मिरा-भाईंदर प्रभाग नामा
९ ऑगस्ट २०१७
प्रभाग क्रमांक १६
व्याप्ती - पेणकरपाडा, शांती धाम व सृष्टी परिसर
लोकसंख्या - ३२ हजार २८६
एकूण मतदार - २२ हजार ४९१
मैदाने आणि उद्यानांची आवश्यकता
मयुरेश वाघ
मुंबई-अहमदाबाद हायवेला लागून असलेला हा प्रभाग. जवळपास ८ हजार मराठी मतदार, तसेच ७ हजारांच्या घरात उत्तर भारतीय, अडीच हजार गुजराती-मारवाडी तसेच इतर जाती-धर्माचे मतदार अशी मिश्र वस्ती येथे आहे.
पेणकरपाडा भागात बैठ्या चाळी दाटीवाटीने उभ्या आहेत. दुपारी १२ वाजले तरी अनेकदा पालिकेचे कर्मचारी कचरा उचलायला येत नाहीत, अशा तक्रारी आहेत. जवळपास २०० हून अधिक इमारती येथे आहेत. या परिसरात हक्काचे मैदान विकसित करा व मोठे उद्यान द्या, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. पेणकरपाडा येथे खेळाच्या मैदानाचे आरक्षण असले तरी सीआरझेडने बाधित असल्याने ते काम झालेले नाही. पेणकरपाडा शिवशक्ती नगर येथे उद्यान विकसित करण्याचा प्रस्ताव पालिकेत तयार आहे.
सृष्टी परिसरातील जलवाहिन्या जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे जास्त व्यासाच्या नवीन जलवाहिन्या टाकून या परिसरात पाणीपुरवठा योग्य दाबाने व्हावा, अशी मागणी लोक करीत आहेत. सध्या काही ठिकाणी कमी दाबाने पाणी येत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. याशिवाय रस्त्याच्या दुतर्फा वाहनांचे पार्किंग केले जाते. त्यामुळे पार्किंग लॉट विकसित करावेत, भाजी-मच्छी मार्केट बांधून मिळावे, असेशी लोकांची मागणी आहे. चार ते सात मजले व त्यापेक्षाही इंच इमारती परिसरात आहेत. आतापर्यंत येथे रस्ते, गटारे, पायवाटा अशी विकासकामे झाली आहेत. आता नागरिकांना चार क्षण निवांत घालवता यावेत यासाठी गार्डन, मैदाने, जॉगर्स पार्क हवी आहेत. मार्केट विकसित करण्यासाठी, प्रभागातील उघडी गटारे बंदिस्त करण्यासाठी शासनाकडून अनुदान मिळाले असल्याचे सत्ताधारी नगरसेवक सांगत आहेत.
सृष्टी परिसर हिरवागार वाटतो. त्यामुळे या परिसराचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी आणखी झाडे लावली जावीत व त्यांची काळजी घेतली जावी, या प्रभागातील आरक्षित जागांचा पालिकेने विकास करावा, योगा करण्यासाठी योगा शेड व्हावी, अशी अपेक्षा मतदार व्यक्त करीत आहेत. शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना येथे होत आहे.
नागरिक म्हणतात...
सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहे तयार करायला हवीत. अनेकदा तरुण हॉर्न वाजवत सुसाट वेगात गाड्या चालवितात व त्यामुळे ध्वनिप्रदूषण होते. ज्येष्ठांना रस्त्यावरून चालतानाही विचार करावा लागतो. यावर आळा घालणे आवश्यक आहे.
- शशीधरन नायर
आम्ही फेरीवाले रस्त्यावर गाड्या लावतो. पालिका ५० रूपये दररोज बाजार फी घेते व त्यानंतर अचानक कारवाईही करते. त्यामुळे या परिसरात हक्काचे फेरीवाला झोन किंवा मार्केट तयार करून द्यावे.
- चंद्रिका शाह
प्रभाग क्रमांक १७
व्याप्ती - चंद्रेश अॅकार्ड, सिल्वर पार्क, जांगीड,शांती पार्क व सृष्टी परिसर
लोकसंख्या - ३५ हजार ८३८
एकूण मतदार - २६ हजार ८४५
फेरीवाल्यांना नागरिक त्रासले
पूर्णपणे इमारतींचा व मिश्र वस्ती असलेला हा प्रभाग. मराठी, त्याखालोखाल उत्तर भारतीय मतदान येथे सर्वाधिक आहे. मुस्लिम, गुजराती-जैन, पंजाबी व इतर प्रांतातील लोक या प्रभागात राहतात. येथे रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात फेरीवाले, हातगाडीवाले बसलेले असतात. या फेरीवाल्यांमुळे नागरिक त्रासले आहेत. रस्त्यावरून चालण्यासही अनेकदा जागा नसते. रस्ते व्यापणाऱ्या फेरीवाल्यांवर पालिका कोणतीही कारवाई करीत नाही. त्यामुळे मते मागायला येणाऱ्या उमेदवारांना नागरिक फेरीवाल्यांवरूनही जाब विचारत आहेत.
फेरीवाले, टपरीवाल्यांकडून दररोज हप्तेवसुली करून त्यांना संरक्षण दिले जाते. फेरीवाल्यांकडून महिन्याकाठी लाखो रुपये गोळा होत असल्याचेही बोलले जाते. हा मुद्दा विरोधकांनी प्रचारात आणला आहे. फेरीवाल्यांना जागोजागी बसवून काही जण आपला ‘फायदा’ करून घेतात. मात्र त्यामुळे वाहतूककोंडी व नागरिकांचे हाल होतात, अस्वच्छता पसरते. यावरून स्थानिक नगरसेवक व उमेदवारांनाही लोक जाब विचारत आहेत.
प्रभागात रस्ते, गटारे ही कामे गेल्या काही वर्षांत झाली आहेत. जवळपास ५४० इमारती या परिसरात आहेत. ओला व सुका कचरा वर्गीकरण ज्या इमारती करीत नाहीत त्यांच्याकडील कचरा पालिकेकडून उचलला जात नाही व अस्वच्छता राहते.
संघवी नगर व शांती पार्क येथे दोन उद्याने पालिकेकडून विकसित करण्यात आली आहेत. गोकुळ व्हिलेजसमोर रस्त्यावर खडिकरण झाले तरी डांबरीकरण रखडले आहे. शांती पार्क येथे उघडा नाला बंद करावा, सर्व रस्ते फेरीवाला मुक्त करावेत, अशी अपेक्षा येथील नागरिकांनी व्यक्त केली. इमारती आधीच झाल्या असल्याने आता एखादे मोठे विकासकाम करायचे झाल्यास त्यासाठी मोकळी जागा उपलब्ध होत नाही. काही भागात अंमली पदार्थ छुप्या पद्धतीने विकले जातात, असेही बोलले जाते. दुकानदार, कामगार व बाहेरून येणाऱ्यांसाठी प्रभागात एखादे सार्वजनिक स्वच्छतागृह असावे, असे लोकांना वाटते. या प्रभागात शिवसेना विरुद्ध भाजप अशी चुरशीची लढत होत आहे.
नागरिक म्हणतात...
गोकुळ व्हिलेज रस्त्याचे काम रखडले आहे. परिसरात डासांचा प्रचंड त्रास होतो. वेळेवर कचरा उचलला जात नाही. फेरीवाले, दुकानदार अस्वच्छता करून जातात.
या परिसरात एखादी पोलिस चौकी असली पाहिजे. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी चांगल्या जागेची आवश्यकता आहे. रस्ते, स्वच्छता, पाणी या प्रश्नांवर भर द्यावा.
- किसन सावंत
प्रभाग क्रमांक १८
व्याप्ती - कनकिया, पूजा नगर, विनय नगर, ग्रीन कोर्ट व हटकेश उद्योग नगर परिसर.
लोकसंख्या - ३५ हजार ४७१
एकूण मतदार - १८ हजार ७०२
रस्ते चांगले करा
मयुरेश वाघ
नव्या-जुन्या इमारतींचा हा प्रभाग. २८० हून अधिक इमारती येथे असून मराठी, गुजराती, उत्तर भारतीय, मुस्लिम अशी मिश्र लोकवस्ती आहे. या परिसरात लोकसंख्या वाढल्याने यंदा हा प्रभाग पहिल्यांदाच नव्याने तयार झाला आहे.
रस्ते, गटारे बनवली, इमारतींना नळजोडण्या दिल्या अशा कामाचा पाढा विद्यमान नगरसेवक वाचतात. तर गेल्या पाच वर्षांत विद्यमान नगरसेवक फारसे प्रभागात फिरकले नाहीत, अशी तक्रार नागरिक करत आहेत. या परिसरात चांगला पाणीपुरवठा व्हावा म्हणून पाणी साठविण्यासाठी पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे.
जास्त पाऊस झाल्यानंतर या प्रभागातील सखल भागात पाणी भरते व रहिवाशांचे हाल होतात. नव्याने विकसित होत असलेल्या या परिसरात नियोजनाची आवश्यकता आहे. एक रस्ता सिमेंटचा करण्यात येत असला तरी त्याचे काम पूर्ण झालेले नाही. इतकी नागरीवस्ती असल्याने गार्डन, मैदान व पालिका दवाखान्याची आवश्यकता आहे.
प्रभागात सार्वजनिक स्वच्छतागृह बांधण्यात यावे तसेच डीम्ड कन्वेअन्सचा प्रश्न सोडवावा, काही ठिकाणी नागरिकांना लागलेली शास्ती दूर करावी, अशा मागण्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी विरंगुळाकेंद्र तयार करावे, मुलांसाठी मैदान विकसित करावे, असे काही ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले. रस्त्यात खड्डे पडल्याने त्याचाही नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. विकास आराखड्यात या प्रभागात पालिकेची जी आरक्षणे असतील ती विकसित करण्यासाठी येत्या पाच वर्षांत निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. प्रभागात भाजप विरुद्ध शिवसेना अशी मुख्य लढत होत असून इतर पक्षही निवडणूक रिंगणात आहेत.
नागरिक म्हणतात...
पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा व्हायला हवा. प्रत्येक इमारतीला पुरेसे पाणी द्यावे. या परिसरात आरोग्य सुविधा मिळायला हवी.
- आजीम मोडक
या प्रभागातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे दोन दिवसांपूर्वी एका रिक्षेचा अपघात झाला. या प्रभागात व शहरात सर्व रस्ते चांगले करा इतकीच आमची अपेक्षा आहे.
- शमसूल खान
९ ऑगस्ट २०१७
प्रभाग क्रमांक १६
व्याप्ती - पेणकरपाडा, शांती धाम व सृष्टी परिसर
लोकसंख्या - ३२ हजार २८६
एकूण मतदार - २२ हजार ४९१
मैदाने आणि उद्यानांची आवश्यकता
मयुरेश वाघ
मुंबई-अहमदाबाद हायवेला लागून असलेला हा प्रभाग. जवळपास ८ हजार मराठी मतदार, तसेच ७ हजारांच्या घरात उत्तर भारतीय, अडीच हजार गुजराती-मारवाडी तसेच इतर जाती-धर्माचे मतदार अशी मिश्र वस्ती येथे आहे.
पेणकरपाडा भागात बैठ्या चाळी दाटीवाटीने उभ्या आहेत. दुपारी १२ वाजले तरी अनेकदा पालिकेचे कर्मचारी कचरा उचलायला येत नाहीत, अशा तक्रारी आहेत. जवळपास २०० हून अधिक इमारती येथे आहेत. या परिसरात हक्काचे मैदान विकसित करा व मोठे उद्यान द्या, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. पेणकरपाडा येथे खेळाच्या मैदानाचे आरक्षण असले तरी सीआरझेडने बाधित असल्याने ते काम झालेले नाही. पेणकरपाडा शिवशक्ती नगर येथे उद्यान विकसित करण्याचा प्रस्ताव पालिकेत तयार आहे.
सृष्टी परिसरातील जलवाहिन्या जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे जास्त व्यासाच्या नवीन जलवाहिन्या टाकून या परिसरात पाणीपुरवठा योग्य दाबाने व्हावा, अशी मागणी लोक करीत आहेत. सध्या काही ठिकाणी कमी दाबाने पाणी येत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. याशिवाय रस्त्याच्या दुतर्फा वाहनांचे पार्किंग केले जाते. त्यामुळे पार्किंग लॉट विकसित करावेत, भाजी-मच्छी मार्केट बांधून मिळावे, असेशी लोकांची मागणी आहे. चार ते सात मजले व त्यापेक्षाही इंच इमारती परिसरात आहेत. आतापर्यंत येथे रस्ते, गटारे, पायवाटा अशी विकासकामे झाली आहेत. आता नागरिकांना चार क्षण निवांत घालवता यावेत यासाठी गार्डन, मैदाने, जॉगर्स पार्क हवी आहेत. मार्केट विकसित करण्यासाठी, प्रभागातील उघडी गटारे बंदिस्त करण्यासाठी शासनाकडून अनुदान मिळाले असल्याचे सत्ताधारी नगरसेवक सांगत आहेत.
सृष्टी परिसर हिरवागार वाटतो. त्यामुळे या परिसराचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी आणखी झाडे लावली जावीत व त्यांची काळजी घेतली जावी, या प्रभागातील आरक्षित जागांचा पालिकेने विकास करावा, योगा करण्यासाठी योगा शेड व्हावी, अशी अपेक्षा मतदार व्यक्त करीत आहेत. शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना येथे होत आहे.
नागरिक म्हणतात...
सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहे तयार करायला हवीत. अनेकदा तरुण हॉर्न वाजवत सुसाट वेगात गाड्या चालवितात व त्यामुळे ध्वनिप्रदूषण होते. ज्येष्ठांना रस्त्यावरून चालतानाही विचार करावा लागतो. यावर आळा घालणे आवश्यक आहे.
- शशीधरन नायर
आम्ही फेरीवाले रस्त्यावर गाड्या लावतो. पालिका ५० रूपये दररोज बाजार फी घेते व त्यानंतर अचानक कारवाईही करते. त्यामुळे या परिसरात हक्काचे फेरीवाला झोन किंवा मार्केट तयार करून द्यावे.
- चंद्रिका शाह
प्रभाग क्रमांक १७
व्याप्ती - चंद्रेश अॅकार्ड, सिल्वर पार्क, जांगीड,शांती पार्क व सृष्टी परिसर
लोकसंख्या - ३५ हजार ८३८
एकूण मतदार - २६ हजार ८४५
फेरीवाल्यांना नागरिक त्रासले
पूर्णपणे इमारतींचा व मिश्र वस्ती असलेला हा प्रभाग. मराठी, त्याखालोखाल उत्तर भारतीय मतदान येथे सर्वाधिक आहे. मुस्लिम, गुजराती-जैन, पंजाबी व इतर प्रांतातील लोक या प्रभागात राहतात. येथे रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात फेरीवाले, हातगाडीवाले बसलेले असतात. या फेरीवाल्यांमुळे नागरिक त्रासले आहेत. रस्त्यावरून चालण्यासही अनेकदा जागा नसते. रस्ते व्यापणाऱ्या फेरीवाल्यांवर पालिका कोणतीही कारवाई करीत नाही. त्यामुळे मते मागायला येणाऱ्या उमेदवारांना नागरिक फेरीवाल्यांवरूनही जाब विचारत आहेत.
फेरीवाले, टपरीवाल्यांकडून दररोज हप्तेवसुली करून त्यांना संरक्षण दिले जाते. फेरीवाल्यांकडून महिन्याकाठी लाखो रुपये गोळा होत असल्याचेही बोलले जाते. हा मुद्दा विरोधकांनी प्रचारात आणला आहे. फेरीवाल्यांना जागोजागी बसवून काही जण आपला ‘फायदा’ करून घेतात. मात्र त्यामुळे वाहतूककोंडी व नागरिकांचे हाल होतात, अस्वच्छता पसरते. यावरून स्थानिक नगरसेवक व उमेदवारांनाही लोक जाब विचारत आहेत.
प्रभागात रस्ते, गटारे ही कामे गेल्या काही वर्षांत झाली आहेत. जवळपास ५४० इमारती या परिसरात आहेत. ओला व सुका कचरा वर्गीकरण ज्या इमारती करीत नाहीत त्यांच्याकडील कचरा पालिकेकडून उचलला जात नाही व अस्वच्छता राहते.
संघवी नगर व शांती पार्क येथे दोन उद्याने पालिकेकडून विकसित करण्यात आली आहेत. गोकुळ व्हिलेजसमोर रस्त्यावर खडिकरण झाले तरी डांबरीकरण रखडले आहे. शांती पार्क येथे उघडा नाला बंद करावा, सर्व रस्ते फेरीवाला मुक्त करावेत, अशी अपेक्षा येथील नागरिकांनी व्यक्त केली. इमारती आधीच झाल्या असल्याने आता एखादे मोठे विकासकाम करायचे झाल्यास त्यासाठी मोकळी जागा उपलब्ध होत नाही. काही भागात अंमली पदार्थ छुप्या पद्धतीने विकले जातात, असेही बोलले जाते. दुकानदार, कामगार व बाहेरून येणाऱ्यांसाठी प्रभागात एखादे सार्वजनिक स्वच्छतागृह असावे, असे लोकांना वाटते. या प्रभागात शिवसेना विरुद्ध भाजप अशी चुरशीची लढत होत आहे.
नागरिक म्हणतात...
गोकुळ व्हिलेज रस्त्याचे काम रखडले आहे. परिसरात डासांचा प्रचंड त्रास होतो. वेळेवर कचरा उचलला जात नाही. फेरीवाले, दुकानदार अस्वच्छता करून जातात.
या परिसरात एखादी पोलिस चौकी असली पाहिजे. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी चांगल्या जागेची आवश्यकता आहे. रस्ते, स्वच्छता, पाणी या प्रश्नांवर भर द्यावा.
- किसन सावंत
प्रभाग क्रमांक १८
व्याप्ती - कनकिया, पूजा नगर, विनय नगर, ग्रीन कोर्ट व हटकेश उद्योग नगर परिसर.
लोकसंख्या - ३५ हजार ४७१
एकूण मतदार - १८ हजार ७०२
रस्ते चांगले करा
मयुरेश वाघ
नव्या-जुन्या इमारतींचा हा प्रभाग. २८० हून अधिक इमारती येथे असून मराठी, गुजराती, उत्तर भारतीय, मुस्लिम अशी मिश्र लोकवस्ती आहे. या परिसरात लोकसंख्या वाढल्याने यंदा हा प्रभाग पहिल्यांदाच नव्याने तयार झाला आहे.
रस्ते, गटारे बनवली, इमारतींना नळजोडण्या दिल्या अशा कामाचा पाढा विद्यमान नगरसेवक वाचतात. तर गेल्या पाच वर्षांत विद्यमान नगरसेवक फारसे प्रभागात फिरकले नाहीत, अशी तक्रार नागरिक करत आहेत. या परिसरात चांगला पाणीपुरवठा व्हावा म्हणून पाणी साठविण्यासाठी पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे.
जास्त पाऊस झाल्यानंतर या प्रभागातील सखल भागात पाणी भरते व रहिवाशांचे हाल होतात. नव्याने विकसित होत असलेल्या या परिसरात नियोजनाची आवश्यकता आहे. एक रस्ता सिमेंटचा करण्यात येत असला तरी त्याचे काम पूर्ण झालेले नाही. इतकी नागरीवस्ती असल्याने गार्डन, मैदान व पालिका दवाखान्याची आवश्यकता आहे.
प्रभागात सार्वजनिक स्वच्छतागृह बांधण्यात यावे तसेच डीम्ड कन्वेअन्सचा प्रश्न सोडवावा, काही ठिकाणी नागरिकांना लागलेली शास्ती दूर करावी, अशा मागण्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी विरंगुळाकेंद्र तयार करावे, मुलांसाठी मैदान विकसित करावे, असे काही ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले. रस्त्यात खड्डे पडल्याने त्याचाही नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. विकास आराखड्यात या प्रभागात पालिकेची जी आरक्षणे असतील ती विकसित करण्यासाठी येत्या पाच वर्षांत निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. प्रभागात भाजप विरुद्ध शिवसेना अशी मुख्य लढत होत असून इतर पक्षही निवडणूक रिंगणात आहेत.
नागरिक म्हणतात...
पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा व्हायला हवा. प्रत्येक इमारतीला पुरेसे पाणी द्यावे. या परिसरात आरोग्य सुविधा मिळायला हवी.
- आजीम मोडक
या प्रभागातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे दोन दिवसांपूर्वी एका रिक्षेचा अपघात झाला. या प्रभागात व शहरात सर्व रस्ते चांगले करा इतकीच आमची अपेक्षा आहे.
- शमसूल खान