म. टा. वृत्तसेवा, डोंबिवली
डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात काही दिवसांपूर्वी ‘स्वप्नपंख’ या नाटकाच्या प्रयोगाच्या वेळी एसीत बिघाड झाल्याने रसिक हैराण झाले होते. त्यानंतर आता रंगमंचावरील एसीची यंत्रणा व्यवस्थित काम करत नसल्याने कलाकारांना उकाड्यातच प्रयोग सुरू ठेवावा लागत आहे. याबद्दल व्यवस्थापनाने मात्र मौन कायम ठेवले आहे.
डोंबिवलीमध्ये शनिवारी ‘के दिल अभी भरा नही’ या नाटकाचा प्रयोग पार पडला. या नाटकाच्या प्रयोगाच्या वेळी रंगमंचावरील एसी यंत्रणा अचानक बंद पडली. त्यामुळे लीना भागवत आणि मंगेश कदम यांसारख्या ज्येष्ठ कलाकारांना ऐन उकाड्यात प्रयोग करण्याची वेळ ओढावली. घामाच्या धारा वाहत असतानाही कर्तव्यदक्षतेने त्यांनी रसिकांसाठी प्रयोग रेटून नेला. मात्र यासाठी त्यांना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागली.
सरतेशेवटी नाटकाचा प्रयोग संपल्यावर आलेल्या रसिक प्रेक्षकांची माफी मागून त्यांनी आपली व्यथा प्रेक्षकांना सांगितल्यावर प्रेक्षकांनीसुद्धा हळहळ व्यक्त केली. याबाबत व्यवस्थापनाकडे पाठपुरावा केल्यानंतर मात्र त्यांनी नेहमीचाच पाढा कलाकारांना वाचून दाखवला. व्यवस्थापनाद्वारे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. लवकरच काम करण्यात येईल, असे सांगण्यात आले. गेले अनेक दिवस हेच कारण नाट्यप्रयोगांच्या वेळी कलाकार आणि रसिकांना देण्यात येत असले, तरीही प्रत्यक्ष परिस्थितीमध्ये मात्र बदल झालेला नाही. त्यामुळे सामान्य रसिक आणि आता कलाकारांची चांगलीच गैरसोय होत आहे.
डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात काही दिवसांपूर्वी ‘स्वप्नपंख’ या नाटकाच्या प्रयोगाच्या वेळी एसीत बिघाड झाल्याने रसिक हैराण झाले होते. त्यानंतर आता रंगमंचावरील एसीची यंत्रणा व्यवस्थित काम करत नसल्याने कलाकारांना उकाड्यातच प्रयोग सुरू ठेवावा लागत आहे. याबद्दल व्यवस्थापनाने मात्र मौन कायम ठेवले आहे.
डोंबिवलीमध्ये शनिवारी ‘के दिल अभी भरा नही’ या नाटकाचा प्रयोग पार पडला. या नाटकाच्या प्रयोगाच्या वेळी रंगमंचावरील एसी यंत्रणा अचानक बंद पडली. त्यामुळे लीना भागवत आणि मंगेश कदम यांसारख्या ज्येष्ठ कलाकारांना ऐन उकाड्यात प्रयोग करण्याची वेळ ओढावली. घामाच्या धारा वाहत असतानाही कर्तव्यदक्षतेने त्यांनी रसिकांसाठी प्रयोग रेटून नेला. मात्र यासाठी त्यांना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागली.
सरतेशेवटी नाटकाचा प्रयोग संपल्यावर आलेल्या रसिक प्रेक्षकांची माफी मागून त्यांनी आपली व्यथा प्रेक्षकांना सांगितल्यावर प्रेक्षकांनीसुद्धा हळहळ व्यक्त केली. याबाबत व्यवस्थापनाकडे पाठपुरावा केल्यानंतर मात्र त्यांनी नेहमीचाच पाढा कलाकारांना वाचून दाखवला. व्यवस्थापनाद्वारे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. लवकरच काम करण्यात येईल, असे सांगण्यात आले. गेले अनेक दिवस हेच कारण नाट्यप्रयोगांच्या वेळी कलाकार आणि रसिकांना देण्यात येत असले, तरीही प्रत्यक्ष परिस्थितीमध्ये मात्र बदल झालेला नाही. त्यामुळे सामान्य रसिक आणि आता कलाकारांची चांगलीच गैरसोय होत आहे.