मटा ऑनलाइन वृत्त । ठाणे
सैन्यातील नागरी पदांच्या भरतीसाठी आज होणाऱ्या लेखी परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्यानं खळबळ उडाली आहे. या प्रकरणी ठाणे व पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं महाराष्ट्र व गोव्यात ठिकठिकाणी छापे टाकून शेकडो संशयितांना अटक केली आहे. या घटनेमुळं परीक्षार्थी उमेदवारांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे.
देशातील विविध केंद्रांवर आज नऊ वाजता सैन्यातील भरतीसाठी लेखी परीक्षा होत आहे. मात्र, त्याआधीच प्रश्नपत्रिका काही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याचं काल रात्री समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी ठाणे, नाशिक, पुणे, नागपूरसह गोव्यात अनेक ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत १८ आरोपींसह ३००हून अधिक उमेदवारांना अटक करण्यात आली आहे.
प्रश्नपत्रिका फोडणाऱ्यांना एका प्रश्नपत्रिकेमागे २ लाख रुपये मिळाल्याची चर्चा आहे. अनेक उमेदवारांना ही प्रश्नपत्रिका मिळाल्याचं बोललं जात आहे. फुटलेली प्रश्नपत्रिका सैन्य भरती बोर्डानं पडताळणीसाठी पाठवली आहे. परीक्षेआधी फुटलेली प्रश्नपत्रिका ९९ टक्के तीच असण्याची शक्यता आहे.
दरम्यान, नियोजित वेळेनुसार परीक्षा सुरू झाली असून चौकशीनंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
सैन्यातील नागरी पदांच्या भरतीसाठी आज होणाऱ्या लेखी परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्यानं खळबळ उडाली आहे. या प्रकरणी ठाणे व पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं महाराष्ट्र व गोव्यात ठिकठिकाणी छापे टाकून शेकडो संशयितांना अटक केली आहे. या घटनेमुळं परीक्षार्थी उमेदवारांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे.
देशातील विविध केंद्रांवर आज नऊ वाजता सैन्यातील भरतीसाठी लेखी परीक्षा होत आहे. मात्र, त्याआधीच प्रश्नपत्रिका काही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याचं काल रात्री समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी ठाणे, नाशिक, पुणे, नागपूरसह गोव्यात अनेक ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत १८ आरोपींसह ३००हून अधिक उमेदवारांना अटक करण्यात आली आहे.
प्रश्नपत्रिका फोडणाऱ्यांना एका प्रश्नपत्रिकेमागे २ लाख रुपये मिळाल्याची चर्चा आहे. अनेक उमेदवारांना ही प्रश्नपत्रिका मिळाल्याचं बोललं जात आहे. फुटलेली प्रश्नपत्रिका सैन्य भरती बोर्डानं पडताळणीसाठी पाठवली आहे. परीक्षेआधी फुटलेली प्रश्नपत्रिका ९९ टक्के तीच असण्याची शक्यता आहे.
दरम्यान, नियोजित वेळेनुसार परीक्षा सुरू झाली असून चौकशीनंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.