अ‍ॅपशहर

गणेशोत्सवात महावितरणचे विघ्न

अंबरनाथमध्ये एकीकडे गणेश चतुर्थीच्या आधीच पावसाने दिवसभर हजेरी लावत सार्वजनिक मंडळे आणि घरगुती गणपती आणणाऱ्यांची धांदल उडवली होती. त्यात भर म्हणून महावितरणकडून दिवसभरात वारंवार वीजपुरवठा खंडीत होत होता. त्यामुळे शुक्रवारी घरगुती आणि सार्वजनिक मंडळांना अंधारातच बाप्पाचे स्वागत करावे लागले होते. त्यात दुसऱ्या दिवशीही विजेचा लंपडाव सुरू असल्याने नागरिकांनी महावितरणच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली.

Maharashtra Times 27 Aug 2017, 1:23 am
अंबरनाथ-बदलापूरमध्ये दोन दिवस विजेचा लंपडाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम powercut in badlapur ambarnath during ganesh festival
गणेशोत्सवात महावितरणचे विघ्न


म. टा. वृत्तसेवा, अंबरनाथ

अंबरनाथमध्ये एकीकडे गणेश चतुर्थीच्या आधीच पावसाने दिवसभर हजेरी लावत सार्वजनिक मंडळे आणि घरगुती गणपती आणणाऱ्यांची धांदल उडवली होती. त्यात भर म्हणून महावितरणकडून दिवसभरात वारंवार वीजपुरवठा खंडीत होत होता. त्यामुळे शुक्रवारी घरगुती आणि सार्वजनिक मंडळांना अंधारातच बाप्पाचे स्वागत करावे लागले होते. त्यात दुसऱ्या दिवशीही विजेचा लंपडाव सुरू असल्याने नागरिकांनी महावितरणच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली.

अंबरनाथ-बदलापूर शहरांमध्ये एकूण २६ हजार घरगुती गणपती मूर्तींची यंदा स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही शहरांत गणेशोत्सव साजरा करण्याचे प्रमाण वाढले आहे. गणपतीच्या स्वागतासाठी एकीकडे भाविक आनंदात असताना शुक्रवारी सकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे सार्वजनिक आणि घरगुती गणपतींच्या मूर्ती कलाकेंद्रातून आणणाऱ्यांची चांगलीच अडचण झाली. ते कमी म्हणून की काय, अंबरनाथमध्ये महावितरणकडून सकाळपासूनच विजेच्या लपंडावाचा खेळ सुरू झाला होता. त्यामुळे अनेकांना विजेअभावीच कामे उरकावी लागली. त्यात घरात गणपतीचे आगमनही अंधारातच करण्याची वेळ भाविकांवर ओढवली होती. एकीकडे बाहेर पाऊस आणि घरात वीजपुरवठा खंडित झाल्याने गणपतीची स्थापना करताना अनेकांचा हिरमोड झाला होता. वीजपुरवठा खंडित झाल्याचा फटका सार्वजनिक मंडळांनाही सहन करावा लागला. अंबरनाथमधील कानसई, साई सेक्शन तसेच पश्चिम भागातील खुंटवली आदी भागांसह शहरातील विविध भागात वीज नव्हती. हीच परिस्थिती बदलापूर शहरातही होती. त्यामुळे काही ठिकाणी तर वीजपुरवठ्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर झाल्याने लोकांना पाणीटंचाईलाही सामोरे जावे लागले. यामुळे नागरिकांमध्ये महावितरणच्या कारभाराबाबत प्रचंड नाराजी होती.

दुसऱ्या दिवशीही सलग अंबरनाथ आणि बदलापुरातील पाटील नगर, दत्त चौक या भागातही दुपारच्या वेळेस दोन तास वीजपुरवठा खंडित झाला होता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज