अ‍ॅपशहर

पोलिस भरतीसाठी आधी मैदानपरीक्षा

पोलिस भरतीची संपूर्ण प्रक्रिया वेळखाऊ असल्याने वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी यंदा उमेदवारांचे अर्ज आल्यानंतर कागदपत्रांची तपासणी न करता उमेदवारांना थेट शारीरिक आणि मैदानी चाचणीसाठी मैदानात उतरवले जाणार आहे. त्यानंतर लेखी परीक्षा होणार असून ठाणे पोलिस आयुक्तालयातील पोलिस शिपायांच्या २७३ पदांसाठी शनिवारपर्यंत २९ हजार ऑनलाइन अर्ज आले आहेत.

Maharashtra Times 20 Mar 2017, 1:46 am
शिपाईपदाच्या २७३ जागांसाठी २९ हजार अर्ज
महाराष्ट्र टाइम्स.कॉम police recruitment firstly on physical fittness
पोलिस भरतीसाठी आधी मैदानपरीक्षा


महेश गायकवाड, ठाणे

पोलिस भरतीची संपूर्ण प्रक्रिया वेळखाऊ असल्याने वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी यंदा उमेदवारांचे अर्ज आल्यानंतर कागदपत्रांची तपासणी न करता उमेदवारांना थेट शारीरिक आणि मैदानी चाचणीसाठी मैदानात उतरवले जाणार आहे. त्यानंतर लेखी परीक्षा होणार असून ठाणे पोलिस आयुक्तालयातील पोलिस शिपायांच्या २७३ पदांसाठी शनिवारपर्यंत २९ हजार ऑनलाइन अर्ज आले आहेत.

पोलिस भरतीची प्रक्रिया २४ फेब्रुवारीपासूनच सुरू झाली असून ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची मुदत १७ मार्चपर्यंत होती. मात्र, ही मुदत आज, सोमवारपर्यंत वाढवण्यात आली आहे. मात्र त्यानंतर मुदतवाढ दिली जाणार नाही. ठाणे पोलिस आयुक्तालयात रिक्त पदांपैकी सरकारने केवळ ७५ टक्के पदे भरण्यासाठी मंजुरी दिल्याने २७३ पोलिस शिपाई पदे भरण्यात येणार आहेत. पोलिस शिपाई पदासाठी शैक्षणिक अहर्ता बारावी पास असून अर्ज करण्यासाठी अवघा एकच दिवस शिल्लक राहिला आहे. परंतु आतापर्यंत अर्जांचा पाऊस पडला असला तरी अर्ज स्वीकारण्यापासून ते मैदानी चाचणी, लेखी परीक्षा, पोलिस भरतीची ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यासाठी अधिक वेळ लागतो. त्यामुळे यंदाच्या भरतीमध्ये उमेदवारांची कागदपत्रांची तपासणी सुरुवातीला केली जाणार नाही.

अशी असेल प्रक्रिया

गेल्या वर्षीपर्यंत अर्ज आल्यानंतर कागदपत्रे तपासली जात होती. त्यांनतर शारीरिक आणि मैदानी चाचणी होत असत. वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी यावेळी २२ मार्चपासून शारीरिक आणि मैदानी चाचणी सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) मकरंद रानडे यांनी ‘मटा’शी बोलताना दिली. शारीरिक मोजमाप आणि मैदानी चाचणी झाल्यानंतर लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लावली जाईल आणि नंतरच उमेदवारांची कागदपत्रे तपासणी केल्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल, असेही रानडे यांनी सांगितले. एका जागेसाठी १५ उमेदवार याप्रमाणे मेरिट असणार असून पोलिस भरतीची जय्यत तयारी करण्यात आली असल्याचेही रानडे म्हणाले.

दुपारी चाचणी नाही

सध्या उन्हाळा असल्याने उमेदवारांना मैदानी चाचणीच्या वेळी कोणताही त्रास होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे. मैदानी चाचणी दुपारी घेतली जाणार नाही. सकाळी ६ ते ११ आणि दुपारी चारनंतर पुन्हा भरती प्रक्रिया सुरू होईल, असेही रानडे यांनी सांगितले. प्रत्येक चाचणीसाठी सहा पुलप्स आहेत. तसेच गोळा फेकसाठी चार मैदाने, लांब उडीसाठीही चार मैदाने असल्याचे ते म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज