अ‍ॅपशहर

उंदरांमुळे पोस्टाचे कामकाज बंद

भाईंदर पश्चिमेकडील टपाल कार्यालयात सध्या उंदरांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे कार्यालयातील कामकाज चक्क दीड दिवस बंद ठेवल्याचे समोर आले आहे. भाईंदर पश्चिम परिसरात मोठ्या संख्येने नागरिक राहतात. या परिसरात एकमेव टपाल कार्यालय आहे.

महाराष्ट्र टाइम्स 26 Sep 2019, 11:20 am
म. टा. वृत्तसेवा, वसई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम post work stop because of rats
उंदरांमुळे पोस्टाचे कामकाज बंद


भाईंदर पश्चिमेकडील टपाल कार्यालयात सध्या उंदरांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे कार्यालयातील कामकाज चक्क दीड दिवस बंद ठेवल्याचे समोर आले आहे.

भाईंदर पश्चिम परिसरात मोठ्या संख्येने नागरिक राहतात. या परिसरात एकमेव टपाल कार्यालय आहे. या टपाल कार्यालयात रजिस्टर एडी, स्पीड पोस्ट, कुरिअर आणि पार्सल करण्यासाठी अनेक ग्राहकांची सातत्याने रांग लागलेली असते. मात्र सध्या या कार्यालयात उंदरांचा वावर वाढला असून या उंदरांनी कार्यालयातील अनेक वायरी आणि वस्तूंना कुरतडले आहे. त्यामुळे कार्यालयातील कामकाज चक्क दीड दिवस बंद ठेवण्यात आले होते.

भाईंदर पश्चिम परिसरात असलेल्या टपाल कार्यालयात एकूण १८ कर्मचारी काम करत आहेत. येथे मोठ्या संख्येने ग्राहक कार्यालयाला हजेरी लावत असतात. आकडेवारीनुसार कमीत कमी एकूण २५० पत्रे दिवसाला कार्यालयातून पोस्ट केली जातात. कार्यालयात वाढत्या उंदरांवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासन खंबीर नसल्यामुळे आपण पोस्ट करत असलेली पत्रेदेखील किती सुखरूप राहत असतील, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.

आम्ही संबंधित घटनेची तक्रार वरिष्ठांना केली आहे. ते लवकरच ही समस्या दूर करतील.

रामचंद्र खरपडे, पोस्ट मास्तर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज