अ‍ॅपशहर

उड्डाणपुलावर दीड तास कोंडी

अंबरनाथ येथील पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या उड्डाणपुलावर शुक्रवारी दुपारी एका स्कूलबसमध्ये अचानक बिघाड झाल्याने, उड्डाणपुलावर मोठी वाहतूककोंडी झाली होती. त्यामुळे एकेरी मार्गावरून वाहने जात असल्याने उड्डाणपूल आणि स्टेशन परिसरात वाहनचालकांना तब्बल एक ते दीड तास वाहतूककोंडीचा सामना करावा लागला.

Maharashtra Times 16 Sep 2017, 4:00 am
म. टा. वृत्तसेवा, अंबरनाथ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम one and half hour traffic on ambarnath bridge
उड्डाणपुलावर दीड तास कोंडी


अंबरनाथ येथील पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या उड्डाणपुलावर शुक्रवारी दुपारी एका स्कूलबसमध्ये अचानक बिघाड झाल्याने, उड्डाणपुलावर मोठी वाहतूककोंडी झाली होती. त्यामुळे एकेरी मार्गावरून वाहने जात असल्याने उड्डाणपूल आणि स्टेशन परिसरात वाहनचालकांना तब्बल एक ते दीड तास वाहतूककोंडीचा सामना करावा लागला.

अंबरनाथ येथील पश्चिम भागातील पोलिस स्टेशन ते मटका चौक या परिसरात शाळा सुटण्याच्या वेळेत नियमित वाहतूककोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागतो. त्यात शुक्रवारी दुपारी अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या उड्डाणपुलावर एका स्कूलबसमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे उड्डाणपुलावर अन्य स्कूल बसेसही एका मागोमाग एक असल्याने वाहतूककोंडीत अधिक भर पडली होती. तसेच, दुचाकीचालक आणि अन्य अवजड वाहनांमुळे उड्डाणपूल आणि मटका चौक तसेच हुतात्मा चौकात वाहनांच्या एका मागोमाग एक रांगा लागल्या होत्या. एकीकडे दुपारची वेळ असल्याने उन्हाच्या उकाड्यात वाहनचालक कोंडीत अडकले होते. त्यामुळे मटका चौकातून आणि शिवाजी चौकात जाणाऱ्या मार्गावरही वाहतूककोंडीचा फटका बसला होता. या उड्डाणपुलावरून जाणाऱ्या अॅम्ब्युलन्स या वाहतूककोंडीत अडकल्या होत्या. अखेर अॅम्ब्युलन्सला मार्ग काढण्यासाठी वाहन चालकांनी मदत केली. तर, या वाहतूककोंडीत अडकलेल्या अन्य स्कूलबसमधील लहान विद्यार्थ्यांचे मात्र उकाड्यामुळे चांगलेच हाल होत होते. अखेर दुपारी दोन नंतर या स्कूलबसमधील बिघाड दुरुस्त झाल्याने या उड्डाणपुलावरील वाहतूककोंडी सुरळीत झाली होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज