अजित पवार यांचे आव्हान
म. टा. विशेष प्रतिनिधी, ठाणे
बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांचे गैरप्रकार चव्हाट्यावर आणण्याचे काम आमचे नगरसेवक करत होते. मात्र, परमार यांच्या डायरीतील एका पानाचा आधार घेत या नगरसेवकांना अडकवण्यात आले. परमार यांच्या डायरीत शिवसेनेच्या बगलबच्च्यांची नावे आहेत. त्याशिवाय, परमार आमहत्येपूर्वी मंत्रालयातही हेलपाटे मारत होते. सरकारची हिंमत असेल तर परमार यांची संपूर्ण डायरी जाहीर करून निष्पक्ष चौकशी करा, असे आव्हान राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बुधवारी ठाण्यात बोलताना दिले.
ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गडकरी रंगायतन येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, उपाध्यक्ष वसंत डावखरे, गणेश नाईक, आ. जीतेंद्र आव्हाड, निरंजन डावखरे, आनंद पराजपे आदी पदाधिकारी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. त्यावेळी अजित पवार यांनी परमर आत्महत्येप्रकरणात गुन्हे दाखल झालेल्या हणमंत जगदाळे आणि नजीब मुल्ला या दोन्ही नगरसेवकांच्या पाठिशी पक्ष खंबीरपणे उभा असल्याचे नमूद केले. व एकाची बदनामी करायची, दुसऱ्यावर अन्याय करायचा हेच सरकारचे धोरण आहे. चार दिवस सासूचे असले तर चार दिवस सुनेचेही असतात, हे सरकारने लक्षात ठेवावं, अशा शब्दांत अजित पवार यांनी हल्लाबोल केला.
गणेशोत्सव मंडळांवर लादला जाणारा दंड हा जिझिया करासारखा असून उद्या अन्य सणांवरही असेच दंड लादले जातील. आघाडी सरकार असते तर दहीहंडी उत्सवावर असे विघ्न आले नसते. तगड्या वकिलांची फौज सर्वोच्च न्यायालयात उभी करून आम्ही उत्सवाची परंपरा जपली असती, असा दावाही पवार यांनी यावेळी केले. आबांनी बंद केलेले डान्सबार सुरू झाले. कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. मेक इन इंडिया, ‘मेक इन महाराष्ट्र’चा पुरता फज्जा उडाला आहे. मुंबई ठाण्यासारखी शहरे भ्रष्टाचाराने बरबटलेली आहेत. त्यानंतरही पालिका निवडणुकीत कमळ पुन्हा उगवेल, असा विश्वास त्यांना वाटतोय. परंतु, कमळ केव्हाच कोमेजले, हे त्यांना आगामी पालिका निवडणुकीत उमजेल, असा टोलाही त्यांनी लगावला.
म. टा. विशेष प्रतिनिधी, ठाणे
बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांचे गैरप्रकार चव्हाट्यावर आणण्याचे काम आमचे नगरसेवक करत होते. मात्र, परमार यांच्या डायरीतील एका पानाचा आधार घेत या नगरसेवकांना अडकवण्यात आले. परमार यांच्या डायरीत शिवसेनेच्या बगलबच्च्यांची नावे आहेत. त्याशिवाय, परमार आमहत्येपूर्वी मंत्रालयातही हेलपाटे मारत होते. सरकारची हिंमत असेल तर परमार यांची संपूर्ण डायरी जाहीर करून निष्पक्ष चौकशी करा, असे आव्हान राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बुधवारी ठाण्यात बोलताना दिले.
ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गडकरी रंगायतन येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, उपाध्यक्ष वसंत डावखरे, गणेश नाईक, आ. जीतेंद्र आव्हाड, निरंजन डावखरे, आनंद पराजपे आदी पदाधिकारी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. त्यावेळी अजित पवार यांनी परमर आत्महत्येप्रकरणात गुन्हे दाखल झालेल्या हणमंत जगदाळे आणि नजीब मुल्ला या दोन्ही नगरसेवकांच्या पाठिशी पक्ष खंबीरपणे उभा असल्याचे नमूद केले. व एकाची बदनामी करायची, दुसऱ्यावर अन्याय करायचा हेच सरकारचे धोरण आहे. चार दिवस सासूचे असले तर चार दिवस सुनेचेही असतात, हे सरकारने लक्षात ठेवावं, अशा शब्दांत अजित पवार यांनी हल्लाबोल केला.
गणेशोत्सव मंडळांवर लादला जाणारा दंड हा जिझिया करासारखा असून उद्या अन्य सणांवरही असेच दंड लादले जातील. आघाडी सरकार असते तर दहीहंडी उत्सवावर असे विघ्न आले नसते. तगड्या वकिलांची फौज सर्वोच्च न्यायालयात उभी करून आम्ही उत्सवाची परंपरा जपली असती, असा दावाही पवार यांनी यावेळी केले. आबांनी बंद केलेले डान्सबार सुरू झाले. कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. मेक इन इंडिया, ‘मेक इन महाराष्ट्र’चा पुरता फज्जा उडाला आहे. मुंबई ठाण्यासारखी शहरे भ्रष्टाचाराने बरबटलेली आहेत. त्यानंतरही पालिका निवडणुकीत कमळ पुन्हा उगवेल, असा विश्वास त्यांना वाटतोय. परंतु, कमळ केव्हाच कोमेजले, हे त्यांना आगामी पालिका निवडणुकीत उमजेल, असा टोलाही त्यांनी लगावला.