म. टा. प्रतिनिधी, ठाणे
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील जुन्या वर्सोवा पुलाच्या दुरुस्ती कामामुळे ठाणे, मुंब्रा तसेच भिवंडी शहरातील महामार्गांवर होणारी प्रचंड कोंडी भेदण्यासाठी अवजड वाहतुकीला दिवसा शहरातील प्रवेशावर बंदी घालण्याबाबत पोलिस दलातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडून विचारविनिमय सुरू आहे. याबाबत वाहतूक शाखेचे पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच राष्ट्रीय महामार्ग समितीच्या अधिकाऱ्यांसह बैठक घेऊन त्यामध्ये या प्रश्नावर तोडगा काढण्यासंदर्भात ाचपणी सुरू असल्याचे समोर आले आहे.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वर्सोवा येथील जुन्या खाडी पूल दुरुस्तीच्या कामामुळे या भागातील अवजड वाहतूक ठाणे तसेच भिवंडी मार्गे वळविण्यात आली आहे. वाहतुकीतील या बदलामुळे आणि अवजड वाहतुकीच्या भारामुळे ठाणे, मुंब्रा, भिवंडी आदी परिसर अनेक दिवसांपासून कोंडीच्या गर्तेत अडकत आहे. त्यातच वाहतुकीच्या या बदलामुळे प्रत्येक चौकाचौकात वाहतूक शाखेचे कर्मचारी नेमूनही वाहतूक कोंडी कमी होत नसून यामुळे वाहनचालकांना नाहक त्रासाला तोंड द्यावे लागत आहे. ठाणे ग्रामीण पोलिस आणि महामार्ग पोलिस यांनी नियंत्रणासाठी अतिरिक्त मनुष्यबळ नेमूनही वाहतुकीवर नियंत्रण मिळत नसून पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत पुढील काही दिवस अशीच परिस्थिती कायम राहण्याची दाट शक्यता आहे. या कोंडीचा परिसरातील शाळांच्या विद्यार्थ्यांसह
आणि जवळील रुग्णालयाच्या रुग्णावाहिकांनाही फटका बसत आहे. म्हणूनच अवजड वाहनांना दिवसा पूर्णपणे प्रवेश बंदी करण्याची मागणी जोर धरत असतानाच ठाण्याचे सह पोलिस आयुक्त आशुतोष डुम्बरे यांनीही याबाबत लवकरच वाहतूक शाखेचे पोलिस अधिकारी, कर्मचारी यांची बैठक घेऊन तोडगा काढण्याची रणनीती आखण्याबाबत विचार सुरू असल्याचे स्पष्ट केले.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील जुन्या वर्सोवा पुलाच्या दुरुस्ती कामामुळे ठाणे, मुंब्रा तसेच भिवंडी शहरातील महामार्गांवर होणारी प्रचंड कोंडी भेदण्यासाठी अवजड वाहतुकीला दिवसा शहरातील प्रवेशावर बंदी घालण्याबाबत पोलिस दलातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडून विचारविनिमय सुरू आहे. याबाबत वाहतूक शाखेचे पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच राष्ट्रीय महामार्ग समितीच्या अधिकाऱ्यांसह बैठक घेऊन त्यामध्ये या प्रश्नावर तोडगा काढण्यासंदर्भात ाचपणी सुरू असल्याचे समोर आले आहे.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वर्सोवा येथील जुन्या खाडी पूल दुरुस्तीच्या कामामुळे या भागातील अवजड वाहतूक ठाणे तसेच भिवंडी मार्गे वळविण्यात आली आहे. वाहतुकीतील या बदलामुळे आणि अवजड वाहतुकीच्या भारामुळे ठाणे, मुंब्रा, भिवंडी आदी परिसर अनेक दिवसांपासून कोंडीच्या गर्तेत अडकत आहे. त्यातच वाहतुकीच्या या बदलामुळे प्रत्येक चौकाचौकात वाहतूक शाखेचे कर्मचारी नेमूनही वाहतूक कोंडी कमी होत नसून यामुळे वाहनचालकांना नाहक त्रासाला तोंड द्यावे लागत आहे. ठाणे ग्रामीण पोलिस आणि महामार्ग पोलिस यांनी नियंत्रणासाठी अतिरिक्त मनुष्यबळ नेमूनही वाहतुकीवर नियंत्रण मिळत नसून पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत पुढील काही दिवस अशीच परिस्थिती कायम राहण्याची दाट शक्यता आहे. या कोंडीचा परिसरातील शाळांच्या विद्यार्थ्यांसह
आणि जवळील रुग्णालयाच्या रुग्णावाहिकांनाही फटका बसत आहे. म्हणूनच अवजड वाहनांना दिवसा पूर्णपणे प्रवेश बंदी करण्याची मागणी जोर धरत असतानाच ठाण्याचे सह पोलिस आयुक्त आशुतोष डुम्बरे यांनीही याबाबत लवकरच वाहतूक शाखेचे पोलिस अधिकारी, कर्मचारी यांची बैठक घेऊन तोडगा काढण्याची रणनीती आखण्याबाबत विचार सुरू असल्याचे स्पष्ट केले.