अ‍ॅपशहर

पूर ओसरल्यानंतर पंचायत समितीतर्फे उपाययोजना

गेल्या आठवड्यात वसईमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक घरे, झोपड्यांमध्ये तसेच सखल भागांत पाणी साचून राहिले होते. त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. यासाठी पंचायत समितीतर्फे उपाययोजना करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Aug 2019, 4:47 pm
म. टा. वृत्तसेवा, वसई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम panchayat samiti to prevent spreading of diseases after floods
पूर ओसरल्यानंतर पंचायत समितीतर्फे उपाययोजना


गेल्या आठवड्यात वसईमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक घरे, झोपड्यांमध्ये तसेच सखल भागांत पाणी साचून राहिले होते. त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. यासाठी पंचायत समितीतर्फे उपाययोजना करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

वसई तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती हद्दीत ठिकठिकाणी औषध फवारणी, स्वच्छता, कीटकनाशकांची फवारणी, पाण्याचे नमुने तपासणे आदी कामे हाती घेण्यात आली आहेत. ज्या भागांत पाणी भरले होते अशा भागांतील घरांमध्ये जाऊन, चौकशी करून, आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्यात येत आहेत. तशा प्रकारच्या सूचना देखील संबधित ग्रामपंचायती, ग्रामसेवकांना देण्यात आल्याते पंचायत समितीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. पंचायत समितीतर्फे टीसीएल, पाणी शुद्धीकरण पावडर आवश्यक तेवढ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच साथीचे रोग पसरू नये यासाठी पाण्याचे नमुने तपासून त्यानुसार कार्यवाही करण्यात येत असल्याचे पंचायत समिती गटविकास अधिकारी भारत जगताप यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज