म. टा. वृत्तसेवा, पालघर
डहाणू तालुक्यातील आगवण येथील खाडीत मासेमारी करण्यासाठी गेलेली तीन छोटी मुले त्यांच्या मित्रांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे वाचल्याची घटना मंगळवारी घडली. मात्र या अल्पवयीन दोघा बालकांची प्रकृती चिंताजनक आहे.
आगवन गावातील मोठापाडा या आदिवासी वस्तीतील आदित्य देवजी गोधाले (९) प्रीतम सुरेश महालुंगे (९) आणि त्याचा भाऊ सुयश सुरेश महालुंगे (६) ही शाळकरी मुले आणि आगवनच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील काही विद्यार्थी सकाळच्या सत्रातील शाळा संपवून घरी परतले. त्यानंतर सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास गावनजीकच्या खाडीत खेकडे पकडण्यासाठी गेली होती. ही सर्व मुले मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास जवळच्या खाडीत खेकडे पकडण्यासाठी गेली होती. मासे पकडत असताना भरतीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. त्यांच्या सोबतच्या मित्रांना हे दिसताच त्यांनी मदतीसाठी धाव घेतली आणि त्यांचे प्राण वाचविले. त्यांना स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात हलविण्यात आले. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
हे तिघे खाडी पात्रातील गुडघाभर पाण्यात मासेमारी करण्यात गुंग असताना समुद्रात आलेल्या भरतीने खाडीतील पाण्याची पातळी हळूहळू वाढत गेली. मात्र हे कळायच्या आत ते बुडू लागले. या सर्वांना पोहता येत नसल्याने ते गटांगळ्या खाऊ लागल्याचे जवळच असलेल्या भावेश गोविंद गहला, अमृत गोविंद गहला, आकाश देवाजी गोधाले यांनी पाहिल्यानंतर मदतीला धावून गेले. पहिल्यांदा सुयशला आणि त्यानंतर आदित्य व प्रीतमला त्यांनी काठावर काढले. प्रसंगावधान राखत उमेश, आशिष वेणू दळवी, आरुष वेणू दळवी तसेच अन्य मुले मदतीला धावून गेली.
आदित्य व प्रीतम बेशुद्धावस्थेत होते. त्यांना ग्रामस्थ आणि पालकांच्या मदतीने सायंकाळी पावणेसातच्या सुमारास आगर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर आदित्य व प्रीतम यांना आयसीयूची गरज असल्याने तासाभरानंतर अधिक उपचारासाठी सेल्वासा येथील विनोबा भावे रुग्णालयात पाठविल्याची माहिती प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रभाकर भोये यांनी दिली. या तिन्ही बालकांचे प्राण वाचविणारी मुले त्याच आगवनच्या आदिवासी पाड्यावरील असून त्यांचेही वय दहा वर्षांच्या आतील आहे. त्यांनी दाखविलेल्या धाडसाचे कौतुक पंचक्रोशीत होत आहे. सुयश हा आगाराच्या रुग्णालयात दाखल असून त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे.
डहाणू तालुक्यातील आगवण येथील खाडीत मासेमारी करण्यासाठी गेलेली तीन छोटी मुले त्यांच्या मित्रांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे वाचल्याची घटना मंगळवारी घडली. मात्र या अल्पवयीन दोघा बालकांची प्रकृती चिंताजनक आहे.
आगवन गावातील मोठापाडा या आदिवासी वस्तीतील आदित्य देवजी गोधाले (९) प्रीतम सुरेश महालुंगे (९) आणि त्याचा भाऊ सुयश सुरेश महालुंगे (६) ही शाळकरी मुले आणि आगवनच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील काही विद्यार्थी सकाळच्या सत्रातील शाळा संपवून घरी परतले. त्यानंतर सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास गावनजीकच्या खाडीत खेकडे पकडण्यासाठी गेली होती. ही सर्व मुले मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास जवळच्या खाडीत खेकडे पकडण्यासाठी गेली होती. मासे पकडत असताना भरतीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. त्यांच्या सोबतच्या मित्रांना हे दिसताच त्यांनी मदतीसाठी धाव घेतली आणि त्यांचे प्राण वाचविले. त्यांना स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात हलविण्यात आले. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
हे तिघे खाडी पात्रातील गुडघाभर पाण्यात मासेमारी करण्यात गुंग असताना समुद्रात आलेल्या भरतीने खाडीतील पाण्याची पातळी हळूहळू वाढत गेली. मात्र हे कळायच्या आत ते बुडू लागले. या सर्वांना पोहता येत नसल्याने ते गटांगळ्या खाऊ लागल्याचे जवळच असलेल्या भावेश गोविंद गहला, अमृत गोविंद गहला, आकाश देवाजी गोधाले यांनी पाहिल्यानंतर मदतीला धावून गेले. पहिल्यांदा सुयशला आणि त्यानंतर आदित्य व प्रीतमला त्यांनी काठावर काढले. प्रसंगावधान राखत उमेश, आशिष वेणू दळवी, आरुष वेणू दळवी तसेच अन्य मुले मदतीला धावून गेली.
आदित्य व प्रीतम बेशुद्धावस्थेत होते. त्यांना ग्रामस्थ आणि पालकांच्या मदतीने सायंकाळी पावणेसातच्या सुमारास आगर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर आदित्य व प्रीतम यांना आयसीयूची गरज असल्याने तासाभरानंतर अधिक उपचारासाठी सेल्वासा येथील विनोबा भावे रुग्णालयात पाठविल्याची माहिती प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रभाकर भोये यांनी दिली. या तिन्ही बालकांचे प्राण वाचविणारी मुले त्याच आगवनच्या आदिवासी पाड्यावरील असून त्यांचेही वय दहा वर्षांच्या आतील आहे. त्यांनी दाखविलेल्या धाडसाचे कौतुक पंचक्रोशीत होत आहे. सुयश हा आगाराच्या रुग्णालयात दाखल असून त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे.