म. टा. प्रतिनिधी, ठाणे
दिवा जंक्शन येथून सुटणाऱ्या दिवा-पनवेल-रोहा, वसई-पनवेल या पॅसेंजर गाड्यांच्या प्रवासी संघटनांनी पंतप्रधानांकडे त्यांच्या समस्यांचे गाऱ्हाणे मांडले आहे. काही दिवसांपूर्वी दिवा स्थानकात दिवा-रोहा गाडी दीड तासाहून अधिक काळ उशिराने आल्यानंतर प्रवाशांचा संतापाचा उद्रेक झाला होता. त्यानंतर व्यथित झालेल्या प्रवाशांनी थेट पंतप्रधानांकडे समस्यांची जंत्री मांडली आहे.
दिवा जंक्शनमधून दिवा-पनवेल-रोहा आणि वसई-पनवेल या पॅसेंजर गाड्यांमधून दररोज हजारो प्रवाशी प्रवास करतात. मात्र सतत पॅसेंजर गाडीला होणारा उशीर, दिवा जंक्शन येथील प्रचंड अस्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सोय दूरच मात्र प्रसाधनगृहांमध्येही पाण्याचा तुडवडा आदी विविध समस्यांचा पाढा दोन्हीही पॅसेंजर प्रवासी संघटनेच्या सदस्यांनी पत्राद्वारे वाचला आहे. तसेच मार्गावरील गाड्या वाढवणे, ३० ते ९० मिनिटांपर्यंत पॅसेंजर गाड्या रखडणे, फलाटावर लाइट, पंखे आदी मूलभूत सोयीचा अभाव असण्यापासून ते खाद्यपदार्थांचे स्टॉल नसणे, मोडकेतोडके बेंच आदी त्रुटी मांडल्या आहेत.
पॅसेंजर गाडीच्या प्रवाशांच्या समस्या या न संपणाऱ्या आहेत. त्यातच त्यावर काही केल्या उपाययोजना होत नसल्याने संघटनांनी पंतप्रधान कार्यालयाशी पत्रव्यवहार केल्याचे दिवा-रोहा प्रवासी संघटनेच्या विपुल शहा यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.
दिवा जंक्शन येथून सुटणाऱ्या दिवा-पनवेल-रोहा, वसई-पनवेल या पॅसेंजर गाड्यांच्या प्रवासी संघटनांनी पंतप्रधानांकडे त्यांच्या समस्यांचे गाऱ्हाणे मांडले आहे. काही दिवसांपूर्वी दिवा स्थानकात दिवा-रोहा गाडी दीड तासाहून अधिक काळ उशिराने आल्यानंतर प्रवाशांचा संतापाचा उद्रेक झाला होता. त्यानंतर व्यथित झालेल्या प्रवाशांनी थेट पंतप्रधानांकडे समस्यांची जंत्री मांडली आहे.
दिवा जंक्शनमधून दिवा-पनवेल-रोहा आणि वसई-पनवेल या पॅसेंजर गाड्यांमधून दररोज हजारो प्रवाशी प्रवास करतात. मात्र सतत पॅसेंजर गाडीला होणारा उशीर, दिवा जंक्शन येथील प्रचंड अस्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सोय दूरच मात्र प्रसाधनगृहांमध्येही पाण्याचा तुडवडा आदी विविध समस्यांचा पाढा दोन्हीही पॅसेंजर प्रवासी संघटनेच्या सदस्यांनी पत्राद्वारे वाचला आहे. तसेच मार्गावरील गाड्या वाढवणे, ३० ते ९० मिनिटांपर्यंत पॅसेंजर गाड्या रखडणे, फलाटावर लाइट, पंखे आदी मूलभूत सोयीचा अभाव असण्यापासून ते खाद्यपदार्थांचे स्टॉल नसणे, मोडकेतोडके बेंच आदी त्रुटी मांडल्या आहेत.
पॅसेंजर गाडीच्या प्रवाशांच्या समस्या या न संपणाऱ्या आहेत. त्यातच त्यावर काही केल्या उपाययोजना होत नसल्याने संघटनांनी पंतप्रधान कार्यालयाशी पत्रव्यवहार केल्याचे दिवा-रोहा प्रवासी संघटनेच्या विपुल शहा यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.