म. टा. वृत्तसेवा कल्याण :
हातावर पोट असलेल्यांना करोना महामारीच्या काळात कामासाठी घराबाहेर पडावेच लागत असून दोन फोन खरेदी करण्याची त्यांची ऐपत नसल्यामुळे पालक कामावरून घरी परतल्यानंतरच त्यांच्या पाल्यांना अभ्यासाचे धडे गिरवता येत असल्याची स्थिती ग्रामीण भागासह चाळी आणि झोपडपट्ट्यांत राहणाऱ्या विद्यार्थ्यांची आहे. यामुळे या परिस्थितीत अध्यापनासाठी शिक्षकांनीच मार्ग शोधला असून या विद्यार्थ्यांचे वर्ग चक्क रात्री घेतले जातात.
करोना महामारीच्या काळात विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड पडू नये तसेच त्यांचा महामारीपासून बचाव करण्यासाठी राज्य शासनाने ऑनलाइन शिक्षण प्रणालीचा मध्यम मार्ग काढला आहे. त्यानुसार सकाळी किंवा दुपारच्या सत्रात शाळांमधील शिक्षक विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग घेतात. मात्र, कल्याण पूर्वेकडील पिसवली, गोळवली, दावडी या परिसरात राहणारे बहुतांशी पालक कंपन्यांमध्ये कामगार म्हणून काम करत असून अनलॉक होताच कंपन्या सुरू झाल्याने या कामगारांना कामावर जाणे भाग आहे. घर चालविण्याइतका पगार कसाबसा हातात पडणाऱ्या या पालकांना अँड्रॉइड फोन खरेदी करणे परवडणारे नाही. दोन फोन खरेदी करण्याची पालकांची ऐपत नाही. शिक्षकांनी फोनवर संपर्क साधून या पालकांना ऑनलाइन ट्रेनिंगची वेळ कळवली तेव्हा या पालकांनी हतबलता व्यक्त करत आपण कामावरून परतल्यावरच मुलांना अभ्यासासाठी फोन देणे शक्य असल्याचे सांगितले.
या अडचणीवर चर्चा करून शिक्षकांनी सुवर्णमध्य काढला आहे. कामावरून घरी परतणाऱ्या पालकांच्या वेळा नोंदवून घेत त्यांच्या वेळानुसार दररोज त्यांना संपर्क करून शिक्षक विद्यार्थ्यांना अभ्यासाचे धडे देण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे शिक्षक रात्री फोनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अध्यापन करत आहेत.
अनेकदा पालकांना फोनवर इतर कामे असल्याने पालक विद्यार्थ्यांना फोनच देत नसल्याचे विद्यार्थी सांगतात. अशा परिस्थितीत या विद्यार्थ्यांना कसे शिकवायचे, असा प्रश्न शिक्षकांना पडतो. तरीही हार न मानता शिक्षक रात्री पालकांशी संपर्क साधून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मोबाइल देण्याची विनंती करतात. पालक राजी झाले तर त्यानंतर वर्ग सुरू होतो. विद्यार्थ्याचा आणि पालकांचा अनेकदा रात्री टीव्ही पाहण्याचा मूड असतो. त्यांना अभ्यास , शिकवणे हा त्रास वाटतो. मग पालक फोन सायलेंटवर ठेवतात आणि उचलतच नाहीत. यासारख्या अनेकविध समस्यांचा सामना करत शिक्षकांनी न थकता हे वर्ग सुरू ठेवले आहेत. कासवगतीने का होईना अध्यापन पुढे सरकत आहे. सध्याच्या काळात मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्याचे आव्हान हे शिक्षक दररोज पेलत आहेत, त्यावर यशस्वी मात करून पुढे जात आहेत.
जिल्हा परिषदेच्या शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक मोलमजुरी करणारे किंवा कंपन्यांमध्ये काम करणारे कामगार आहेत त्यांना कामावर जाणे भाग असल्यामुळे सकाळी किंवा दुपारी या मुलांना ऑनलाइन शिकवता येत नाही. अनेकदा पालक विद्यार्थ्यांना फोनच देत नाहीत यामुळे शिक्षणात खंड पडतो. मात्र समस्यांवर मात करत शिक्षण देण्याचा प्रयत्न सुरू आहेत.
अजय पाटील, जिल्हा परिषद शाळा पिस्वली
हातावर पोट असलेल्यांना करोना महामारीच्या काळात कामासाठी घराबाहेर पडावेच लागत असून दोन फोन खरेदी करण्याची त्यांची ऐपत नसल्यामुळे पालक कामावरून घरी परतल्यानंतरच त्यांच्या पाल्यांना अभ्यासाचे धडे गिरवता येत असल्याची स्थिती ग्रामीण भागासह चाळी आणि झोपडपट्ट्यांत राहणाऱ्या विद्यार्थ्यांची आहे. यामुळे या परिस्थितीत अध्यापनासाठी शिक्षकांनीच मार्ग शोधला असून या विद्यार्थ्यांचे वर्ग चक्क रात्री घेतले जातात.
करोना महामारीच्या काळात विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड पडू नये तसेच त्यांचा महामारीपासून बचाव करण्यासाठी राज्य शासनाने ऑनलाइन शिक्षण प्रणालीचा मध्यम मार्ग काढला आहे. त्यानुसार सकाळी किंवा दुपारच्या सत्रात शाळांमधील शिक्षक विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग घेतात. मात्र, कल्याण पूर्वेकडील पिसवली, गोळवली, दावडी या परिसरात राहणारे बहुतांशी पालक कंपन्यांमध्ये कामगार म्हणून काम करत असून अनलॉक होताच कंपन्या सुरू झाल्याने या कामगारांना कामावर जाणे भाग आहे. घर चालविण्याइतका पगार कसाबसा हातात पडणाऱ्या या पालकांना अँड्रॉइड फोन खरेदी करणे परवडणारे नाही. दोन फोन खरेदी करण्याची पालकांची ऐपत नाही. शिक्षकांनी फोनवर संपर्क साधून या पालकांना ऑनलाइन ट्रेनिंगची वेळ कळवली तेव्हा या पालकांनी हतबलता व्यक्त करत आपण कामावरून परतल्यावरच मुलांना अभ्यासासाठी फोन देणे शक्य असल्याचे सांगितले.
या अडचणीवर चर्चा करून शिक्षकांनी सुवर्णमध्य काढला आहे. कामावरून घरी परतणाऱ्या पालकांच्या वेळा नोंदवून घेत त्यांच्या वेळानुसार दररोज त्यांना संपर्क करून शिक्षक विद्यार्थ्यांना अभ्यासाचे धडे देण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे शिक्षक रात्री फोनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अध्यापन करत आहेत.
अनेकदा पालकांना फोनवर इतर कामे असल्याने पालक विद्यार्थ्यांना फोनच देत नसल्याचे विद्यार्थी सांगतात. अशा परिस्थितीत या विद्यार्थ्यांना कसे शिकवायचे, असा प्रश्न शिक्षकांना पडतो. तरीही हार न मानता शिक्षक रात्री पालकांशी संपर्क साधून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मोबाइल देण्याची विनंती करतात. पालक राजी झाले तर त्यानंतर वर्ग सुरू होतो. विद्यार्थ्याचा आणि पालकांचा अनेकदा रात्री टीव्ही पाहण्याचा मूड असतो. त्यांना अभ्यास , शिकवणे हा त्रास वाटतो. मग पालक फोन सायलेंटवर ठेवतात आणि उचलतच नाहीत. यासारख्या अनेकविध समस्यांचा सामना करत शिक्षकांनी न थकता हे वर्ग सुरू ठेवले आहेत. कासवगतीने का होईना अध्यापन पुढे सरकत आहे. सध्याच्या काळात मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्याचे आव्हान हे शिक्षक दररोज पेलत आहेत, त्यावर यशस्वी मात करून पुढे जात आहेत.
जिल्हा परिषदेच्या शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक मोलमजुरी करणारे किंवा कंपन्यांमध्ये काम करणारे कामगार आहेत त्यांना कामावर जाणे भाग असल्यामुळे सकाळी किंवा दुपारी या मुलांना ऑनलाइन शिकवता येत नाही. अनेकदा पालक विद्यार्थ्यांना फोनच देत नाहीत यामुळे शिक्षणात खंड पडतो. मात्र समस्यांवर मात करत शिक्षण देण्याचा प्रयत्न सुरू आहेत.
अजय पाटील, जिल्हा परिषद शाळा पिस्वली