अंबरनाथ : अंबरनाथ शरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर अनेक खड्डे पडले आहेत. मात्र सत्ताधारी आणि प्रशासनाविरोधात सोशल मीडियावर संताप व्यक्त होत असला, तरी शहरात विरोधक नसल्याची टीका होत असताना, सोमवारी शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांविरोधात ओमी कलानी चमूच्या कार्यकर्त्यांनी अंबरनाथ नगरपालिकेवर धडक मोर्चा काढला. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावेळी मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत त्यांचा निषेध केला. तसेच सत्ताधारी आणि विरोधकांचाही समाचार घेतला. या मोर्चात शहरातील इतर नागरिकांनीही सहभाग घेत नगरपालिकेविरोधात रोष व्यक्त केला. ओमी कलानी यांनी उपमुख्याधिकारी खाडे यांच्याकडे आपल्या मागण्यांचे निवेदन देत आठवडाभरात शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची मागणी केली. अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला.
ओमी कलानी चमूचा मोर्चा
अंबरनाथ शरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर अनेक खड्डे पडले आहेत...
Maharashtra Times 17 Jul 2018, 4:00 am