म. टा. वृत्तसेवा, ठाणे
‘पाकिस्तानची कृत्ये लक्षात घेता त्याला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्यासाठी भारताला दुसऱ्या देशांची वाट पाहण्याची गरज नाही. त्यासाठी प्रबळ राजकीय इच्छाशक्ती हवी,’ असे परखड मत एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले यांनी व्यक्त केले. ठाण्यात सुरू असणाऱ्या २९व्या अखिल भारतीय सावरकर साहित्य संमेलनात शनिवारी ‘भारताची संरक्षण सिद्धता’ या परिसंवादात ते बोलत होते.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे संरक्षण आणि सुव्यवस्था यांबाबत नेहमीच आग्रही होते. त्याविषयी विविध धोरणेही त्यांनी मांडली होती. त्याच अनुषंगाने संमेलनात या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. भारताच्या इतिहासातील विविध युद्धांची माहिती देताना गोखले म्हणाले, ‘भारतात युद्धाबाबत अनास्था दिसून येते, संसदेत या बाबत चर्चा होताना अनेकांची गैरहजेरी असते अथवा याकडे तितक्या गांभिर्याने पाहिले जात नाही. त्यासह शांतता हा कोणत्याही देशाचा पाया असून त्याव्यतिरिक्त देशाची प्रगती होणे शक्य नाही. राजकारणी आणि संरक्षण दलात समन्वय साधला पाहिजे. संरक्षण दलाला निर्णय घेण्याचे अधिकार दिल्यास त्यांचे मनोबल अधिक वाढेल.’
भारताच्या साधनसामग्रीवरही यावेळी त्यांनी आपले मत मांडले. कारगिलच्या युद्धात वापरण्यात आलेली साधन सामग्री ही आपल्याला आयात करावी लागली होती. त्यामुळे आपले तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी आपण ‘मेक इन इंडिया’वर भर दिला पाहिजे. त्यासह हवाई तसेच भूदल आणि नौदल यांमध्ये समन्वय असणे गरजेचे आहे आणि याची प्रचीती कारगील युद्धात आली. याच सत्रात कमांडर सुबोध पुरोहित यांनी नौदलाचा प्रवास उलगडला. नौदल हे दोन देशांतील मैत्रिपूर्ण संबंध चांगले टिकवू शकतात. नौदलाचे कार्यक्षेत्र फार मोठे आहे, हे सांगताना त्यांनी या सेवेच्या मुख्य शाखांची माहिती दिली. भारताच्या साधनसामग्रीचा आलेख मांडत त्यांनी चीनसह त्याची तुलना केली. चीनचे नौदल हे आपल्यापेक्षा तिप्पट असले तरी त्यापासून आपल्याला कोणताही धोका नाही. पाकिस्तानने सागरी मार्गाने हल्ला केला तर त्यांच्यापेक्षा आपण बलाढ्य आहोत आणि त्यांना चोख उत्तर देऊ, असे मत पुरोहित यांनी व्यक्त केले.
‘पाकिस्तानची कृत्ये लक्षात घेता त्याला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्यासाठी भारताला दुसऱ्या देशांची वाट पाहण्याची गरज नाही. त्यासाठी प्रबळ राजकीय इच्छाशक्ती हवी,’ असे परखड मत एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले यांनी व्यक्त केले. ठाण्यात सुरू असणाऱ्या २९व्या अखिल भारतीय सावरकर साहित्य संमेलनात शनिवारी ‘भारताची संरक्षण सिद्धता’ या परिसंवादात ते बोलत होते.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे संरक्षण आणि सुव्यवस्था यांबाबत नेहमीच आग्रही होते. त्याविषयी विविध धोरणेही त्यांनी मांडली होती. त्याच अनुषंगाने संमेलनात या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. भारताच्या इतिहासातील विविध युद्धांची माहिती देताना गोखले म्हणाले, ‘भारतात युद्धाबाबत अनास्था दिसून येते, संसदेत या बाबत चर्चा होताना अनेकांची गैरहजेरी असते अथवा याकडे तितक्या गांभिर्याने पाहिले जात नाही. त्यासह शांतता हा कोणत्याही देशाचा पाया असून त्याव्यतिरिक्त देशाची प्रगती होणे शक्य नाही. राजकारणी आणि संरक्षण दलात समन्वय साधला पाहिजे. संरक्षण दलाला निर्णय घेण्याचे अधिकार दिल्यास त्यांचे मनोबल अधिक वाढेल.’
भारताच्या साधनसामग्रीवरही यावेळी त्यांनी आपले मत मांडले. कारगिलच्या युद्धात वापरण्यात आलेली साधन सामग्री ही आपल्याला आयात करावी लागली होती. त्यामुळे आपले तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी आपण ‘मेक इन इंडिया’वर भर दिला पाहिजे. त्यासह हवाई तसेच भूदल आणि नौदल यांमध्ये समन्वय असणे गरजेचे आहे आणि याची प्रचीती कारगील युद्धात आली. याच सत्रात कमांडर सुबोध पुरोहित यांनी नौदलाचा प्रवास उलगडला. नौदल हे दोन देशांतील मैत्रिपूर्ण संबंध चांगले टिकवू शकतात. नौदलाचे कार्यक्षेत्र फार मोठे आहे, हे सांगताना त्यांनी या सेवेच्या मुख्य शाखांची माहिती दिली. भारताच्या साधनसामग्रीचा आलेख मांडत त्यांनी चीनसह त्याची तुलना केली. चीनचे नौदल हे आपल्यापेक्षा तिप्पट असले तरी त्यापासून आपल्याला कोणताही धोका नाही. पाकिस्तानने सागरी मार्गाने हल्ला केला तर त्यांच्यापेक्षा आपण बलाढ्य आहोत आणि त्यांना चोख उत्तर देऊ, असे मत पुरोहित यांनी व्यक्त केले.