मूर्तिकारांसमोर वेळेत काम पूर्ण करण्याचे आव्हान
म. टा. वृत्तसेवा, कल्याण
टिटवाळा आणि आजूबाजूच्या परिसरात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. ऐन सणासुदीच्या पार्श्वभूमीवर विजेच्या सुरू असलेल्या लपंडावामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. याचा फटका गणेशमूर्तिकारांना बसला असून कमी वेळेत गणेशमूर्तींचे काम पूर्ण करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर उभे ठाकले आहे.
कल्याणनजीक असलेल्या टिटवाळा व आसपासच्या ग्रामीण भागात महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत. टिटवाळा व खडवली या दोन्ही भागात महावितरणचे लाखाहून अधिक ग्राहक आहेत. महावितरण कंपनीला येथून कोट्यवधींच्या घरात विजबिलापोटी रक्कम मिळत असते. मोहना फिडरवरून टिटवाळा परिसरातील मांडा, टिटवाळा, रुंदा, उतणे, बल्याणी, उंभर्णी, मोहीली, नांदप, मानिवली या भागांत, तर गोवेली फिडरमधून फळेगाव, उशिद, रूंदे, अंबिवली, उतणे, गुरवली, राया, निंबवली, सांगोडा, कोंढेरी, खाडवली, वावेघर, नडगांव, दानबाव, कुंभारपाडा, चिंचवली आदी गावांत वीजपुरवठा करण्यात येत आहे.
वेळेआधीच बिलाची अव्वाच्या सव्वा आकारणी करून वसुली करणाऱ्या महावितरणला ग्राहकांना द्यायच्या सुविधांचा मात्र नेहमीच सोयीस्कर विसर पडतो. अव्वाच्या सव्वा बिल, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, यामुळे नागरिक त्रस्त झाले असतानाच महावितरणच्या उघड्या वायरी नागरिकांच्या जिवावर बेतू लागल्या आहेत. वीजवाहक तार तुटून व्यक्ती, जनावरांचा मृत्यू व जखमी होण्याच्या घटना वर्षभर वारंवार घडत आहेत. असे असताना दुरुस्तीच्या नावाखाली नेमकी कोणती कामे केली जातात, हा यक्षप्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
येथील समस्यांचे निवारण करण्यासाठी अनेकवेळा आंदोलने आणि मोर्चे काढण्यात आले. महावितरण कार्यालयाची प्रतिकात्मक अंत्ययात्राही त्रस्त नागरिकांनी काढली. मात्र यामुळे महावितरणच्या कामात सुधारणा झाली नाही. दिवसागणिक महावितरणकडून पुरवण्यात येणाऱ्या सेवेचा दर्जा खालावत चालला आहे.
दहीहंडीच्या दिवशी तब्बल पाच तास बत्ती गुल झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. आता गणेशोत्सवाला अवघे चार दिवस शिल्लक असताना नागरिकांना तब्बल ८ तासांहून अधिक काळ अंधारात काढावे लागत असल्यामुळे महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात संताप व्यक्त होत आहे.
म. टा. वृत्तसेवा, कल्याण
टिटवाळा आणि आजूबाजूच्या परिसरात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. ऐन सणासुदीच्या पार्श्वभूमीवर विजेच्या सुरू असलेल्या लपंडावामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. याचा फटका गणेशमूर्तिकारांना बसला असून कमी वेळेत गणेशमूर्तींचे काम पूर्ण करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर उभे ठाकले आहे.
कल्याणनजीक असलेल्या टिटवाळा व आसपासच्या ग्रामीण भागात महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत. टिटवाळा व खडवली या दोन्ही भागात महावितरणचे लाखाहून अधिक ग्राहक आहेत. महावितरण कंपनीला येथून कोट्यवधींच्या घरात विजबिलापोटी रक्कम मिळत असते. मोहना फिडरवरून टिटवाळा परिसरातील मांडा, टिटवाळा, रुंदा, उतणे, बल्याणी, उंभर्णी, मोहीली, नांदप, मानिवली या भागांत, तर गोवेली फिडरमधून फळेगाव, उशिद, रूंदे, अंबिवली, उतणे, गुरवली, राया, निंबवली, सांगोडा, कोंढेरी, खाडवली, वावेघर, नडगांव, दानबाव, कुंभारपाडा, चिंचवली आदी गावांत वीजपुरवठा करण्यात येत आहे.
वेळेआधीच बिलाची अव्वाच्या सव्वा आकारणी करून वसुली करणाऱ्या महावितरणला ग्राहकांना द्यायच्या सुविधांचा मात्र नेहमीच सोयीस्कर विसर पडतो. अव्वाच्या सव्वा बिल, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, यामुळे नागरिक त्रस्त झाले असतानाच महावितरणच्या उघड्या वायरी नागरिकांच्या जिवावर बेतू लागल्या आहेत. वीजवाहक तार तुटून व्यक्ती, जनावरांचा मृत्यू व जखमी होण्याच्या घटना वर्षभर वारंवार घडत आहेत. असे असताना दुरुस्तीच्या नावाखाली नेमकी कोणती कामे केली जातात, हा यक्षप्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
येथील समस्यांचे निवारण करण्यासाठी अनेकवेळा आंदोलने आणि मोर्चे काढण्यात आले. महावितरण कार्यालयाची प्रतिकात्मक अंत्ययात्राही त्रस्त नागरिकांनी काढली. मात्र यामुळे महावितरणच्या कामात सुधारणा झाली नाही. दिवसागणिक महावितरणकडून पुरवण्यात येणाऱ्या सेवेचा दर्जा खालावत चालला आहे.
दहीहंडीच्या दिवशी तब्बल पाच तास बत्ती गुल झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. आता गणेशोत्सवाला अवघे चार दिवस शिल्लक असताना नागरिकांना तब्बल ८ तासांहून अधिक काळ अंधारात काढावे लागत असल्यामुळे महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात संताप व्यक्त होत आहे.