शहापूरमधील दोन गावांत स्मशानभूमीअभावी मोठी समस्या
म. टा. वृत्तसेवा, शहापूर
शहापूरपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या दोन बोरशेती गावांत अंत्यसंस्कार करण्याची भीषण समस्या आहे. या गावांत स्मशानभूमीअभावी गेल्या चार वर्षांपासून स्वतःच्याच जमिनीत अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. ज्यांच्या जमिनी गावालगत आहेत त्यांना शक्य असले तरी ज्यांच्या जमिनी नाहीत व ज्यांच्या जमिनी गावापासून मैलभर लांब आहेत त्यांना मात्र गावांलगत जमिनी असलेल्या मालकांच्या विनवण्या कराव्या लागतात. या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन स्मशानभूमीची व्यवस्था करावी, अशी मागणी केली जात आहे.
सुमारे दीड हजार लोकसंख्या असलेल्या या दोन्ही गावांत स्मशानभूमी नसल्याने अंत्यसंस्कार करण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. गावांलगत वाहणाऱ्या भातसा नदीकाठी पूर्वी अंत्यसंस्कार करण्यात येत होते. मात्र त्या जागेवर एकाने मालकी हक्क दाखवला असून अंत्यसंस्कार करण्यास मनाई केली आहे. यामुळे गेल्या चार वर्षांपासून नदीकाठी होत असलेले अंत्यसंस्कार बंद झाले आहेत. स्मशानभूमी नसल्याने दोन्ही गावांतील ग्रामस्थांना अंत्यसंस्काराची मोठी अडचण निर्माण झाली आहे. स्मशानभूमीअभावी येथील ग्रामस्थांना स्वतःच्या जमिनीत अंत्यसंस्कार करावे लागतात. विशेष म्हणजे ज्यांच्या जमिनी आहेत त्यांना स्वतःच्या जमिनीत अंत्यसंस्कार करणे शक्य होते. मात्र ज्यांच्या जमिनी नाहीत व ज्यांच्या जमिनी लांब आहेत त्यांना मात्र अंत्यसंस्कार करण्यासाठी जमीन मिळवण्याकरिता आर्जव करावी लागत आहेत. अनेकदा समजूतदार ग्रामस्थांमुळे अडचण दूर झाली आहे. उन्हाळ्यात अंत्यसंस्कार करणे शक्य होते मात्र पावसाळ्यात अंत्यसंस्कार करणे अडचणीचे होत असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य मनीषा भांगरे व सामाजिक कार्यकर्ते बाळू भांगरे यांनी दिली.
म. टा. वृत्तसेवा, शहापूर
शहापूरपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या दोन बोरशेती गावांत अंत्यसंस्कार करण्याची भीषण समस्या आहे. या गावांत स्मशानभूमीअभावी गेल्या चार वर्षांपासून स्वतःच्याच जमिनीत अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. ज्यांच्या जमिनी गावालगत आहेत त्यांना शक्य असले तरी ज्यांच्या जमिनी नाहीत व ज्यांच्या जमिनी गावापासून मैलभर लांब आहेत त्यांना मात्र गावांलगत जमिनी असलेल्या मालकांच्या विनवण्या कराव्या लागतात. या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन स्मशानभूमीची व्यवस्था करावी, अशी मागणी केली जात आहे.
सुमारे दीड हजार लोकसंख्या असलेल्या या दोन्ही गावांत स्मशानभूमी नसल्याने अंत्यसंस्कार करण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. गावांलगत वाहणाऱ्या भातसा नदीकाठी पूर्वी अंत्यसंस्कार करण्यात येत होते. मात्र त्या जागेवर एकाने मालकी हक्क दाखवला असून अंत्यसंस्कार करण्यास मनाई केली आहे. यामुळे गेल्या चार वर्षांपासून नदीकाठी होत असलेले अंत्यसंस्कार बंद झाले आहेत. स्मशानभूमी नसल्याने दोन्ही गावांतील ग्रामस्थांना अंत्यसंस्काराची मोठी अडचण निर्माण झाली आहे. स्मशानभूमीअभावी येथील ग्रामस्थांना स्वतःच्या जमिनीत अंत्यसंस्कार करावे लागतात. विशेष म्हणजे ज्यांच्या जमिनी आहेत त्यांना स्वतःच्या जमिनीत अंत्यसंस्कार करणे शक्य होते. मात्र ज्यांच्या जमिनी नाहीत व ज्यांच्या जमिनी लांब आहेत त्यांना मात्र अंत्यसंस्कार करण्यासाठी जमीन मिळवण्याकरिता आर्जव करावी लागत आहेत. अनेकदा समजूतदार ग्रामस्थांमुळे अडचण दूर झाली आहे. उन्हाळ्यात अंत्यसंस्कार करणे शक्य होते मात्र पावसाळ्यात अंत्यसंस्कार करणे अडचणीचे होत असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य मनीषा भांगरे व सामाजिक कार्यकर्ते बाळू भांगरे यांनी दिली.