अ‍ॅपशहर

जीवघेणी रेल्वेगर्दी!

ठाणे रेल्वे पोलिसांच्या हद्दीतील रेल्वे स्थानकादरम्यान चालत्या लोकलमधून पडून जानेवारी ते ऑक्टोबर २०१६ अखेरपर्यंत तब्बल ३७ जणांना प्राण गमवावा लागला असून प्लॅटफॉर्मवरील गॅपमध्ये पडून चौघे दगावले आहेत. वाढत्या गर्दीमुळे या कालावधीत तब्बल ८७ प्रवासी रेल्वेतून पडून जखमीही झाले आहेत. त्यामुळे रेल्वेतील वाढत्या गर्दीचे बळी हे वाढतच असल्याने चाकरमान्यांचा प्रवास दिवसागणिक बिकट होत असल्याचा प्रत्यय येत आहे.

Maharashtra Times 30 Nov 2016, 4:00 am
वर्षभरात ४१ मृत्यू; प्लॅटफॉर्मवरील गॅपही धोकादायक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम railway crowd is cause of death
जीवघेणी रेल्वेगर्दी!


म. टा. प्रतिनिधी, ठाणे

ठाणे रेल्वे पोलिसांच्या हद्दीतील रेल्वे स्थानकादरम्यान चालत्या लोकलमधून पडून जानेवारी ते ऑक्टोबर २०१६ अखेरपर्यंत तब्बल ३७ जणांना प्राण गमवावा लागला असून प्लॅटफॉर्मवरील गॅपमध्ये पडून चौघे दगावले आहेत. वाढत्या गर्दीमुळे या कालावधीत तब्बल ८७ प्रवासी रेल्वेतून पडून जखमीही झाले आहेत. त्यामुळे रेल्वेतील वाढत्या गर्दीचे बळी हे वाढतच असल्याने चाकरमान्यांचा प्रवास दिवसागणिक बिकट होत असल्याचा प्रत्यय येत आहे.

ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज लाखो प्रवाशांची येजा होते. ठाणे रेल्वे पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या ठाण्यासह दिवा, मुंब्रा, कळवा, ऐरोली या स्थानकांमध्येही गर्दी ओसंडून वाहत असते. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांना आतमध्ये शिरायलाही जागा नसते. त्यातूनच लोकलमधून पडून प्रवासी दगावतात, अन्यथा जखमी होतात. मात्र रेल्वे प्रशासनाला त्याचे कोणतेही सोयरसुतक नसून रेल्वे मार्गाचा विस्तार, जादा रेल्वे गाड्या आदी उपाय योजण्यात प्रशासन कमी पडताना दिसते. तर दुसरीकडे वारंवार रेल्वे रुळाला तडे, पेंटाग्राफला आग आदी बिघाडामुळे गरीने भरलेल्या लोकलमधून पडून मृतांच्या आकडेवारीत भरच पडत आहे.

२०१६ या वर्षाच्या जानेवारी ते ऑक्टोबर महिन्यादरम्यान ठाणे, दिवा, मुंब्रा, कळवा, ऐरोली या स्थानकांदरम्यान लोकलच्या गर्दीतून पडून ३७ जण दगावले असून यापैकी सर्वाधिक १८ मृत्यू ठाणे रेल्वे स्थानकादरम्यान घडले आहेत. त्याखालोखाल मुंब्रा स्थानकादरम्यान आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन मृत्यू ऐरोली स्थानकादरम्यान घडले आहेत. तसेच रेल्वेतून पडून ८७ प्रवासी जखमी झाले असून यामध्ये ठाण्यात ३९, दिव्यात २२ आणि मुंब्रा येथे १४ प्रवासी जखमी झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते.

गॅपही धोकादायक

लोकल आणि प्लॅटफॉर्ममध्ये असणाऱ्या गॅपमध्ये पडून जानेवारी ते ऑक्टोबर २०१६ दरम्यान चौघे दगावले असून यापैकी चार ठाण्यात आणि एक मृत्यू मुंब्र्यात झाला आहे. तर या कालावधीत दोन जखमी असून अनुक्रमे ठाणे आणि दिवा या स्थानकात हा प्रकार घडला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज