पालघर: पालघर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह हजेरी लावणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब व तारा तुटून एकूण ५५ वीजवाहिन्यांमध्ये तांत्रिक बिघाड होऊन दोन लाख ४९ हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. काही ठिकाणचा वीजपुरवठा संध्याकाळपर्यंत पूर्ववत करण्यात यश आले, मात्र रात्री उशिरापर्यंत अनेक घरे अंधारातच होती.
महावितरणच्या लघु दाब वाहिनीच्या १६ खांबांचे नुकसान झाले. वीजपुरवठा खंडित झालेल्या ५६ वीजवाहिन्यांपैकी २७ वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा सुरळीत केला आहे. उर्वरित २८ वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पाऊस व वाऱ्यामुळे कामात अडचणी निर्माण होत असल्याचे वीज वितरणच्या पालघर विभागीय कार्यालयामधून सांगण्यात आले. विजेचे खांब पडल्यामुळे शक्ती उद्योग नगरमधील कारखान्यांना दिवसभर फटका बसला. उर्वरित अंदाजे एक लाख ४५ हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी तंत्रज्ञ, इंजिनीअर काम करत असून वरिष्ठ अधिकारी या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. पालघर शहरातील व परिसरातील वीज संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत परतली नव्हती. अयोध्येत राम मंदिर सोहळ्यानिमित्त पोलिस प्रशासनाने व्हॉट्सअॅप आणि सोशल मीडियावर कडक निर्बंध घातल्याने बऱ्याच ग्रुप अॅडमिनकडून अन्य सदस्यांना मेसेज पाठविण्याबाबतचा पर्याय बंद केला आहे. त्यामुळे स्थानिक परिस्थितीची माहिती मिळवणे तसेच मदत मिळविण्यात अडचण येण्याची भीती व्यक्त होत आहे.
महावितरणच्या लघु दाब वाहिनीच्या १६ खांबांचे नुकसान झाले. वीजपुरवठा खंडित झालेल्या ५६ वीजवाहिन्यांपैकी २७ वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा सुरळीत केला आहे. उर्वरित २८ वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पाऊस व वाऱ्यामुळे कामात अडचणी निर्माण होत असल्याचे वीज वितरणच्या पालघर विभागीय कार्यालयामधून सांगण्यात आले. विजेचे खांब पडल्यामुळे शक्ती उद्योग नगरमधील कारखान्यांना दिवसभर फटका बसला. उर्वरित अंदाजे एक लाख ४५ हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी तंत्रज्ञ, इंजिनीअर काम करत असून वरिष्ठ अधिकारी या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. पालघर शहरातील व परिसरातील वीज संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत परतली नव्हती. अयोध्येत राम मंदिर सोहळ्यानिमित्त पोलिस प्रशासनाने व्हॉट्सअॅप आणि सोशल मीडियावर कडक निर्बंध घातल्याने बऱ्याच ग्रुप अॅडमिनकडून अन्य सदस्यांना मेसेज पाठविण्याबाबतचा पर्याय बंद केला आहे. त्यामुळे स्थानिक परिस्थितीची माहिती मिळवणे तसेच मदत मिळविण्यात अडचण येण्याची भीती व्यक्त होत आहे.