात तोडफोड करत पालिकेच्या मालमत्तेचे नुकसान करूनही अद्याप नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नाही. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघा युवकांवर केवळ प्रतिबंधक कारवाई करून समज देत त्यांना सोडून देण्यात आले आहे.
रविवारी पहाटेच्या सुमारास चार युवकांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह उद्यानातील अन्य साहित्यांची तोडफोड केली होती. हे युवक उच्चशिक्षण घेत असल्याचे समजते. तर, काही इंजिनीअरिंगचे विद्यार्थी असल्याचे समजते. मात्र ठाणे पालिकेनेदेखील सौम्य भूमिका घेतल्याने आरोपींवर कडक कारवाई होऊ शकली नसल्याची चर्चा सुरू आहे. नेमके किती नुकसान झाले, हेही समजू शकले नाही.