म. टा. वृत्तसेवा, ठाणे
गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असणाऱ्या आरटीई प्रवेश प्रक्रियेतील गोंधळाला पूर्णविराम न मिळाल्याने पालकांनी आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतला आहे. निष्क्रिय प्रशासन आणि मनमानी करणाऱ्या शाळा यांच्याविरोधात मंगळवारी डोंबिवलीत तसेच बुधवारी कल्याणच्या पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन छेडले आहे.
मोफत शिक्षणासाठी नामांकित शाळांमध्ये पंचवीस टक्के राखीव जागांवर सुरू करण्यात आलेल्या आरटीई प्रवेश प्रक्रियेला तीन महिने पूर्ण झाले असले तरी गोंधळाची मालिका अद्याप सुरूच आहे. सुरुवातीला प्रवेश देण्याबाबत शाळांचा असणारा निरुत्साह, त्यानंतर होणारी पैशांची मागणी, पालकांकडून वसूल केली जाणारी फी आणि मोफत गणवेशांची टाळाटाळ अशा अनेक घटनांमुळे पालक त्रस्त आहेत. काही शाळांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेत प्रवेश खुले केले असले तरी अनेक शाळांचे आडमुठे धोरण कायम आहे. शाळांच्या मनमानीची तक्रार प्रशासनाकडे करूनही त्यावर भूमिका न घेण्याऱ्या प्रशासनाविरोधात पालकांनी आंदोलन छेडले आहे.
तक्रारींचा लेखाजोखा
आरटीईसंदर्भात सातत्याने काम करणाऱ्या डेमोक्रटिक युथ फेडरनेश ऑफ इंडिया या संस्थेने पालकांना एकत्र आणले आहे. मंगळवारी डोंबिवलीतील शिवाजी चौक येथे प्राथमिक निदर्शने होणार आहेत. तर बुधवारी कल्याणच्या पंचायत समितीसमोर पालक मोर्चा घेऊन जाणार आहेत. शाळा आणि प्रशासन या दोघांविरोधात हा मोर्चा असून आरटीई प्रवेशातील गोंधळाकडे प्रशासनाने गांभीर्याने पहावे, असे संघटनेतर्फे सांगण्यात येते. आंदोलनादरम्यान सध्या पालकांची अडवणूक करणाऱ्या शाळांची माहिती, तसेच प्रशासनाकडे त्याबाबत केलेल्या तक्रारी यांचाही लेखाजोखा मांडण्यात येणार आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असणाऱ्या आरटीई प्रवेश प्रक्रियेतील गोंधळाला पूर्णविराम न मिळाल्याने पालकांनी आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतला आहे. निष्क्रिय प्रशासन आणि मनमानी करणाऱ्या शाळा यांच्याविरोधात मंगळवारी डोंबिवलीत तसेच बुधवारी कल्याणच्या पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन छेडले आहे.
मोफत शिक्षणासाठी नामांकित शाळांमध्ये पंचवीस टक्के राखीव जागांवर सुरू करण्यात आलेल्या आरटीई प्रवेश प्रक्रियेला तीन महिने पूर्ण झाले असले तरी गोंधळाची मालिका अद्याप सुरूच आहे. सुरुवातीला प्रवेश देण्याबाबत शाळांचा असणारा निरुत्साह, त्यानंतर होणारी पैशांची मागणी, पालकांकडून वसूल केली जाणारी फी आणि मोफत गणवेशांची टाळाटाळ अशा अनेक घटनांमुळे पालक त्रस्त आहेत. काही शाळांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेत प्रवेश खुले केले असले तरी अनेक शाळांचे आडमुठे धोरण कायम आहे. शाळांच्या मनमानीची तक्रार प्रशासनाकडे करूनही त्यावर भूमिका न घेण्याऱ्या प्रशासनाविरोधात पालकांनी आंदोलन छेडले आहे.
तक्रारींचा लेखाजोखा
आरटीईसंदर्भात सातत्याने काम करणाऱ्या डेमोक्रटिक युथ फेडरनेश ऑफ इंडिया या संस्थेने पालकांना एकत्र आणले आहे. मंगळवारी डोंबिवलीतील शिवाजी चौक येथे प्राथमिक निदर्शने होणार आहेत. तर बुधवारी कल्याणच्या पंचायत समितीसमोर पालक मोर्चा घेऊन जाणार आहेत. शाळा आणि प्रशासन या दोघांविरोधात हा मोर्चा असून आरटीई प्रवेशातील गोंधळाकडे प्रशासनाने गांभीर्याने पहावे, असे संघटनेतर्फे सांगण्यात येते. आंदोलनादरम्यान सध्या पालकांची अडवणूक करणाऱ्या शाळांची माहिती, तसेच प्रशासनाकडे त्याबाबत केलेल्या तक्रारी यांचाही लेखाजोखा मांडण्यात येणार आहे.