नवी मुंबई : मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये पाकिस्तानातून आलेल्या साखरेची चौकशी करणार असल्याची माहिती पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी वाशी येथे दिली. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील (एपीएमसी) घाऊक भाजीपाला मार्केâटचे धर्मवीर संभाजीराजे भाजीपाला बाजारसंकुल नामकरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. व्यापाऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी दराने माल विकू नये. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील, तर व्यापाऱ्यांनी त्यांच्या मालाला चांगला भाव दिला पाहिजे. यासाठी केंद्र सरकारने उत्पादन खर्चापेक्षा दीडपट हमीभाव देण्याचा निर्णय घेतला आहे. या हमीभावापेक्षा कमी भावाने जे व्यापारी शेतमाल विक्री करतील त्यांच्यावर बाजार समित्या कारवाया करतील, प्रसंगी व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्याचे आदेश संबंधित बाजार समित्यांना दिले आहेत, असेही ते म्हणाले.
साखरेची चौकशी करणार
मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये पाकिस्तानातून आलेल्या साखरेची चौकशी करणार असल्याची माहिती पणनमंत्री...
Maharashtra Times 15 May 2018, 4:00 am