कल्याण : उद्योगक्षेत्राच्या वाढीसाठी बँकांचे योगदान मोठे असून दोन्ही क्षेत्रांचे यश परस्परांवर अवलंबून आहे. म्हणूनच बँक आणि उद्योग यात महत्त्वाचे नात निर्माण झाले आहे. मात्र आज लघु उद्योगांची अवस्था पाहता या क्षेत्राबाबत थोडा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची आवश्यकता निर्माण झाल्याचे मत लघू उद्योग भारतीचे सरचिटणीस भूषणजी मर्दे यांनी व्यक्त केले. डोंबिवली नागरी सहकारी बँकेने आयोजित केलेल्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. लघू उद्योग क्षेत्रात आज ९४ टक्के नोकऱ्या दिल्या जात असून देशाच्या औद्योगिक उत्पादनात ३८ टक्के वाटा या क्षेत्राने उचलला आहे. मात्र, उद्योग धोरण ठरविताना लघू उद्योग क्षेत्राला विचारात घेतले जात नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी संचालक निधीतून पाच लाखांचा व कर्मचारी कल्याण निधीतून एक लाखांचा चेक रा. स्व. संघ जनकल्याण समितीच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला.
‘लघु उद्योगांकडे लक्ष द्या’
उद्योगक्षेत्राच्या वाढीसाठी बँकांचे योगदान मोठे असून दोन्ही क्षेत्रांचे यश परस्परांवर अवलंबून आहे...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Aug 2019, 4:00 am