म. टा. विशेष प्रतिनिधी, ठाणे
स्मार्ट शहराच्या बाता मारणाऱ्या ठाणे शहरातील नगरसेविकांसाठी पालिका मुख्यालयात असलेली शौचालयेही स्वच्छ नसल्याच्या मुद्द्यावरून मंगळवारी भर सभागृहात नगरसेविकांनी उभे रहात पालिका प्रशासनाचा निषेध नोंदवला. त्यापाठोपाठ शहरातील शौचालयांची उडालेली दैना चव्हाट्यावर मांडून सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासकीय अनास्थेची अक्षरशः चिरफाड केली.
ठाणे शहरात बांधल्या जाणाऱ्या वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांची जोडणी मलनिःसारण वाहिन्यांना करण्याबाबतचा प्रस्ताव प्रशासकीय व वित्तीय मान्यतेसाठी मंगळवारी सभागृहापुढे चर्चेला आला होता. त्यावेळी शिवसेनेच्या नगरसेविका परिषा सरनाईक यांनी पालिका मुख्यालयातील नगरसेविका आणि महिलांसाठी असलेली शौचालये स्वच्छ ठेवता येत नसतील तर आपण कशाला स्मार्ट सिटीच्या गप्पा मारायच्या, असा प्रश्न उपस्थित केला. दोन महिन्यांपूर्वी खुद्द महापौरांनीच ही शौचालये स्वच्छ आणि सुस्थितीत ठेवण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानंतरही प्रशासन ढिम्म असल्याचा आरोप करत सर्वपक्षीय नगरसेविकांनी आक्रमक पवित्रा घेतला. सभागृहात असलेल्या जवळपास ५० महिला नगरसेविका आपल्या खुर्चीवरून उठून उभ्या राहिल्या आणि त्यांनी प्रशासकीय अनास्थेचा निषेध नोंदविला. शौचायलांची अवस्था सुधारली नाही तर पुढल्या महासभेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा या नगरसेविकांनी दिला.
दिवा परिसरातील सार्वजनिक शौचालयांना दरवाजेच नसल्याचे बाबाजी पाटील यांनी सांगितले. अनेक कोट्यवधी रुपये खर्च करून जी शौचालये उभारली जातात त्या कामांमध्ये पालिका अधिकाऱ्यांचे अर्थकारण असल्याचा आरोप नारायण पवार यांनी केला. कोकणीपाडा येथील पालिका जे शौचालय बांधत होती ते वनविभागाने रोखून ठेवल्याचे परिषा सरनाईक यांनी सांगितले. तर, बाजारपेठांच्या ठिकाणी शौचालयेच नसल्याने महिलांची कुचंबणा होत असल्याचा मुद्दा आशा भोईर यांनी मांडला. वागळे इस्टेट, मुंब्रा, कळवा या भागातील सार्वजनीक शौचालयांची अवस्था दयनीय असल्याचे आरोप नगरसेवकांनी केला.
स्मार्ट शहराच्या बाता मारणाऱ्या ठाणे शहरातील नगरसेविकांसाठी पालिका मुख्यालयात असलेली शौचालयेही स्वच्छ नसल्याच्या मुद्द्यावरून मंगळवारी भर सभागृहात नगरसेविकांनी उभे रहात पालिका प्रशासनाचा निषेध नोंदवला. त्यापाठोपाठ शहरातील शौचालयांची उडालेली दैना चव्हाट्यावर मांडून सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासकीय अनास्थेची अक्षरशः चिरफाड केली.
ठाणे शहरात बांधल्या जाणाऱ्या वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांची जोडणी मलनिःसारण वाहिन्यांना करण्याबाबतचा प्रस्ताव प्रशासकीय व वित्तीय मान्यतेसाठी मंगळवारी सभागृहापुढे चर्चेला आला होता. त्यावेळी शिवसेनेच्या नगरसेविका परिषा सरनाईक यांनी पालिका मुख्यालयातील नगरसेविका आणि महिलांसाठी असलेली शौचालये स्वच्छ ठेवता येत नसतील तर आपण कशाला स्मार्ट सिटीच्या गप्पा मारायच्या, असा प्रश्न उपस्थित केला. दोन महिन्यांपूर्वी खुद्द महापौरांनीच ही शौचालये स्वच्छ आणि सुस्थितीत ठेवण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानंतरही प्रशासन ढिम्म असल्याचा आरोप करत सर्वपक्षीय नगरसेविकांनी आक्रमक पवित्रा घेतला. सभागृहात असलेल्या जवळपास ५० महिला नगरसेविका आपल्या खुर्चीवरून उठून उभ्या राहिल्या आणि त्यांनी प्रशासकीय अनास्थेचा निषेध नोंदविला. शौचायलांची अवस्था सुधारली नाही तर पुढल्या महासभेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा या नगरसेविकांनी दिला.
दिवा परिसरातील सार्वजनिक शौचालयांना दरवाजेच नसल्याचे बाबाजी पाटील यांनी सांगितले. अनेक कोट्यवधी रुपये खर्च करून जी शौचालये उभारली जातात त्या कामांमध्ये पालिका अधिकाऱ्यांचे अर्थकारण असल्याचा आरोप नारायण पवार यांनी केला. कोकणीपाडा येथील पालिका जे शौचालय बांधत होती ते वनविभागाने रोखून ठेवल्याचे परिषा सरनाईक यांनी सांगितले. तर, बाजारपेठांच्या ठिकाणी शौचालयेच नसल्याने महिलांची कुचंबणा होत असल्याचा मुद्दा आशा भोईर यांनी मांडला. वागळे इस्टेट, मुंब्रा, कळवा या भागातील सार्वजनीक शौचालयांची अवस्था दयनीय असल्याचे आरोप नगरसेवकांनी केला.