म. टा. वृत्तसेवा, ठाणे
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भातसा नदीला पूर आला अन् दप्तराच्या पत्र्याच्या पेट्या, पुस्तके, वह्या, पेन्सिल असे सर्व साहित्य भिजले... कपडे, अन्नधान्याची नासाडी झाली... ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील भातसई येथील गाडगे महाराज आश्रमशाळेसह अन्य आश्रमशाळांची अशी दुरवस्था झाली आहे.… त्यात वसतिगृहातील भोजनालयाचीही दैन्यवस्था झाल्याने तेथील चूलही विझली आहे. त्यामुळे अनेक पालक त्यांच्या पाल्यांना घेऊन गावाकडे परतली आहेत.
भातसई गावाजवळ नदीकिनारी श्री गाडगे महाराज मिशन मुंबई संचलित या संस्थेची शासकीय अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा आहे. या आश्रमशाळेत शहापूर, पडघा, भिवंडी, जव्हार, मोखाडा, खोडाळा, इगतपुरी, घोटी, कसारा, या दुर्गम भागातील एकूण ४०० आदिवासी निवासी विद्यार्थी व विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. गेल्या आठवड्यात अती पर्जन्यवृष्टीमुळे भातसा नदीला पूर आला. नदीच्या पुराचे पाणी थेट आश्रमशाळेच्या मुलींच्या वसतिगृहात शिरू लागले. पाणी वाढू लागल्याने वेळीच लहान मुला-मुलींना आश्रमशाळा संचालक व शिक्षक कर्मचाऱ्यांनी या पुराच्या पाण्यातून कसेबसे बाहेर काढले आणि बाजूच्या शाळेच्या वर्गखोल्यांच्या एका इमारतीत सुरक्षित ठेवले. पूर दोन दिवसांनी ओसरला परंतु या पुराने गरीब आदिवासी मुला-मुलींच्या, वसतिगृहाची दैना केली. वसतिगृहातील मुलींचे कपडे, पांघरूण, चादरी, अन्य साहित्य शालेय वस्तू, पाठ्यपुस्तकांच्या पेट्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. उरल्यासुरल्या पेट्या पाण्याने भरल्याने यातील पुस्तके, वह्या चिंब भिजल्या आणि फाटून गेल्या. पाटी, पेन, पेन्सिल आदी साहित्यांसह धान्य, गहू, तांदुळ, डाळी, कडधान्य, मसाला, भाजीपाला अशा सर्व वस्तूंची नासाडी झाली. पुराच्या पाण्यातून वाहत आलेले विषारी साप, विंचू, सरडे यांनीदेखील प्रवेश केल्यामुळे त्यांचा धोका आहेच! येथे प्रचंड दुर्गंधी पसरल्याने सध्या स्वच्छतेचे काम आश्रमशाळा कर्मचाऱ्यांकडून सुरू आहे. मात्र या पूरसंकटातून वाचलेली मुले अद्यापही भीतीच्या छायेखाली आहेत. आश्रमशाळा वसतिगृह भोजनालयाचीही दैन्यावस्था झाल्याने पालक मुलांना शाळेतून घरी घेऊन गेले आहेत. या परिसरातील गोटेघर, खडवली आणि भातसई या आश्रमशाळांचेही पुरामुळे नुकसान झाले आहे.
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भातसा नदीला पूर आला अन् दप्तराच्या पत्र्याच्या पेट्या, पुस्तके, वह्या, पेन्सिल असे सर्व साहित्य भिजले... कपडे, अन्नधान्याची नासाडी झाली... ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील भातसई येथील गाडगे महाराज आश्रमशाळेसह अन्य आश्रमशाळांची अशी दुरवस्था झाली आहे.… त्यात वसतिगृहातील भोजनालयाचीही दैन्यवस्था झाल्याने तेथील चूलही विझली आहे. त्यामुळे अनेक पालक त्यांच्या पाल्यांना घेऊन गावाकडे परतली आहेत.
भातसई गावाजवळ नदीकिनारी श्री गाडगे महाराज मिशन मुंबई संचलित या संस्थेची शासकीय अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा आहे. या आश्रमशाळेत शहापूर, पडघा, भिवंडी, जव्हार, मोखाडा, खोडाळा, इगतपुरी, घोटी, कसारा, या दुर्गम भागातील एकूण ४०० आदिवासी निवासी विद्यार्थी व विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. गेल्या आठवड्यात अती पर्जन्यवृष्टीमुळे भातसा नदीला पूर आला. नदीच्या पुराचे पाणी थेट आश्रमशाळेच्या मुलींच्या वसतिगृहात शिरू लागले. पाणी वाढू लागल्याने वेळीच लहान मुला-मुलींना आश्रमशाळा संचालक व शिक्षक कर्मचाऱ्यांनी या पुराच्या पाण्यातून कसेबसे बाहेर काढले आणि बाजूच्या शाळेच्या वर्गखोल्यांच्या एका इमारतीत सुरक्षित ठेवले. पूर दोन दिवसांनी ओसरला परंतु या पुराने गरीब आदिवासी मुला-मुलींच्या, वसतिगृहाची दैना केली. वसतिगृहातील मुलींचे कपडे, पांघरूण, चादरी, अन्य साहित्य शालेय वस्तू, पाठ्यपुस्तकांच्या पेट्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. उरल्यासुरल्या पेट्या पाण्याने भरल्याने यातील पुस्तके, वह्या चिंब भिजल्या आणि फाटून गेल्या. पाटी, पेन, पेन्सिल आदी साहित्यांसह धान्य, गहू, तांदुळ, डाळी, कडधान्य, मसाला, भाजीपाला अशा सर्व वस्तूंची नासाडी झाली. पुराच्या पाण्यातून वाहत आलेले विषारी साप, विंचू, सरडे यांनीदेखील प्रवेश केल्यामुळे त्यांचा धोका आहेच! येथे प्रचंड दुर्गंधी पसरल्याने सध्या स्वच्छतेचे काम आश्रमशाळा कर्मचाऱ्यांकडून सुरू आहे. मात्र या पूरसंकटातून वाचलेली मुले अद्यापही भीतीच्या छायेखाली आहेत. आश्रमशाळा वसतिगृह भोजनालयाचीही दैन्यावस्था झाल्याने पालक मुलांना शाळेतून घरी घेऊन गेले आहेत. या परिसरातील गोटेघर, खडवली आणि भातसई या आश्रमशाळांचेही पुरामुळे नुकसान झाले आहे.