अ‍ॅपशहर

भूकंपाच्या भयाने स्थलांतर

घरात झोपावे तर भूकंपाची आणि शेतात साप, विंचवाची भीती....तलासरी व डहाणू तालुक्यातील नागरिक या समस्येमुळे वैतागले आहेत. धुंदलवाडीच्या मुंबईपाड्याने भूकंपाच्या भीतीने गाव सोडून स्थलांतर केले आहे. तर येथील हळदपाड्यातील ग्रामस्थांनी घरात न राहता शेतातच तळ ठोकला आहे.

Maharashtra Times 28 Nov 2018, 2:03 am
म. टा. वृत्तसेवा, पालघर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम palghar villagers living in villages hit by earthquake fear they will be forgotten
भूकंपाच्या भयाने स्थलांतर


घरात झोपावे तर भूकंपाची आणि शेतात साप, विंचवाची भीती....तलासरी व डहाणू तालुक्यातील नागरिक या समस्येमुळे वैतागले आहेत. धुंदलवाडीच्या मुंबईपाड्याने भूकंपाच्या भीतीने गाव सोडून स्थलांतर केले आहे. तर येथील हळदपाड्यातील ग्रामस्थांनी घरात न राहता शेतातच तळ ठोकला आहे.

तलासरी व डहाणू या दोन्ही तालुक्यात काही भागांत गेल्या दोन महिन्यांपासून भूगर्भातून गूढ आवाज येत असल्याच्या तक्रारी होत्या. मात्र शासकीय यंत्रणा त्याची गंभीर दखल घेत नव्हती. परंतु शनिवारी दुपारी झालेल्या भूकंपाच्या हादऱ्याने त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. दरम्यान, स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून त्यांनी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे.

२४ नोव्हेंबर रोजी डहाणू व तलासरी भागात दुपारपासून भूकंपाचे सौम्य धक्के बसले. त्यातील दुपारी ३.१५ वाजता बसलेला धक्का हा ३.३ मॅग्निट्युडचा आहे. पालघर जिल्ह्यात साधारणत: ६ मॅग्निट्युडचा धक्का बसल्यास काळजीचे कारण असेल, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. भूकंपाच्या अनुषंगाने कोणती काळजी घ्यावी याबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय पालघर यांच्यामार्फत २६ नोव्हेंबर पासून प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या प्रशिक्षणसाठी नियुक्त केलेले अनिल गणपत गावित, काशीनाथ रडका कुरकुटे, सहाय्यक उपनियंत्रक,नागरी संरक्षक दल तारापूर यांनी सोमवारी धुंदलवाडी, हळदपाडा, वेदांत रुग्णालय येथे ग्रामस्थांना माहिती देऊन जनजागृती केली दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज