अ‍ॅपशहर

राज्यात पावसाचा जोर ओसरणार, तापमान वाढणार

सध्या राज्यात मान्सून सक्रिय असून बऱ्याच भागात पावसाने हजेरी लावली आहे. मात्र, १८ जुलैपासून राज्यात पावसाचा जोर कमी होण्यास सुरुवात होईल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Jul 2018, 1:28 pm
ठाणे:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rainfall


सध्या राज्यात मान्सून सक्रिय असून बऱ्याच भागात पावसाने हजेरी लावली आहे. मात्र, १८ जुलैपासून राज्यात पावसाचा जोर कमी होण्यास सुरुवात होईल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

येत्या २३ जुलैपर्यंत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत हलक्या सरी कोसळतील. २३ ते २५ जुलैमध्ये विदर्भात पुन्हा एकदा पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानंतर राज्यातील बऱ्याच भागातील पावसात दीर्घकालीन खंड पडण्याचे संकेत हवामान तज्ज्ञांनी दिले आहेत. कोकण आणि मुंबई परिसरात देखील या आठवड्यात पावसाचा जोर कमी राहील. पावसाचे प्रमाण कमी होणार असल्यामुळं कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी हवामानाच्या या स्थितीनुसार शेतीचे नियोजन करावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज