म. टा. वृत्तसेवा, कल्याण
टिटवाळा शहरातील इंदिरा नगर येथील अम्युजमेंट पार्क आणि म्युन्सिपल कर्मचारी वसाहतीसाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून या ठिकणी भूमाफियांनी शेकडो चाळी उभारल्या आहेत. या चाळीतील घरांची लाखो रुपयांत सर्वसामान्यांना विक्री केली आहे. आता पालिका प्रशासनाकडून या अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी प्रयत्न सुरू असून या विरोधात नागरिक एकवटले आहेत. शुक्रवारी कल्याणातील शिवाजी चौकात सकाळी ११ वाजता रस्ता रोको केला जाणार असल्याचे मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या भारत कुमार सोनार यांनी सांगितले.
इंदिरा नगर येथील पालिकेच्या विकास आराखड्यात अम्युजमेंट पार्क आणि म्युनिसिपल कर्मचारी वसाहतीसाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे करण्यात आली. मागील १५ वर्षांहून अधिक काळ या चाळीमध्ये नागरिक राहत आहेत. मात्र पालिका प्रशासनाला आता या भागात अनधिकृत बांधकाम झाल्याचा साक्षात्कार झाला असून काही दिवसांपूर्वी प्रशासनाने या भागातील नागरिकांना जागा रिकामी करण्याच्या नोटिसा देण्याचा प्रयत्न केला होता. नोटिशीचे वाटप करण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या अधिकाऱ्यांना या नागरिकांनी दगडफेक करत हुसकावून लावले. तसेच तब्बल दीड तास रेलरोको करत आपला संताप व्यक्त केला होता. यानंतर पालिका प्रशासनाने या परिसरात राहणाऱ्या चाळधारकांना आपल्याकडे असलेली कागदपत्रे पालिकेकडे जमा करण्याचे आदेश दिले होते. तरी आपली घरे वाचतील, या अपेक्षेने नागरिकांनी आपण कथित विकासकाकडून खरेदी केलेल्या घराची कागदपत्रे पालिका प्रशासनाकडे सादर केली. मात्र प्रशासनाने या कागदपत्रांचा वापर करत या भागातील अनधिकृत चाळीची संख्या निश्चित केली असून पालिका प्रशासनाने १९४३ नागरिकांना तातडीने घरे रिकामी करण्याच्या नोटिसा पाठवल्या आहेत. नागरिकांनी आता शेवटचा पर्याय म्हणून रस्ता रोकोची हाक दिली आहे.
टिटवाळा शहरातील इंदिरा नगर येथील अम्युजमेंट पार्क आणि म्युन्सिपल कर्मचारी वसाहतीसाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून या ठिकणी भूमाफियांनी शेकडो चाळी उभारल्या आहेत. या चाळीतील घरांची लाखो रुपयांत सर्वसामान्यांना विक्री केली आहे. आता पालिका प्रशासनाकडून या अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी प्रयत्न सुरू असून या विरोधात नागरिक एकवटले आहेत. शुक्रवारी कल्याणातील शिवाजी चौकात सकाळी ११ वाजता रस्ता रोको केला जाणार असल्याचे मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या भारत कुमार सोनार यांनी सांगितले.
इंदिरा नगर येथील पालिकेच्या विकास आराखड्यात अम्युजमेंट पार्क आणि म्युनिसिपल कर्मचारी वसाहतीसाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे करण्यात आली. मागील १५ वर्षांहून अधिक काळ या चाळीमध्ये नागरिक राहत आहेत. मात्र पालिका प्रशासनाला आता या भागात अनधिकृत बांधकाम झाल्याचा साक्षात्कार झाला असून काही दिवसांपूर्वी प्रशासनाने या भागातील नागरिकांना जागा रिकामी करण्याच्या नोटिसा देण्याचा प्रयत्न केला होता. नोटिशीचे वाटप करण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या अधिकाऱ्यांना या नागरिकांनी दगडफेक करत हुसकावून लावले. तसेच तब्बल दीड तास रेलरोको करत आपला संताप व्यक्त केला होता. यानंतर पालिका प्रशासनाने या परिसरात राहणाऱ्या चाळधारकांना आपल्याकडे असलेली कागदपत्रे पालिकेकडे जमा करण्याचे आदेश दिले होते. तरी आपली घरे वाचतील, या अपेक्षेने नागरिकांनी आपण कथित विकासकाकडून खरेदी केलेल्या घराची कागदपत्रे पालिका प्रशासनाकडे सादर केली. मात्र प्रशासनाने या कागदपत्रांचा वापर करत या भागातील अनधिकृत चाळीची संख्या निश्चित केली असून पालिका प्रशासनाने १९४३ नागरिकांना तातडीने घरे रिकामी करण्याच्या नोटिसा पाठवल्या आहेत. नागरिकांनी आता शेवटचा पर्याय म्हणून रस्ता रोकोची हाक दिली आहे.